शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

पाणीटंचाईच्या झळा; धरणांतील साठे झाले कमी; नळ योजना ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 18:29 IST

अकोला : मार्च अखेरीस पश्चिम विदर्भातील शेकडो गावात तीव्र झाल्या असून, धरणांतील जलसाठ्याची पातळी कमालीची खालावल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर झाले आहे.

अकोला : मार्च अखेरीस पश्चिम विदर्भातील शेकडो गावात तीव्र झाल्या असून, धरणांतील जलसाठ्याची पातळी कमालीची खालावल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर झाले आहे. उन्हाचा कडाकाही ४३ अंशापर्यंत पोहोचल्याने पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होेत असून, अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात केवळ २२.३५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान, अकोला शहरालगतच्या गावात नळयोजना बंद पडल्याने प्रचंड पाणी टंचाई आहे.मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने यावर्षी पश्चिम विदर्भातील मध्यम व मोठ्या धरणांतील जलपातळी घसरली आहे. भूजल पातळीत कमालीची घट झाल्याने बोअरवेल, हातपंप, विहिरींना पाणीच उपलब्ध नसल्याने महिला-पुरुषांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. मार्च महिन्यात बुलडाणा, अकोला जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. एप्रिल महिन्यात टंचाईची तीव्रता वाढल्याने पश्चिम विदर्भातील जिल्हा प्रशासनाकडे टॅँकरची मागणी वाढली आहे.दरम्यान, उन्हाचा कडका ४२ ते ४४ अंशावर गेल्याने बाष्पीभवनाचा वेग दररोज १४ ते १५ मि.मी.ने वाढला आहे. धरणातील साठे वेगाने घटत असून, अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात मार्च महिन्याच्या शेवटी २२.३५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मोर्णा धरणात १६.६९ दलघमी साठा शिल्लक असून, मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणात ६.८५ दलघमीच पाणी उपलब्ध आहे. दगडपारवा धरणात तर शून्य टक्क्यावर आहे. अकोला, बुलडाणा, अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वाण धरणात ४३.१७ टक्के पाणी उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा जवळपास १०.१६ टक्के, पेनटाकळी १.२२, खडकपूर्णा शून्य टक्के, ज्ञानगंगा ११.५ टक्के, मस शून्य टक्के, कोराडी शून्य टक्के, पलढग १४.५१ टक्के, तोरणा ३.३० टक्के, उतावळी २५.२१ टक्के जलसाठा आहे. वाशिम जिल्ह्यातील सोनल धरणात ३.२५ टक्के, अडाणमध्ये १७.८४ टक्के तर एकबुर्जी धरणात २२.७२ टक्के जलसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूसची टक्केवारी जवळपास ३५.१० टक्के असून, सायखेडा २६.४१ टक्के, गोकी २९.९९ टक्के, वाघाडी ३०.२३ टक्के, बोरगाव १४.२२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यातील अपर वर्धा धरणात केवळ २०.७७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. शहानूर ४४.२४, चंद्रभागा ४७.१८, पूर्णा ३२.९१, सपन ५६.३७ टक्के साठा आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई