शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

रब्बी हंगामासाठी १ डिसेंबरपासून सोडणार वान धरणाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 12:31 IST

पाणी १ डिसेंबरपासून मिळणार असल्याचे समजल्याने शेतकरी रब्बी हंगामात पिके घेण्याच्या तयारीला लागणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : वान हनुमान सागर प्रकल्पातून तेल्हारा तालुक्यासह संग्रामपूर तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांना १ डिसेंबरपासून पाणी मिळणार आहे. तेल्हारा येथे वान अधिकारी व शेतकरी यांच्या सभेत अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.यावर्षी तेल्हारा तालुक्यात पाऊस जास्त झाल्याने वान हनुमान सागर धरण काही दिवसांतच शंभर टक्के भरले आहे. सततच्या पावसाने बरेच वेळा विसर्ग करावा लागला आहे. त्यामुळे वान हनुमान प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी मिळेल ही आशा होती. तरी अमृत योजनेमुळे पाणी मिळते की नाही, ही शंका असताना आजच्या सभेत पाणी १ डिसेंबरपासून मिळणार असल्याचे समजल्याने शेतकरी रब्बी हंगामात पिके घेण्याच्या तयारीला लागणार आहेत. यावर्षी तालुक्यातील शेतकºयांच्या हाती खरिपाचे पीक लागले नाही. सततचा पाऊस अतिवृष्टीमुळे पीक उत्पादन नगण्य झाले. तसेच परतीच्या पावसामुळे होते नव्हती पिके हातची गेली. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. आता पर्याय नसल्याने शेतकरी रब्बी तयारीत होते.वान धरणाचे पाणी मिळाले तर पुढे काहीतरी पीक पेरता येईल, ही आशा शेतकºयांना होती. तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्प अधिकारी कार्यालय तेल्हारा येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत लाभधारक शेतकºयांनी मोठी हजेरी लावली. यामध्ये वान धरणाचे पाणी मिळावे, अशी मागणी केल्यानंतर अधिकाºयांनी याला संमती देऊन येत्या १ डिसेंबरपासून रब्बी हंगामातील गहू, भुईमूग, हरभरा आदी पिकांना पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकºयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकºयांना शासनाने हरभरा, गहू बियाणे व खत मोफत देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.  दुष्काळी परिस्थिती पाहता सर्व पाणी वापर संस्थांच्यावतीने मागील पाणी पट्टी शासनाने माफ करावी व पुढील नियोजन नवीन सोसायट्यांनी करण्यास सहकार्य करावे.-हरिदास वाघ, शेतकरी, हिंगणी.

टॅग्स :AkolaअकोलाWan Projectवान प्रकल्पIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पagricultureशेती