शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
4
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
5
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
6
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
7
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
8
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
9
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
10
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
11
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
12
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
13
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
14
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
15
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
16
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
17
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
18
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
19
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
20
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठा योजनांच्या वीज देयकांचा टंचाई निधीतून भागविणार खर्च!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 12:31 IST

अकोला : राज्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या भागातील नळ पाणी पुरवठा योजनांच्या वीज देयकांचा खर्च टंचाई निधीतून भागविण्यात येणार आहे. त्यासाठी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसाठी शासनामार्फत चार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

- संतोष येलकरअकोला : राज्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या भागातील नळ पाणी पुरवठा योजनांच्या वीज देयकांचा खर्च टंचाई निधीतून भागविण्यात येणार आहे. त्यासाठी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसाठी शासनामार्फत चार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.राज्यात दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या क्षेत्रातील ग्रामीण आणि नागरी भागातील ज्या पाणी पुरवठा योजना थकीत विद्युत देयकांची रक्कम भरली नसल्याने बंद आहेत तसेच या पाणी पुरवठा योजना सुरू केल्यानंतर लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होऊ शकतो, अशा पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांच्या मुद्दलपैकी पाच टक्के रक्कम शासनामार्फत टंचाई निधीतून उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील २९ जिल्ह्यांतील ग्रामीण आणि नागरी भागातील पाणी पुरवठा योजनांच्या नोव्हेंबर २०१८ ते जून २०१९ या आठ महिन्यांच्या कालावधीतील वीज देयकांचा खर्च भागविण्यासाठी टंचाई निधीतून २४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास १७ जानेवारीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्ह्यांसाठी चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. उपलब्ध निधीतून दुष्काळी भागातील पाणी पुरवठा योजनांच्या वीज देयकांचा खर्च भागविण्यात येणार आहे.विभागात जिल्हानिहाय असा आहे उपलब्ध निधी!जिल्हा                                             निधी (लाखात)अमरावती                                        १०० . ००अकोला                                              ५० . ००वाशिम                                               ५० . ००बुलडाणा                                         १०० . ००यवतमाळ                                      १०० . ००.....................................................................एकूण                                           ४०० . ००निधी मागणीचे प्रस्ताव सादर करण्याचे ‘बीडीओं’ना निर्देश!शासन निर्णयानुसार पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांपोटी तसेच वीज देयकांचा खर्च भागविण्यासाठी निधी मागणीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषदांच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत संंबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना (बीडीओ) देण्यात आले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणी