शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

वऱ्हाडचा सिंचन अनुशेष निकाली कधी निघणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 18:50 IST

अकोला : विदर्भातील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. पण शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंून आहे. म्हणजेच जवळपास ९० टक्के क्षेत्र हे कोरडवाहू आहे. त्यातही वऱ्हाड म्हणजे पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्याची अवस्था वाईट आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला : विदर्भातील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. पण शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंून आहे. म्हणजेच जवळपास ९० टक्के क्षेत्र हे कोरडवाहू आहे. त्यातही वऱ्हाड म्हणजे पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्याची अवस्था वाईट आहे. हेच पाच जिल्हे राज्यात शेतकरी आत्महत्या म्हणून ओळखले जातात.पण कायमस्वरू पी सिंचनाची व्यवस्था निर्माण करण्यात अद्याप शासनाला यश आले नाही. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक,सामाजिक स्थितीत सुधारणा झाली नाही. तत्कालीन राज्यपालांनी वऱ्हाडातील १०२ सिंचन प्रकल्प अनुशेष यादी समाविष्ठ करू न या प्रकल्पाची कामे जलदगतीने होण्याचीसाठीचे आदेश काढले होते.पण त्याकडेही दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.विदर्भात जवळपास १४ मोठे, ३३ मध्यम व वऱ्हाडातील प्रकल्पांची कामे अपूर्ण आहेत. पण सातत्याने या प्रकल्पांच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. पश्चिम विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या बांधकामाकरीता निधीची पूर्तता केली जाते; परंतु सुधारित प्रशासकीय मान्यता दिली जात नाही. पश्चिम विदर्भाचा (वऱ्हाड) विचार केल्यास सिंचन प्रकल्पांच्या कामासाठी मागणीनुसार निधी उपलब्ध झाला नसल्याने २ लाख ४७ हजार हेक्टर सिंचन अनुशेष होता. त्यात सुधारणा किती झाली. हा संशोधनाचा, चिंतेचा विषय आहे.अनुशेष बघीतल्यास जून १९९४ व जून २००७ अखेर अमरावती विभागातील सिंचनाचा भौतिक अनुशेष ३.४९४ लक्ष हेक्टर रब्बी समतुल्य होता. २०१०-११ मधील हेच अनुशेषाचे आकडे बघितल्यास अमरावती जिल्ह्याचा भौतिक अनुशेष ८२ हजार हेक्टर आहे. अकोला ९६ हजार हेक्टर, बुलडाणा ६९ हजार हेक्टर मिळून २ लाख ४७ हजार हेक्टर अनुशेष कायम आहे. १९९४ ते २०११ पर्यंत केवळ ५०,४९४ हेक्टर क्षेत्रावरील अनुशेष निकाली निघाला. राज्याच्या उर्वरित प्रदेशाच्या तुलनेत ही गती कासवापेक्षाही कमी आहे. मागील सात वर्षात यात अपेक्षीत वाढ झाली नाही. त्याचा परिणाम आपण बघत आहोच.वऱ्हाडात अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी जास्त आहे. पावसाचे दिवसही कमी झाले आहेत.१८ तासात अर्धा पावसाळ््याचा पाऊस पडून जातो. या काळाता पडणाºया पावसाचे पाणी सरळ वाहून जात असल्याचे चित्र प्रत्येक पावसळ््यात आपण बघतो.कारण हे पाणी साठवण्यासाठीची व्यवस्थाच आपल्याकडे अपुरी आहे. म्हणजेच भूपृष्ठावर जलसाठा साठवणूक करण्यासाठीची व्यवस्था कमी पडते.असे असताना जी धरण निर्माणाधीन आहेत ती देखील आपण पुर्ण करत नाही.वऱ्हाडातील जिगाव प्रकल्प पूर्ण झाल्यास खारपाणपट्ट्यात एक लाख हेक्टरपर्यंत सिंंचन क्षमता निर्माण होईल. तथापि या प्रकल्पाच्या बांधकामास उशीर होत असल्याने आजमितीस या प्रकल्पाची किंमत ५ हजार ७०८ कोटींच्यावर पोहोचली आहे. अकोला जिल्ह्यातील नेरधामणा, काटेपूर्णा, घुंगशी, उमा बॅरेजेसची कामे अर्धवटच आहेत. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा प्रकल्पाची पाटचाºयाची कामे झाली का हाही विषय आहे. तसेच राज्यपालांच्या निर्देशानुसार १०२ प्रकल्प अनुशेष कार्यक्रमात टाकले आहेत. यातील १५ प्रकल्पांची कामे पुर्ण केव्हर होती हाही प्रश्न निर्माण झाला आहे. मार्गावर आहेत.दुसरीकडे विदर्भाचा सिंचन अनुशेष भरू न काढणे म्हणजेच सिंचनाच्या बांधकामासाठी निधीची पुर्तता करण्यासाठी घोषणा दरवर्षीच्या अर्थसंकल्पात केली जाते. परंतु अधिनियम ४३ नुसार प्रदेशनिहाय योजना व योजनेत्तर विकास खर्चाची आकडेवारी दरवर्षी जाहीर करणे गरजेचे आहे. तसेच अर्थसंकल्पातील पारदर्शकतेची खात्री होेण्यासाठी ही माहिती आॅनलाइन देण्यात यावी; परंतु तसे होत नसल्याचे चित्र आहे. तसेच पश्चिम विदर्भातील प्रकल्पासाठी निधीची घोषणा करायची आणि प्रशासकीय मान्यताच द्यायची नाही, हे दुटप्पी धोरण नको.

 

टॅग्स :AkolaअकोलाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प