शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
2
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
3
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
4
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
5
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
6
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
7
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
8
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
9
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
10
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
11
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
12
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
13
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
14
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
15
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
16
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
17
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
18
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
19
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
20
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!

मूर्तिजापूर तालुक्यावर पाणी टंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 17:40 IST

Water scarcity in Murtijapur taluka : १७ विहिरी अधिग्रहित, १३ विरहितील गाळ काढणे, ६ नळ योजना दुरुस्ती, ४० विंधन विहिरी व ११ कुपनलीका पाणी टंचाई उपाय योजना आराखडय़ात मंजूर करण्यात आल्या आहेत.

- संजय उमकमूर्तिजापूर : भूगर्भातील पाणी पातळी खोल गेल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणी समस्या निर्माण झाली आहे. त्यासाठी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन तालुका स्तरावर एक शासकीय कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. पारा चढत आहे उन्हाची काहिली वाढत आहे. पिण्यासाठी होणारी जीवाची कासावीस तालुक्यात वाढली आहे. अशा भिषण परीस्थीतीत पाणी टंचाईचा कृती आराखडा कागदावर असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. प्रस्तावित ७ सात गावात भिषण पाणी टंचाई असल्याचे कृती आराखड्यात नमुद आहे; परंतू त्या गावांसाठी कुठलीही उपाय योजना करण्यात आली नसल्याने कृती आराखडा कागदावरच राहिला आहे.              तालुक्यातील पाणी टंचाई लक्षात घेता संभाव्य उपाय योजना म्हणून ७५ गावांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तालुक्यातील किनी, चिखली, सोनोरी (मूर्तिजापूर), जामठी (माटोळा ), कवठा (खोलापुर), बोरगाव (निंघोट), साखरी, निंभा या गावात पाणी टंचाईचे सावट आहे. या गावासाठी विहीरी अधिग्रहित करणे, नळ दुरुस्ती करणे आदी उपाय योजना प्रस्तावित आहे, कृती आराखड्या नुसार ७५ गावातील १० गावाच्या उपाय योजनेसाठी पाणी टंचाई उपाय योजना, १७ विहिरी अधिग्रहित, १३ विरहितील गाळ काढणे, ६ नळ योजना दुरुस्ती, ४० विंधन विहिरी व ११ कुपनलीका पाणी टंचाई उपाय योजना आराखडय़ात मंजूर करण्यात आल्या आहेत.       संपुर्ण मागील वर्षी पावसाळ्यात ७११.२० मिलिमीटर येवढी पावसाची नोंद करण्यात आली आहे पाऊस गतवर्षीच्या तुलनेत अधिक प्रमाणात असला तरी विहीरी, विंधन विहिरींतील पाण्याची पातळी तळाला भिडली आहे. नद्या, बॅरेजेस मध्ये ठणठणाट असल्याने संपूर्ण तालुक्यात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.           संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता तालुका शासकीय स्तरावर पुरक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तालुक्यात उमा प्रकल्पावर कार्यान्वित असलेली एकमेव लंघापुर ५७ खेडी पाणी पुरवठा योजना असुन उमा प्रकल्प तुडुंब भरत असल्याने ही योजना तालुक्यासाठी जल संजीवनी ठरणार असली तरी ग्राहकांनी देयके नभरल्याने जीवन प्राधिकरण विभागाने ३७ गावचा पाणीपुरवठा खंडित केल्याने या गावांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. तर यावर्षी पासून यातील हातगाव, सोनोरी (मूर्तिजापूर ) व हेंडज तंत्रनिकेतन महाविद्यालय यांना करार तत्वावर पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जीवन प्राधिकरण कडून प्राप्त झाली आहे.               या कृती आराखड्यात विशेषतः निम्म्याहून अधिक नदी काठचेच  गावे असुन त्यामध्ये मुंगशी, शेलू नजीक, वाघजाळी, ताकवाडा, दापुरा, शिरताळा, बपोरी, सोनोरी, शेलू बाजार, सांगवी, रोहणा, बोर्टा, लंघापुर, यावरुन तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई चित्र स्पष्ट होते. कृती आराखड्यानुसार नळयोजना दुरुस्ती, टँकरने पाणीपुरवठा करणे, विहिरी अधिग्रहित करणे, विहिरीतील गाळ काढणे, विंधन विहिरी व कुपनलीका पाणी टंचाई उपाय योजनेसाठी १ लक्ष ५८ हाजार एवढा खर्च अपेक्षित आहे. 

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरwater scarcityपाणी टंचाई