शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

बटालियन कॅम्पच्या धर्तीवर वानचे पाणी नेणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:50 IST

प्रशांत विखे तेल्हारा: तालुक्याच्या ठिकाणी मंजूर झालेला राज्य राखीव बटालियन कॅम्प अचानक दुसरीकडे हलविल्याचा प्रकार घडला आहे. त्याच धर्तीवर ...

प्रशांत विखे

तेल्हारा: तालुक्याच्या ठिकाणी मंजूर झालेला राज्य राखीव बटालियन कॅम्प अचानक दुसरीकडे हलविल्याचा प्रकार घडला आहे. त्याच धर्तीवर वान धरणाचे पाणी पळवून नेण्याचा डाव तर नाही ना?, असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे; मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत पाणी नेऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

तालुक्यात राज्य राखीव बटालियन कॅम्प मंजूर झाला होता. त्यानंतर जागा हस्तांतरणची प्रक्रिया सुरू असतानाच कॅम्प दुसरीकडे हलविण्यात आला. स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले असते, तर कॅम्प दुसरीकडे गेला नसता. आता वानचे पाणी पेटले आहे. सध्या वानचे पाणी बाळापूरला नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाणी आरक्षण मंजुरी देण्याचा विषय हा जलसंपदा खात्याकडे असून, या जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडेच ते खाते आहे. पालकमंत्रीसुद्धा धरणात पाणी नसल्याने व स्थानिक शेतकऱ्यांचा सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात निर्माण होऊ शकतो, त्यासाठी नवीन कोणतीही पाणी पुरवठा योजना तयार करण्याच्या मानसिकतेमध्ये दिसत नाहीत. गतवेळीसुद्धा तालुक्यात राज्य राखिव बटालियन कॅम्प होऊ देण्याचे आश्वासनच नाही, तर मुख्यमंत्र्यांना पत्रसुद्धा दिले होते. तरीही कॅम्प दुसरीकडे हलविण्यात आला. आता शेतकरी धरणातील पाणी जाऊ न देण्यासाठी व अकोला येथील अमृत योजनेसाठी मंजूर झालेले पाणी आरक्षण रद्द करण्यासाठी आक्रमक झाले आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनासुद्धा निवेदन दिले आहे, तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात बैठकांचे आयोजन करून पुढील आंदोलनची रूपरेषा ठरविण्यात येत असल्याचे चित्र आहे.