शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीसाठी विद्यार्थ्यांचा ओढा ग्रामीण भागात कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 11:19 IST

Education News : अनेक विद्यार्थी शहरी महाविद्यालयांमध्ये प्रवेश न घेता ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात.

ठळक मुद्देशहरी महाविद्यालयांमधील जागा राहतात रिक्त कोरोनामुळे बाहेरगावांतील विद्यार्थ्यांची पाठ

अकोला : नुकताच इयत्ता दहावीचा निकाल लागला. आता अकरावी प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. सीईटीच्या माध्यमातून अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. परंतु, अनेक विद्यार्थी शहरी महाविद्यालयांमध्ये प्रवेश न घेता ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात. कोरोनामुळे बाहेरगावांतील आणि परजिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी अकोल्याकडे सध्या पाठ फिरविली आहे. तसेच ग्रामीण भागासह शहरी भागातील विद्यार्थ्यांचा ओढासुद्धा ग्रामीण भागाकडे वळत आहे. दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा-महाविद्यालये बंद आहेत. कोरोनाची झळ शिक्षण क्षेत्रालाही पोहोचली आहे. शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी यायचे. यासोबतच बाहेरगावांतील आणि परजिल्ह्यांतील विद्यार्थीसुद्धा यायचे. परंतु, आता त्याला ब्रेक बसला आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या हजारो जागा रिक्त राहत आहेत. शहरांमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतल्यास तासिकांना ७५ टक्के हजेरी द्यावी लागते. प्रात्यक्षिके करावी लागतात. गृहपाठ करावा लागतो. ही भानगड नको म्हणून विद्यार्थी ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये पळ काढतात. ग्रामीण भागात एकदा प्रवेश घेतला तर, तासिकांना जाण्याची तसदी नाही. केवळ प्रात्यक्षिक परीक्षांपुरते महाविद्यालयात जायचे ही मानसिकता असल्यामुळे विद्यार्थ्यांचा ग्रामीण भागाकडे कल वाढत आहे.

शहरात अकरावी प्रवेश देणारी कनिष्ठ महाविद्यालये- ५४

एकूण जागा- ८९५५

गेल्या वर्षी किती अर्ज आले- ४७२५

किती जणांनी प्रवेश घेतला- ४४२६

किती जागा रिक्त राहिल्या- ४५२९

अकरावीसाठी गावांत प्रवेश का?

विद्यार्थी अकरावीला सहजतेने प्रवेश घेतात. बारावीचे वर्ष महत्त्वाचे असल्यामुळे वैद्यकीय व अभियांत्रिकीची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून खासगी शिकवणी वर्गांमध्ये प्रवेश घेतात. त्यामुळे येथील तासिकांना उपस्थित राहता यावे यासाठी विद्यार्थी अकरावीसाठी गावांतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात. तासिकांना जाण्याची गरज नाही. केवळ प्रात्यक्षिकला कॉलेजमध्ये गेले तर भागते. याउलट शहरी कॉलेजमध्ये ७५ टक्के उपस्थिती, प्रात्यक्षिकांना हजेरी लावावी लागते. त्यामुळे गावांमधील कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थी पसंती देतात.

 

म्हणून घेतला गावांत प्रवेश

बारावीचे वर्ष महत्त्वाचे असल्याने, नीट, सीईटीची तयारी करावी लागते. शिकवणी वर्ग, अभ्यासासाठी वेळ मिळावा यासाठी ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. शहरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतल्यास काही प्रमाणात का होईना, हजेरी द्यावी लागते.

-श्रेयश गदाधर, विद्यार्थी

गावांतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला. दररोज जाण्याची गरज नाही. केवळ प्रात्यक्षिकांना बोलाविले जाते. शिकवणी, अभ्यासाला पुरेसा वेळ मिळतो. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे ग्रामीण भागातील महाविद्यालय प्रवेशाच्या दृष्टीने सुरक्षित आहेत.

-गौरव कवडकार, विद्यार्थी

 

अकरावीसाठी ग्रामीण भागात प्रवेश घेण्याचे प्रमाण एवढे मोठे नाही. कोरोनामुळे बाहेरगाव, परजिल्ह्यातील विद्यार्थी येत नसल्यामुळे शहरातील महाविद्यालयांमधील जागा रिक्त राहत आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाने अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवावी.

-प्रा. विवेक डवरे, संस्थाचालक

कोरोनामुळे शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे. यापूर्वी परजिल्ह्यासोबतच परगावचे विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी यायचे. परंतु, कोरोनामुळे विद्यार्थी त्यांच्या गावी, परिसरातच प्रवेश घेत आहेत. तसेच ग्रामीण भागातही विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यामुळे शहरातील महाविद्यालयांमधील जागा रिक्त राहतात.

-पुष्पा गुलवाडे, संस्थाचालक

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र