शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगामासाठी १ डिसेंबरपासून सोडणार वान धरणाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 12:31 IST

पाणी १ डिसेंबरपासून मिळणार असल्याचे समजल्याने शेतकरी रब्बी हंगामात पिके घेण्याच्या तयारीला लागणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : वान हनुमान सागर प्रकल्पातून तेल्हारा तालुक्यासह संग्रामपूर तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांना १ डिसेंबरपासून पाणी मिळणार आहे. तेल्हारा येथे वान अधिकारी व शेतकरी यांच्या सभेत अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.यावर्षी तेल्हारा तालुक्यात पाऊस जास्त झाल्याने वान हनुमान सागर धरण काही दिवसांतच शंभर टक्के भरले आहे. सततच्या पावसाने बरेच वेळा विसर्ग करावा लागला आहे. त्यामुळे वान हनुमान प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी मिळेल ही आशा होती. तरी अमृत योजनेमुळे पाणी मिळते की नाही, ही शंका असताना आजच्या सभेत पाणी १ डिसेंबरपासून मिळणार असल्याचे समजल्याने शेतकरी रब्बी हंगामात पिके घेण्याच्या तयारीला लागणार आहेत. यावर्षी तालुक्यातील शेतकºयांच्या हाती खरिपाचे पीक लागले नाही. सततचा पाऊस अतिवृष्टीमुळे पीक उत्पादन नगण्य झाले. तसेच परतीच्या पावसामुळे होते नव्हती पिके हातची गेली. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. आता पर्याय नसल्याने शेतकरी रब्बी तयारीत होते.वान धरणाचे पाणी मिळाले तर पुढे काहीतरी पीक पेरता येईल, ही आशा शेतकºयांना होती. तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्प अधिकारी कार्यालय तेल्हारा येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत लाभधारक शेतकºयांनी मोठी हजेरी लावली. यामध्ये वान धरणाचे पाणी मिळावे, अशी मागणी केल्यानंतर अधिकाºयांनी याला संमती देऊन येत्या १ डिसेंबरपासून रब्बी हंगामातील गहू, भुईमूग, हरभरा आदी पिकांना पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकºयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकºयांना शासनाने हरभरा, गहू बियाणे व खत मोफत देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.  दुष्काळी परिस्थिती पाहता सर्व पाणी वापर संस्थांच्यावतीने मागील पाणी पट्टी शासनाने माफ करावी व पुढील नियोजन नवीन सोसायट्यांनी करण्यास सहकार्य करावे.-हरिदास वाघ, शेतकरी, हिंगणी.

टॅग्स :AkolaअकोलाWan Projectवान प्रकल्पIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पagricultureशेती