शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अकोलेकरांना दिलासा; ‘काटेपूर्णा’त २०० दिवसाचा जिवंत जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:21 PM

अकोलकरांची २०० दिवस तहान भागणार असल्याने अकोलेकरांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देअकोला शहराची तहान भागवायची असेल तर धरणात किमान ३० टक्के पाण्याची गरज आहे.आतापर्यंत काटेपूर्णा धरणात २० दलघमी, २३.१६ टक्केच जलसाठा उपलब्ध झाला आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला: अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात आजमितीस (२० दशलक्ष घनमीटर) २३.१६ टक्के जिवंत जलसाठा उपलब्ध झाला असून, या साठ्यात अकोलकरांची २०० दिवस तहान भागणार असल्याने अकोलेकरांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. केवळ अकोला शहराची तहान भागवायची असेल तर धरणात किमान ३० टक्के पाण्याची गरज आहे.अकोल्याची लोकसंख्या वेगाने वाढत असून, अकोला महापालिकेंतर्गत २४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. प्रत्येकाला आवशक पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी अलीकडच्या काही वर्षांत काटेपूर्णा धरणाचे पाणी कमी पडत असून, मागील १० ते १५ वर्षांपासूनचे हे चित्र आहे. सध्या तर आठवड्यातून एकाच वेळी पाणी पुरवठा केला जात आहे. पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी काटेपूर्णा धरणात कि मान ३५ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवश्यकता आहे. त्यानंतरच अकोल्यासह ६४ खेडी व मूर्तिजापूरला पाणी पुरवठा करता येईल; यावर्षी आतापर्यंत काटेपूर्णा धरणात २० दलघमी, २३.१६ टक्केच जलसाठा उपलब्ध झाला असून, या पाण्यात दोनशे दिवस अकोलेकरांची तहान भागू शकते. सध्या पावसाचे वातावरण असल्याने दमदार पाऊस पडून धरणात आणखी जलसंचय वाढण्याची अकोलकरांना प्रतीक्षा आहे.

 महिन्याला १.५ दलघमी पाणीपुरवठासद्यस्थितीत शहराला आठवड्यातून एकादा पाणीपुरवठा करण्यात येत असून, ५३० लाख लीटर पाणी सोडण्यात येत आहे. या पद्धतीने पाणी सोडल्यास महिन्याला १.५ दीड दशलक्ष घनमीटर पाण्याचा पिण्यासाठी वापर होईल. जलवहिनी फुटून पाण्याचा अपव्यय व उन्हाने होणारे पाण्याचे बाष्पीभवन धरल्यास केवळ अकोला शहरासाठी ३० टक्के पाण्याची गरज आहे.

जिल्ह्यात दोन मोठे प्रकल्पजिल्ह्यात दोन मोठे धरण असून, आजमितीस या प्रकल्पांमध्ये ५३.४७ टक्के जलसाठा आहे. यातील सर्वात जास्त जलसाठा वान धरणात ९१.३८ टक्के असल्याने ही टक्केवारी वाढली आहे. चार मध्यम प्रकल्पाची जलपातळी ३१.८६ टक्के आहे. यात मोर्णा धरणात ३८.४५ टक्के, निर्गुणा ३१.७२ टक्के, उमा धरणात २५.२६ तर घुंगशी बॅरेजमध्ये ४५.१७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात ४० लघू प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये ४०.५२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

एमआयडीसीला ‘काटेपूर्णा’तून पाणी नाही!प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्यास असल्याने अकोला शहर, ६४ खेडी पाणीपुरवठा योजना व मूर्तिजापूर शहराची पाण्याची सोय झाली तरच एमआयडीसीला पाणी देण्यात येईल. यासाठी किमान ३५ दशलक्ष घनमीटरच्यावर धरणात पाणीसाठा होेण्याची आवशकता आहे.

तर यावर्षी सिंचनाला पाणी नाही!सिंचनासाठी पाणी सोडण्यासाठी धरणात ५० टक्केच्या वर जलसाठा असावा लागतो. तथापि, काटेपूर्णा धरणात आजमितीस २३.१६ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यावर्षी सध्या तरी सिंचनाच्या पाण्याचे नियोजन शक्य नाही.

काटेपूर्णा धरणात २३.१६ टक्के पाणी उपलब्ध झाले आहे. या पाण्यात दोनशे दिवस सहज काढता येतील. तथापि, त्यासाठी काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. आणखी पावसाचे दिवस असल्याने धरणाच्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे.- चिन्मय वाकोडे,कार्यकारी अभियंता,अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण