शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

पाणीटंचाईच्या झळा; धरणांतील साठे झाले कमी; नळ योजना ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 18:29 IST

अकोला : मार्च अखेरीस पश्चिम विदर्भातील शेकडो गावात तीव्र झाल्या असून, धरणांतील जलसाठ्याची पातळी कमालीची खालावल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर झाले आहे.

अकोला : मार्च अखेरीस पश्चिम विदर्भातील शेकडो गावात तीव्र झाल्या असून, धरणांतील जलसाठ्याची पातळी कमालीची खालावल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर झाले आहे. उन्हाचा कडाकाही ४३ अंशापर्यंत पोहोचल्याने पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होेत असून, अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात केवळ २२.३५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान, अकोला शहरालगतच्या गावात नळयोजना बंद पडल्याने प्रचंड पाणी टंचाई आहे.मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने यावर्षी पश्चिम विदर्भातील मध्यम व मोठ्या धरणांतील जलपातळी घसरली आहे. भूजल पातळीत कमालीची घट झाल्याने बोअरवेल, हातपंप, विहिरींना पाणीच उपलब्ध नसल्याने महिला-पुरुषांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. मार्च महिन्यात बुलडाणा, अकोला जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. एप्रिल महिन्यात टंचाईची तीव्रता वाढल्याने पश्चिम विदर्भातील जिल्हा प्रशासनाकडे टॅँकरची मागणी वाढली आहे.दरम्यान, उन्हाचा कडका ४२ ते ४४ अंशावर गेल्याने बाष्पीभवनाचा वेग दररोज १४ ते १५ मि.मी.ने वाढला आहे. धरणातील साठे वेगाने घटत असून, अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात मार्च महिन्याच्या शेवटी २२.३५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मोर्णा धरणात १६.६९ दलघमी साठा शिल्लक असून, मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणात ६.८५ दलघमीच पाणी उपलब्ध आहे. दगडपारवा धरणात तर शून्य टक्क्यावर आहे. अकोला, बुलडाणा, अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वाण धरणात ४३.१७ टक्के पाणी उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा जवळपास १०.१६ टक्के, पेनटाकळी १.२२, खडकपूर्णा शून्य टक्के, ज्ञानगंगा ११.५ टक्के, मस शून्य टक्के, कोराडी शून्य टक्के, पलढग १४.५१ टक्के, तोरणा ३.३० टक्के, उतावळी २५.२१ टक्के जलसाठा आहे. वाशिम जिल्ह्यातील सोनल धरणात ३.२५ टक्के, अडाणमध्ये १७.८४ टक्के तर एकबुर्जी धरणात २२.७२ टक्के जलसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूसची टक्केवारी जवळपास ३५.१० टक्के असून, सायखेडा २६.४१ टक्के, गोकी २९.९९ टक्के, वाघाडी ३०.२३ टक्के, बोरगाव १४.२२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यातील अपर वर्धा धरणात केवळ २०.७७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. शहानूर ४४.२४, चंद्रभागा ४७.१८, पूर्णा ३२.९१, सपन ५६.३७ टक्के साठा आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई