शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

अकरावीसाठी विद्यार्थ्यांचा ओढा ग्रामीण भागात कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 11:19 IST

Education News : अनेक विद्यार्थी शहरी महाविद्यालयांमध्ये प्रवेश न घेता ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात.

ठळक मुद्देशहरी महाविद्यालयांमधील जागा राहतात रिक्त कोरोनामुळे बाहेरगावांतील विद्यार्थ्यांची पाठ

अकोला : नुकताच इयत्ता दहावीचा निकाल लागला. आता अकरावी प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. सीईटीच्या माध्यमातून अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. परंतु, अनेक विद्यार्थी शहरी महाविद्यालयांमध्ये प्रवेश न घेता ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात. कोरोनामुळे बाहेरगावांतील आणि परजिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी अकोल्याकडे सध्या पाठ फिरविली आहे. तसेच ग्रामीण भागासह शहरी भागातील विद्यार्थ्यांचा ओढासुद्धा ग्रामीण भागाकडे वळत आहे. दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा-महाविद्यालये बंद आहेत. कोरोनाची झळ शिक्षण क्षेत्रालाही पोहोचली आहे. शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी यायचे. यासोबतच बाहेरगावांतील आणि परजिल्ह्यांतील विद्यार्थीसुद्धा यायचे. परंतु, आता त्याला ब्रेक बसला आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या हजारो जागा रिक्त राहत आहेत. शहरांमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतल्यास तासिकांना ७५ टक्के हजेरी द्यावी लागते. प्रात्यक्षिके करावी लागतात. गृहपाठ करावा लागतो. ही भानगड नको म्हणून विद्यार्थी ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये पळ काढतात. ग्रामीण भागात एकदा प्रवेश घेतला तर, तासिकांना जाण्याची तसदी नाही. केवळ प्रात्यक्षिक परीक्षांपुरते महाविद्यालयात जायचे ही मानसिकता असल्यामुळे विद्यार्थ्यांचा ग्रामीण भागाकडे कल वाढत आहे.

शहरात अकरावी प्रवेश देणारी कनिष्ठ महाविद्यालये- ५४

एकूण जागा- ८९५५

गेल्या वर्षी किती अर्ज आले- ४७२५

किती जणांनी प्रवेश घेतला- ४४२६

किती जागा रिक्त राहिल्या- ४५२९

अकरावीसाठी गावांत प्रवेश का?

विद्यार्थी अकरावीला सहजतेने प्रवेश घेतात. बारावीचे वर्ष महत्त्वाचे असल्यामुळे वैद्यकीय व अभियांत्रिकीची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून खासगी शिकवणी वर्गांमध्ये प्रवेश घेतात. त्यामुळे येथील तासिकांना उपस्थित राहता यावे यासाठी विद्यार्थी अकरावीसाठी गावांतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात. तासिकांना जाण्याची गरज नाही. केवळ प्रात्यक्षिकला कॉलेजमध्ये गेले तर भागते. याउलट शहरी कॉलेजमध्ये ७५ टक्के उपस्थिती, प्रात्यक्षिकांना हजेरी लावावी लागते. त्यामुळे गावांमधील कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थी पसंती देतात.

 

म्हणून घेतला गावांत प्रवेश

बारावीचे वर्ष महत्त्वाचे असल्याने, नीट, सीईटीची तयारी करावी लागते. शिकवणी वर्ग, अभ्यासासाठी वेळ मिळावा यासाठी ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. शहरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतल्यास काही प्रमाणात का होईना, हजेरी द्यावी लागते.

-श्रेयश गदाधर, विद्यार्थी

गावांतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला. दररोज जाण्याची गरज नाही. केवळ प्रात्यक्षिकांना बोलाविले जाते. शिकवणी, अभ्यासाला पुरेसा वेळ मिळतो. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे ग्रामीण भागातील महाविद्यालय प्रवेशाच्या दृष्टीने सुरक्षित आहेत.

-गौरव कवडकार, विद्यार्थी

 

अकरावीसाठी ग्रामीण भागात प्रवेश घेण्याचे प्रमाण एवढे मोठे नाही. कोरोनामुळे बाहेरगाव, परजिल्ह्यातील विद्यार्थी येत नसल्यामुळे शहरातील महाविद्यालयांमधील जागा रिक्त राहत आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाने अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवावी.

-प्रा. विवेक डवरे, संस्थाचालक

कोरोनामुळे शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे. यापूर्वी परजिल्ह्यासोबतच परगावचे विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी यायचे. परंतु, कोरोनामुळे विद्यार्थी त्यांच्या गावी, परिसरातच प्रवेश घेत आहेत. तसेच ग्रामीण भागातही विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यामुळे शहरातील महाविद्यालयांमधील जागा रिक्त राहतात.

-पुष्पा गुलवाडे, संस्थाचालक

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र