शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

बटालियन कॅम्पच्या धर्तीवर वानचे पाणी नेणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:50 IST

प्रशांत विखे तेल्हारा: तालुक्याच्या ठिकाणी मंजूर झालेला राज्य राखीव बटालियन कॅम्प अचानक दुसरीकडे हलविल्याचा प्रकार घडला आहे. त्याच धर्तीवर ...

प्रशांत विखे

तेल्हारा: तालुक्याच्या ठिकाणी मंजूर झालेला राज्य राखीव बटालियन कॅम्प अचानक दुसरीकडे हलविल्याचा प्रकार घडला आहे. त्याच धर्तीवर वान धरणाचे पाणी पळवून नेण्याचा डाव तर नाही ना?, असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे; मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत पाणी नेऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

तालुक्यात राज्य राखीव बटालियन कॅम्प मंजूर झाला होता. त्यानंतर जागा हस्तांतरणची प्रक्रिया सुरू असतानाच कॅम्प दुसरीकडे हलविण्यात आला. स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले असते, तर कॅम्प दुसरीकडे गेला नसता. आता वानचे पाणी पेटले आहे. सध्या वानचे पाणी बाळापूरला नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाणी आरक्षण मंजुरी देण्याचा विषय हा जलसंपदा खात्याकडे असून, या जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडेच ते खाते आहे. पालकमंत्रीसुद्धा धरणात पाणी नसल्याने व स्थानिक शेतकऱ्यांचा सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात निर्माण होऊ शकतो, त्यासाठी नवीन कोणतीही पाणी पुरवठा योजना तयार करण्याच्या मानसिकतेमध्ये दिसत नाहीत. गतवेळीसुद्धा तालुक्यात राज्य राखिव बटालियन कॅम्प होऊ देण्याचे आश्वासनच नाही, तर मुख्यमंत्र्यांना पत्रसुद्धा दिले होते. तरीही कॅम्प दुसरीकडे हलविण्यात आला. आता शेतकरी धरणातील पाणी जाऊ न देण्यासाठी व अकोला येथील अमृत योजनेसाठी मंजूर झालेले पाणी आरक्षण रद्द करण्यासाठी आक्रमक झाले आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनासुद्धा निवेदन दिले आहे, तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात बैठकांचे आयोजन करून पुढील आंदोलनची रूपरेषा ठरविण्यात येत असल्याचे चित्र आहे.