शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बटालियन कॅम्पच्या धर्तीवर वानचे पाणी नेणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:50 IST

प्रशांत विखे तेल्हारा: तालुक्याच्या ठिकाणी मंजूर झालेला राज्य राखीव बटालियन कॅम्प अचानक दुसरीकडे हलविल्याचा प्रकार घडला आहे. त्याच धर्तीवर ...

प्रशांत विखे

तेल्हारा: तालुक्याच्या ठिकाणी मंजूर झालेला राज्य राखीव बटालियन कॅम्प अचानक दुसरीकडे हलविल्याचा प्रकार घडला आहे. त्याच धर्तीवर वान धरणाचे पाणी पळवून नेण्याचा डाव तर नाही ना?, असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे; मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत पाणी नेऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

तालुक्यात राज्य राखीव बटालियन कॅम्प मंजूर झाला होता. त्यानंतर जागा हस्तांतरणची प्रक्रिया सुरू असतानाच कॅम्प दुसरीकडे हलविण्यात आला. स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले असते, तर कॅम्प दुसरीकडे गेला नसता. आता वानचे पाणी पेटले आहे. सध्या वानचे पाणी बाळापूरला नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाणी आरक्षण मंजुरी देण्याचा विषय हा जलसंपदा खात्याकडे असून, या जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडेच ते खाते आहे. पालकमंत्रीसुद्धा धरणात पाणी नसल्याने व स्थानिक शेतकऱ्यांचा सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात निर्माण होऊ शकतो, त्यासाठी नवीन कोणतीही पाणी पुरवठा योजना तयार करण्याच्या मानसिकतेमध्ये दिसत नाहीत. गतवेळीसुद्धा तालुक्यात राज्य राखिव बटालियन कॅम्प होऊ देण्याचे आश्वासनच नाही, तर मुख्यमंत्र्यांना पत्रसुद्धा दिले होते. तरीही कॅम्प दुसरीकडे हलविण्यात आला. आता शेतकरी धरणातील पाणी जाऊ न देण्यासाठी व अकोला येथील अमृत योजनेसाठी मंजूर झालेले पाणी आरक्षण रद्द करण्यासाठी आक्रमक झाले आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनासुद्धा निवेदन दिले आहे, तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात बैठकांचे आयोजन करून पुढील आंदोलनची रूपरेषा ठरविण्यात येत असल्याचे चित्र आहे.