शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

मेळघाटमधून अकोट तालुक्यात पुनर्वसित गावात अल्पवयीन मुलीसह महिलेचा अज्ञात तापाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 17:39 IST

अकोट : मेळघाटमधून अकोट तालुक्यात पुनर्वसित झालेल्या बारूखेडा या गावात एका अल्पवयीन मुलीसह महिलेचा अज्ञात तापाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २५ मे ते २ जूनच्या दरम्यान घडली आहे.

ठळक मुद्दे मेळघाटातील आठ गावांमधील आदिवासींचे अकोट तालुक्यात पुर्नवसन करण्यात आले. बारूखेडा येथील आरती अमर जामूनकर व लीला शामलाल कासदेकर या दोंघीचा अज्ञात तापाने मृत्यु झाला. पुरेसे पोषक धान्य व उपचाराचा अभावाने हे बळी गेल्याची माहिती डिंगाबर सोंळके या गावकऱ्याने दिली.

- विजय शिंदे

अकोट : मेळघाटमधून अकोट तालुक्यात पुनर्वसित झालेल्या बारूखेडा या गावात एका अल्पवयीन मुलीसह महिलेचा अज्ञात तापाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २५ मे ते २ जूनच्या दरम्यान घडली आहे. या घटनेमुळे या पुनर्वसित आदिवासींना विविध मूलभूत सुविधा देण्यासह आरोग्य सेवा देण्याकडे आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पात मेळघाटातील आदिवासीची आठ गावे गेल्यामुळे शासनाने या गावांमधील आदिवासींचे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी अकोट तालुक्यात पुर्नवसन करण्यात आले. या गावापैंकी बारूखेडा येथील १३ वर्षाची आरती अमर जामूनकर व ३७ वर्षे वयाच्या लीला शामलाल कासदेकर या दोंघीचा २५ मे ते २ जून दरम्यान अज्ञात आजार होऊन तापाने मृत्यु झाल्याची घटना घडली . ही घटना घडुनही आरोग्य यंत्रणा जागृत झालीच नाही. यापूर्वीदेखील अनेक आदिवासींचा येथे विविध आजारांनी मृत्यू झाल्याने व मूलभूत सुविधा मिळाल्या नसल्याने या पुनर्वसित गावातील आदिवासींनी मेळघाटात परतण्याचा नारा दिला होता. त्यानंतर ते आदिवासी पुन्हा मेळघाटातील जुन्या गावात गेले होते. यावेळी ग्रामस्थांनी आंदोलन केल्यामुळे त्यांच्या अनेक समस्या मार्गी लावल्या असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला होता. पंरतु अल्पवयीन मुलीसह महिलेचा मृत्यु झाल्याने प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. अद्यापही या आदिवासी ग्रामस्थांना पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नसल्याचे दिसत आहे. आदीवासीच्या आरोग्य सेवा-सूविधा देण्याकरीता शासन विविध योजना व लाखो रूपयांचा निधी खर्च करते. परंंतु, या गावातील आरोग्याची समस्या कायमच असून पावसाळ्यात अधिक रोगराई पसरून आदिवासीच्या जीवावर उठू नये याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. पुरेसे पोषक धान्य व उपचाराचा अभावाने हे बळी गेल्याची माहिती डिंगाबर सोंळके या गावकऱ्याने दिली.लिलाबाई कासदेकर हिला रुग्णालयात आणतांना रक्ताची उलटी होऊन वाटेतच मृत्यू झाला.तसेच आरती जांमुनकर हीचा मृत्यु झाला आहे.मृत्यु कशामुळे झाला याचे अचुक निदान होऊ शकले नाही . आरोग्य यंत्रणा तपास करीत आहे.-डॉ.अनिरूध्द वेते,वैद्यकीय अधिकारी,प्रा.आ.केंद्र दानापूरगावातील आरती अमर जमुनकर हिचा आजाराने मृत्यु झाला.तसेच लीला शामलाल कसदेकर या महीलेला अचानक रक्ताच्या उलटी झाल्याने मृत्यु झाला. या गावात दानापुर येथील डॉक्टर आठवड्यातून एकदा येतात. -जया गजानन पाठकसरपंच, बारूखेडा

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटMelghatमेळघाट