शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
4
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
7
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
8
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
9
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
10
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
11
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
12
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
13
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
14
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
15
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
16
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
17
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
18
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
19
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
20
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

मेळघाटमधून अकोट तालुक्यात पुनर्वसित गावात अल्पवयीन मुलीसह महिलेचा अज्ञात तापाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 17:39 IST

अकोट : मेळघाटमधून अकोट तालुक्यात पुनर्वसित झालेल्या बारूखेडा या गावात एका अल्पवयीन मुलीसह महिलेचा अज्ञात तापाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २५ मे ते २ जूनच्या दरम्यान घडली आहे.

ठळक मुद्दे मेळघाटातील आठ गावांमधील आदिवासींचे अकोट तालुक्यात पुर्नवसन करण्यात आले. बारूखेडा येथील आरती अमर जामूनकर व लीला शामलाल कासदेकर या दोंघीचा अज्ञात तापाने मृत्यु झाला. पुरेसे पोषक धान्य व उपचाराचा अभावाने हे बळी गेल्याची माहिती डिंगाबर सोंळके या गावकऱ्याने दिली.

- विजय शिंदे

अकोट : मेळघाटमधून अकोट तालुक्यात पुनर्वसित झालेल्या बारूखेडा या गावात एका अल्पवयीन मुलीसह महिलेचा अज्ञात तापाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २५ मे ते २ जूनच्या दरम्यान घडली आहे. या घटनेमुळे या पुनर्वसित आदिवासींना विविध मूलभूत सुविधा देण्यासह आरोग्य सेवा देण्याकडे आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पात मेळघाटातील आदिवासीची आठ गावे गेल्यामुळे शासनाने या गावांमधील आदिवासींचे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी अकोट तालुक्यात पुर्नवसन करण्यात आले. या गावापैंकी बारूखेडा येथील १३ वर्षाची आरती अमर जामूनकर व ३७ वर्षे वयाच्या लीला शामलाल कासदेकर या दोंघीचा २५ मे ते २ जून दरम्यान अज्ञात आजार होऊन तापाने मृत्यु झाल्याची घटना घडली . ही घटना घडुनही आरोग्य यंत्रणा जागृत झालीच नाही. यापूर्वीदेखील अनेक आदिवासींचा येथे विविध आजारांनी मृत्यू झाल्याने व मूलभूत सुविधा मिळाल्या नसल्याने या पुनर्वसित गावातील आदिवासींनी मेळघाटात परतण्याचा नारा दिला होता. त्यानंतर ते आदिवासी पुन्हा मेळघाटातील जुन्या गावात गेले होते. यावेळी ग्रामस्थांनी आंदोलन केल्यामुळे त्यांच्या अनेक समस्या मार्गी लावल्या असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला होता. पंरतु अल्पवयीन मुलीसह महिलेचा मृत्यु झाल्याने प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. अद्यापही या आदिवासी ग्रामस्थांना पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नसल्याचे दिसत आहे. आदीवासीच्या आरोग्य सेवा-सूविधा देण्याकरीता शासन विविध योजना व लाखो रूपयांचा निधी खर्च करते. परंंतु, या गावातील आरोग्याची समस्या कायमच असून पावसाळ्यात अधिक रोगराई पसरून आदिवासीच्या जीवावर उठू नये याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. पुरेसे पोषक धान्य व उपचाराचा अभावाने हे बळी गेल्याची माहिती डिंगाबर सोंळके या गावकऱ्याने दिली.लिलाबाई कासदेकर हिला रुग्णालयात आणतांना रक्ताची उलटी होऊन वाटेतच मृत्यू झाला.तसेच आरती जांमुनकर हीचा मृत्यु झाला आहे.मृत्यु कशामुळे झाला याचे अचुक निदान होऊ शकले नाही . आरोग्य यंत्रणा तपास करीत आहे.-डॉ.अनिरूध्द वेते,वैद्यकीय अधिकारी,प्रा.आ.केंद्र दानापूरगावातील आरती अमर जमुनकर हिचा आजाराने मृत्यु झाला.तसेच लीला शामलाल कसदेकर या महीलेला अचानक रक्ताच्या उलटी झाल्याने मृत्यु झाला. या गावात दानापुर येथील डॉक्टर आठवड्यातून एकदा येतात. -जया गजानन पाठकसरपंच, बारूखेडा

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटMelghatमेळघाट