शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

सत्तेत असताना पवारांनी का नाही सोडविले शेतकऱ्यांचे प्रश्न - बच्चू कडूंचा सवाल

By atul.jaiswal | Updated: December 6, 2017 15:52 IST

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आता शेतकरी व त्यांच्या प्रश्नांचा मोठा पुळका येत आहे. याच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशाचे कृषीमंत्रीपद भूषविले आहे, तसेच त्यांचा पक्ष राज्यातील सत्तेतही वाटेकरी होता. तेव्हा शरद पवार व इतर राष्ट्रवादी नेत्यांनी शेतकºयांचे प्रश्न सोडविण्याची हिंमत का दाखविली नाही, आताच त्यांना शेतकºयांचा एवढा पुळका ...

ठळक मुद्देरात्रभर आंदोलनस्थळी बच्चू कडूंनी मांडले ठाण राज्य सरकावर केली बोचरी टीका

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आता शेतकरी व त्यांच्या प्रश्नांचा मोठा पुळका येत आहे. याच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशाचे कृषीमंत्रीपद भूषविले आहे, तसेच त्यांचा पक्ष राज्यातील सत्तेतही वाटेकरी होता. तेव्हा शरद पवार व इतर राष्ट्रवादी नेत्यांनी शेतकºयांचे प्रश्न सोडविण्याची हिंमत का दाखविली नाही, आताच त्यांना शेतकºयांचा एवढा पुळका कशासाठी येत आहे, अशी बोचरी टीका प्रहार चे नेते आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी येथे केला.येथील पोलिस मुख्यालय परिसरात माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या शेतकºयांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी शेतकºयांना संबोधित करताना चौफेर टीका केली. आजवरच्या कोणत्याही सरकारने शेतकºयांच्या समस्या निकाली काढण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. अस्मानी व सुल्तानी संकटांनी शेतकरी नेहमीच्या नागविल्या गेला आहे. परंतु, सत्ताधाºयांना त्याच्याशी काही देणे-घेणे नाही. संकटांनी पिचलेला शेतकरी आत्महत्या करीत असतानाही सरकार शांत आहे. शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी आता स्वत: शेतकºयांनीच पुढे यायला हवे. या सरकारकडून कोणतीही अपेक्षा केली जाऊ शकत नाही. शेतकºयांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही किसान आर्मी काढत आहोत. यापुढे कोणत्याही शेतकºयाने हिंमत न हारता परिस्थितीचा सामना करायला हवा. कोणाच्याही मनात आत्महत्येचा विचार डोकावत असेल, तर त्या शेतकºयांने मला केवळ एक मिसकॉल द्यावा, त्यांच्या हक्कसाठी मी प्राणाची बाजी लावण्यासही तयार आहे.यशवंत सिन्हा यांनी अकोल्यात सुरु केलेल्या आंदोलनाचे कौतुक करताना हे आंदोलन शेतकºयाचे आहे. या आंदोलनात शेतकºयांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे, असे आवाहनही यावेळी कडू यांनी केले.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूAkola cityअकोला शहरagitationआंदोलन