शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

भारत- पाक युध्दाचा साक्षीदार अकोल्यात

By admin | Updated: December 16, 2014 01:05 IST

स्वतंत्र बांगलादेशसाठी झालेल्या युद्धाला ४३ वर्ष पूर्ण.

नरेंद्र बेलसरे/ अकोला बांगलादेशच्या निर्मितीसाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये १९७१ साली झालेल्या सोळा दिवसाच्या युध्दाला मंगळवार, १६ डिसेंबर रोजी ४३ वर्ष पूर्ण होत आहेत. दोन्ही बाजुंनी तुफान गोळीबार, छिन्नविछीन्न झालेल्या मृतदेहांचे खच आणि अपरिमित हानी स्वत:च्या डोळय़ांनी पाहणारा या युद्धाचा साक्षीदार अकोला जिल्ह्यातील अंदुरा येथे वास्तव्यास आहे. स्वतंत्र बांगलादेशसाठी झालेल्या युद्धाला ४३ वर्षे पूर्ण झाली असली तरी, अंदुरा येथील माजी सैनिक नारायणराव साबळे यांचे डोळे युद्धाचे स्मरण झाले की, लगेच पाणावतात. आपल्या अकरा साथीदारांचे मृतदेह उचलण्याची दुर्देवी वेळ माझ्यावर यावी, यापेक्षा दुसरे दुर्देव कोणते, अशा शब्दात त्यांनी अश्रुंना वाट मोकळी करू न दिली. या युध्दात प्रत्यक्ष सहभागी झालेले नारायणराव साबळे यांच्या माहितीनुसार, ३ ते १६ डिसेंबरदरम्यान झालेल्या युध्दात, तसेच तत्पूर्वी पाकिस्तान व बांगलादेशात उद्भवलेल्या परिस्थितीत १५ लाखापेक्षा जास्त निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या युध्दात भारताचे ३ हजार ८४३ जवान शहीद झाले होते.या युध्दात प्राणाची बाजी लावणार्‍या मराठा बटालियनमध्ये नारायण साबळे यांचाही सहभाग होता. या बटालियनमधील लान्स नायक नारायण फाळके, यशवंत पवार, लक्ष्मण राणे, प्रभाकर काटकर, गजानन चव्हाण, मनगुटकर, बळवंत पाटील, तयप्पा नरवाडे, पी.एस.पाटील, दत्ता दळवी, मारोती जाधव आणि अशोक यादव यांना या युद्धात विरगती प्राप्त झाली. सैन्यातून परतल्यानंतर साबळे यांनी पोलिस दलात नोकरी केली. पोलिस दलातून सेवानवृत्त झाल्यानंतर, त्यांनी शेतीकडे लक्ष द्यायला सुरूवात केली. अंदुरा येथे स्वत:च्या कुटुंबासोबत राहणार्‍या साबळेंप्रती ग्रामस्थांमध्ये आदराची भावना आहे. *५४ सैनिक आजही बेपत्ता.युध्दसमाप्तीनंतरही भारताचे ५४ जवान आणि अधिकारी आजही बेपत्ता आहेत. भारताचे जवान आपल्या ताब्यात नसल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. या ५४ सैनिकांच्या कुटुंबांना सरकारकडून नवृत्ती वेतन दिले जात आहे.