शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

भारत- पाक युध्दाचा साक्षीदार अकोल्यात

By admin | Updated: December 16, 2014 01:05 IST

स्वतंत्र बांगलादेशसाठी झालेल्या युद्धाला ४३ वर्ष पूर्ण.

नरेंद्र बेलसरे/ अकोला बांगलादेशच्या निर्मितीसाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये १९७१ साली झालेल्या सोळा दिवसाच्या युध्दाला मंगळवार, १६ डिसेंबर रोजी ४३ वर्ष पूर्ण होत आहेत. दोन्ही बाजुंनी तुफान गोळीबार, छिन्नविछीन्न झालेल्या मृतदेहांचे खच आणि अपरिमित हानी स्वत:च्या डोळय़ांनी पाहणारा या युद्धाचा साक्षीदार अकोला जिल्ह्यातील अंदुरा येथे वास्तव्यास आहे. स्वतंत्र बांगलादेशसाठी झालेल्या युद्धाला ४३ वर्षे पूर्ण झाली असली तरी, अंदुरा येथील माजी सैनिक नारायणराव साबळे यांचे डोळे युद्धाचे स्मरण झाले की, लगेच पाणावतात. आपल्या अकरा साथीदारांचे मृतदेह उचलण्याची दुर्देवी वेळ माझ्यावर यावी, यापेक्षा दुसरे दुर्देव कोणते, अशा शब्दात त्यांनी अश्रुंना वाट मोकळी करू न दिली. या युध्दात प्रत्यक्ष सहभागी झालेले नारायणराव साबळे यांच्या माहितीनुसार, ३ ते १६ डिसेंबरदरम्यान झालेल्या युध्दात, तसेच तत्पूर्वी पाकिस्तान व बांगलादेशात उद्भवलेल्या परिस्थितीत १५ लाखापेक्षा जास्त निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या युध्दात भारताचे ३ हजार ८४३ जवान शहीद झाले होते.या युध्दात प्राणाची बाजी लावणार्‍या मराठा बटालियनमध्ये नारायण साबळे यांचाही सहभाग होता. या बटालियनमधील लान्स नायक नारायण फाळके, यशवंत पवार, लक्ष्मण राणे, प्रभाकर काटकर, गजानन चव्हाण, मनगुटकर, बळवंत पाटील, तयप्पा नरवाडे, पी.एस.पाटील, दत्ता दळवी, मारोती जाधव आणि अशोक यादव यांना या युद्धात विरगती प्राप्त झाली. सैन्यातून परतल्यानंतर साबळे यांनी पोलिस दलात नोकरी केली. पोलिस दलातून सेवानवृत्त झाल्यानंतर, त्यांनी शेतीकडे लक्ष द्यायला सुरूवात केली. अंदुरा येथे स्वत:च्या कुटुंबासोबत राहणार्‍या साबळेंप्रती ग्रामस्थांमध्ये आदराची भावना आहे. *५४ सैनिक आजही बेपत्ता.युध्दसमाप्तीनंतरही भारताचे ५४ जवान आणि अधिकारी आजही बेपत्ता आहेत. भारताचे जवान आपल्या ताब्यात नसल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. या ५४ सैनिकांच्या कुटुंबांना सरकारकडून नवृत्ती वेतन दिले जात आहे.