शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
8
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
9
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
10
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
11
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
12
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
13
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
14
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
15
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
16
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
17
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
18
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
19
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
20
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?

अकरावीसाठी विद्यार्थ्यांचा ओढा ग्रामीण भागात कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 11:19 IST

Education News : अनेक विद्यार्थी शहरी महाविद्यालयांमध्ये प्रवेश न घेता ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात.

ठळक मुद्देशहरी महाविद्यालयांमधील जागा राहतात रिक्त कोरोनामुळे बाहेरगावांतील विद्यार्थ्यांची पाठ

अकोला : नुकताच इयत्ता दहावीचा निकाल लागला. आता अकरावी प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. सीईटीच्या माध्यमातून अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. परंतु, अनेक विद्यार्थी शहरी महाविद्यालयांमध्ये प्रवेश न घेता ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात. कोरोनामुळे बाहेरगावांतील आणि परजिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी अकोल्याकडे सध्या पाठ फिरविली आहे. तसेच ग्रामीण भागासह शहरी भागातील विद्यार्थ्यांचा ओढासुद्धा ग्रामीण भागाकडे वळत आहे. दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा-महाविद्यालये बंद आहेत. कोरोनाची झळ शिक्षण क्षेत्रालाही पोहोचली आहे. शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी यायचे. यासोबतच बाहेरगावांतील आणि परजिल्ह्यांतील विद्यार्थीसुद्धा यायचे. परंतु, आता त्याला ब्रेक बसला आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या हजारो जागा रिक्त राहत आहेत. शहरांमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतल्यास तासिकांना ७५ टक्के हजेरी द्यावी लागते. प्रात्यक्षिके करावी लागतात. गृहपाठ करावा लागतो. ही भानगड नको म्हणून विद्यार्थी ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये पळ काढतात. ग्रामीण भागात एकदा प्रवेश घेतला तर, तासिकांना जाण्याची तसदी नाही. केवळ प्रात्यक्षिक परीक्षांपुरते महाविद्यालयात जायचे ही मानसिकता असल्यामुळे विद्यार्थ्यांचा ग्रामीण भागाकडे कल वाढत आहे.

शहरात अकरावी प्रवेश देणारी कनिष्ठ महाविद्यालये- ५४

एकूण जागा- ८९५५

गेल्या वर्षी किती अर्ज आले- ४७२५

किती जणांनी प्रवेश घेतला- ४४२६

किती जागा रिक्त राहिल्या- ४५२९

अकरावीसाठी गावांत प्रवेश का?

विद्यार्थी अकरावीला सहजतेने प्रवेश घेतात. बारावीचे वर्ष महत्त्वाचे असल्यामुळे वैद्यकीय व अभियांत्रिकीची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून खासगी शिकवणी वर्गांमध्ये प्रवेश घेतात. त्यामुळे येथील तासिकांना उपस्थित राहता यावे यासाठी विद्यार्थी अकरावीसाठी गावांतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात. तासिकांना जाण्याची गरज नाही. केवळ प्रात्यक्षिकला कॉलेजमध्ये गेले तर भागते. याउलट शहरी कॉलेजमध्ये ७५ टक्के उपस्थिती, प्रात्यक्षिकांना हजेरी लावावी लागते. त्यामुळे गावांमधील कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थी पसंती देतात.

 

म्हणून घेतला गावांत प्रवेश

बारावीचे वर्ष महत्त्वाचे असल्याने, नीट, सीईटीची तयारी करावी लागते. शिकवणी वर्ग, अभ्यासासाठी वेळ मिळावा यासाठी ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. शहरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतल्यास काही प्रमाणात का होईना, हजेरी द्यावी लागते.

-श्रेयश गदाधर, विद्यार्थी

गावांतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला. दररोज जाण्याची गरज नाही. केवळ प्रात्यक्षिकांना बोलाविले जाते. शिकवणी, अभ्यासाला पुरेसा वेळ मिळतो. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे ग्रामीण भागातील महाविद्यालय प्रवेशाच्या दृष्टीने सुरक्षित आहेत.

-गौरव कवडकार, विद्यार्थी

 

अकरावीसाठी ग्रामीण भागात प्रवेश घेण्याचे प्रमाण एवढे मोठे नाही. कोरोनामुळे बाहेरगाव, परजिल्ह्यातील विद्यार्थी येत नसल्यामुळे शहरातील महाविद्यालयांमधील जागा रिक्त राहत आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाने अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवावी.

-प्रा. विवेक डवरे, संस्थाचालक

कोरोनामुळे शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे. यापूर्वी परजिल्ह्यासोबतच परगावचे विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी यायचे. परंतु, कोरोनामुळे विद्यार्थी त्यांच्या गावी, परिसरातच प्रवेश घेत आहेत. तसेच ग्रामीण भागातही विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यामुळे शहरातील महाविद्यालयांमधील जागा रिक्त राहतात.

-पुष्पा गुलवाडे, संस्थाचालक

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र