शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईच्या झळा; धरणांतील साठे झाले कमी; नळ योजना ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 18:29 IST

अकोला : मार्च अखेरीस पश्चिम विदर्भातील शेकडो गावात तीव्र झाल्या असून, धरणांतील जलसाठ्याची पातळी कमालीची खालावल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर झाले आहे.

अकोला : मार्च अखेरीस पश्चिम विदर्भातील शेकडो गावात तीव्र झाल्या असून, धरणांतील जलसाठ्याची पातळी कमालीची खालावल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर झाले आहे. उन्हाचा कडाकाही ४३ अंशापर्यंत पोहोचल्याने पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होेत असून, अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात केवळ २२.३५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान, अकोला शहरालगतच्या गावात नळयोजना बंद पडल्याने प्रचंड पाणी टंचाई आहे.मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने यावर्षी पश्चिम विदर्भातील मध्यम व मोठ्या धरणांतील जलपातळी घसरली आहे. भूजल पातळीत कमालीची घट झाल्याने बोअरवेल, हातपंप, विहिरींना पाणीच उपलब्ध नसल्याने महिला-पुरुषांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. मार्च महिन्यात बुलडाणा, अकोला जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. एप्रिल महिन्यात टंचाईची तीव्रता वाढल्याने पश्चिम विदर्भातील जिल्हा प्रशासनाकडे टॅँकरची मागणी वाढली आहे.दरम्यान, उन्हाचा कडका ४२ ते ४४ अंशावर गेल्याने बाष्पीभवनाचा वेग दररोज १४ ते १५ मि.मी.ने वाढला आहे. धरणातील साठे वेगाने घटत असून, अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात मार्च महिन्याच्या शेवटी २२.३५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मोर्णा धरणात १६.६९ दलघमी साठा शिल्लक असून, मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणात ६.८५ दलघमीच पाणी उपलब्ध आहे. दगडपारवा धरणात तर शून्य टक्क्यावर आहे. अकोला, बुलडाणा, अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वाण धरणात ४३.१७ टक्के पाणी उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा जवळपास १०.१६ टक्के, पेनटाकळी १.२२, खडकपूर्णा शून्य टक्के, ज्ञानगंगा ११.५ टक्के, मस शून्य टक्के, कोराडी शून्य टक्के, पलढग १४.५१ टक्के, तोरणा ३.३० टक्के, उतावळी २५.२१ टक्के जलसाठा आहे. वाशिम जिल्ह्यातील सोनल धरणात ३.२५ टक्के, अडाणमध्ये १७.८४ टक्के तर एकबुर्जी धरणात २२.७२ टक्के जलसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूसची टक्केवारी जवळपास ३५.१० टक्के असून, सायखेडा २६.४१ टक्के, गोकी २९.९९ टक्के, वाघाडी ३०.२३ टक्के, बोरगाव १४.२२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यातील अपर वर्धा धरणात केवळ २०.७७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. शहानूर ४४.२४, चंद्रभागा ४७.१८, पूर्णा ३२.९१, सपन ५६.३७ टक्के साठा आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई