शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

खारपाणपट्ट्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; तहान भागविण्यासाठी ‘टँकर-झिऱ्या’वर धाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 13:31 IST

अकोला : जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात ‘बारुला ’ विभागातील गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला असून, तहान भागविण्यासाठी ग्रामस्थांना टँकर आणि झिºयावर धाव घ्यावी लागत आहे.

ठळक मुद्देखारपाणपट्ट्यातील ‘बारुला’ विभागातील गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. टँकर आल्यानंतर पाण्यासाठी टँकरवर ग्रामस्थांची झुंबड होत आहे.

- संतोष येलकर

अकोला : जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात ‘बारुला ’ विभागातील गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला असून, तहान भागविण्यासाठी ग्रामस्थांना टँकर आणि झिºयावर धाव घ्यावी लागत आहे.गतवर्षीच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने, अकोला व खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणी पुरवठा करणाºया महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. उपलब्ध जलसाठा अकोला शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी आरक्षित करण्यात आला असून, धरणातून खांबोरा पाणी पुरवठा योजनेंतर्गत खारपाणपट्ट्यातील गावांना गत आॅक्टोबरपासून पाणी पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे खारपाणपट्ट्यातील ‘बारुला’ विभागातील गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यानुषंगाने या गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे; मात्र कुठे चार, कुठे सहा तर कुठे पंधरा दिवसांआड टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टँकरद्वारे पाण्यावर तहान भागविण्यासाठी गावागावात टँकर आल्यानंतर पाण्यासाठी टँकरवर ग्रामस्थांची झुंबड होत आहे. टँकरद्वारे अनियमित आणि अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने, तहान भागविण्यासाठी बारुला विभागातील म्हातोडी, आपोती बु. येथील एका शेतातील झिºयाच्या पाण्यावर ग्रामस्थांना धाव घ्यावी लागत आहे.‘बारुल्या’तील पाणीटंचाईग्रस्त अशी आहेत गावे!खारपाणपट्ट्यातील ‘बारुला ’ विभागातील १२ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये घुसर, घुसरवाडी, म्हातोडी, लाखोंडा बु., लाखोंडा खुर्द, मारोडी, खोबरखेड, आपोती बु., आपोती खुर्द, अनकवाडी, आखतवाडा-शामाबाद, सुलतान अजमपूर इत्यादी गावांचा समावेश आहे.जनावरांची तहान भागविण्याचीही चिंता!पाणीटंचाईग्रस्त बारुला विभागातील गावांमध्ये जिथे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे, तिथे जनावरांना पिण्याचे पाणी कोठून आणणार, याबाबतची चिंता शेतकºयांना सतावत आहे. ‘बारुल्या’तील म्हातोडी गावातील जनावरांची तहान गावानजीक असलेल्या लोणार नाल्यातील झिºयातील गढूळ पाण्यावर भागविली जात असल्याचे चित्र आहे.

पाणी विकत घेऊन भागविली जाते तहान !टँकरद्वारे मिळणारे पाणी पुरेसे नाही, खारपाणपट्टा असल्याने पिण्यायोग्य पाण्याचा दुसरा स्रोत उपलब्ध नाही, अशा परिस्थितीत पाणीटंचाईग्रस्त बारुला विभागातील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे.टँकरद्वारे पंधरा दिवसांआड पाणी मिळते, ते पुरेसे नाही. त्यामुळे लोणार नाल्यातील झिºयाच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. झिºयाजवळ साचलेल्या गढूळ पाण्याचा वापर कपडे धुण्यासाठी व जनावरांची तहान भागविण्यासाठी करावा लागत आहे.-छाया प्रकाश इंगळे, कमला इद्रभान इंगळे, म्हातोडी.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणी