शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

राज्यात १३ लाख हेक्टर क्षेत्रातील गहू काढणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 11:32 IST

Wheat harvested सिंचन व निसर्गाची साथ लाभल्याने पीक जोरदार व उत्पादनही जोमदार झाले आहे.

ठळक मुद्देपीक जोरदार, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवितचांगला दर मिळण्याची अपेक्षा

अकोला : उन्हाची तीव्रता जाणवू लागलेल्या मार्च महिन्यात गहू काढणीला वेग येत आहे. रब्बीत गहू पिकाची सरासरी आठ लाख ७५ हजार ६३३ हेक्टर क्षेत्रात लागवड अपेक्षित होती. मात्र, यावर्षी विक्रमी १३ लाख सहा हजार २३५ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली. आता हे पीक काढणीला असून, बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात गहू आला आहे. पुरेसे सिंचन व निसर्गाची साथ लाभल्याने पीक जोरदार व उत्पादनही जोमदार झाले आहे. त्यामुळे राज्यातील गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे.

अवकाळीची वक्रदृष्टी पडल्याने खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. वेळोवेळी बदलणाऱ्या वातावरणामुळे शेतकरी रब्बी हंगाम लवकर संपविण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे हरभरानंतर आता त्याची गहू काढणीसाठी लगबग सुरू आहे. राज्यातील काही भागात गहू काढणी सुरू झाली असून उशिरा पेरणी झालेला गहू काढणे बाकी आहे. यावर्षी सरासरी पाऊस झाल्याने सिंचनासाठी भरपूर पाणी उपलब्ध होते. या पाण्याच्या भरवशावर शेतकऱ्यांचे गहू पीक चांगले झाले. या पिकाला चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. तसे झाल्यास खरिपाच्या तयारीसाठी आर्थिक तडजोड शक्य होईल. त्यातच पंजाब, हरियाणा या ठिकाणच्या हार्वेस्टर मशीन मोठ्या प्रमाणात आल्याने स्थानिक मशीनवाल्यांपुढे अडचणी निर्माण होत आहे.

 

हार्वेस्टरने काढणीला प्राधान्य

हार्वेस्टर मशीनव्दारे एक एकर गहू काढणीसाठी १५०० ते १८०० रुपये घेतले जातात. अर्ध्या तासातच गहू काढून मिळत असल्याने शेतकऱ्यांचा वेळ व कष्ट वाया जात नाही. त्यामुळे शेतकरी यंत्राच्या साहाय्याने गहू काढणीला प्राधान्य देत आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAkolaअकोला