शहरं
Join us  
Trending Stories
1
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
3
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
4
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
5
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? एसबीआय करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
6
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
7
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
8
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
9
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
10
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
11
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
12
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
13
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले
14
प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
15
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
16
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
17
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
18
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
19
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
20
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण

भारत- पाक युध्दाचा साक्षीदार अकोल्यात

By admin | Updated: December 16, 2014 01:05 IST

स्वतंत्र बांगलादेशसाठी झालेल्या युद्धाला ४३ वर्ष पूर्ण.

नरेंद्र बेलसरे/ अकोला बांगलादेशच्या निर्मितीसाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये १९७१ साली झालेल्या सोळा दिवसाच्या युध्दाला मंगळवार, १६ डिसेंबर रोजी ४३ वर्ष पूर्ण होत आहेत. दोन्ही बाजुंनी तुफान गोळीबार, छिन्नविछीन्न झालेल्या मृतदेहांचे खच आणि अपरिमित हानी स्वत:च्या डोळय़ांनी पाहणारा या युद्धाचा साक्षीदार अकोला जिल्ह्यातील अंदुरा येथे वास्तव्यास आहे. स्वतंत्र बांगलादेशसाठी झालेल्या युद्धाला ४३ वर्षे पूर्ण झाली असली तरी, अंदुरा येथील माजी सैनिक नारायणराव साबळे यांचे डोळे युद्धाचे स्मरण झाले की, लगेच पाणावतात. आपल्या अकरा साथीदारांचे मृतदेह उचलण्याची दुर्देवी वेळ माझ्यावर यावी, यापेक्षा दुसरे दुर्देव कोणते, अशा शब्दात त्यांनी अश्रुंना वाट मोकळी करू न दिली. या युध्दात प्रत्यक्ष सहभागी झालेले नारायणराव साबळे यांच्या माहितीनुसार, ३ ते १६ डिसेंबरदरम्यान झालेल्या युध्दात, तसेच तत्पूर्वी पाकिस्तान व बांगलादेशात उद्भवलेल्या परिस्थितीत १५ लाखापेक्षा जास्त निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या युध्दात भारताचे ३ हजार ८४३ जवान शहीद झाले होते.या युध्दात प्राणाची बाजी लावणार्‍या मराठा बटालियनमध्ये नारायण साबळे यांचाही सहभाग होता. या बटालियनमधील लान्स नायक नारायण फाळके, यशवंत पवार, लक्ष्मण राणे, प्रभाकर काटकर, गजानन चव्हाण, मनगुटकर, बळवंत पाटील, तयप्पा नरवाडे, पी.एस.पाटील, दत्ता दळवी, मारोती जाधव आणि अशोक यादव यांना या युद्धात विरगती प्राप्त झाली. सैन्यातून परतल्यानंतर साबळे यांनी पोलिस दलात नोकरी केली. पोलिस दलातून सेवानवृत्त झाल्यानंतर, त्यांनी शेतीकडे लक्ष द्यायला सुरूवात केली. अंदुरा येथे स्वत:च्या कुटुंबासोबत राहणार्‍या साबळेंप्रती ग्रामस्थांमध्ये आदराची भावना आहे. *५४ सैनिक आजही बेपत्ता.युध्दसमाप्तीनंतरही भारताचे ५४ जवान आणि अधिकारी आजही बेपत्ता आहेत. भारताचे जवान आपल्या ताब्यात नसल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. या ५४ सैनिकांच्या कुटुंबांना सरकारकडून नवृत्ती वेतन दिले जात आहे.