शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

मूर्तिजापूर तालुक्यावर पाणी टंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 17:40 IST

Water scarcity in Murtijapur taluka : १७ विहिरी अधिग्रहित, १३ विरहितील गाळ काढणे, ६ नळ योजना दुरुस्ती, ४० विंधन विहिरी व ११ कुपनलीका पाणी टंचाई उपाय योजना आराखडय़ात मंजूर करण्यात आल्या आहेत.

- संजय उमकमूर्तिजापूर : भूगर्भातील पाणी पातळी खोल गेल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणी समस्या निर्माण झाली आहे. त्यासाठी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन तालुका स्तरावर एक शासकीय कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. पारा चढत आहे उन्हाची काहिली वाढत आहे. पिण्यासाठी होणारी जीवाची कासावीस तालुक्यात वाढली आहे. अशा भिषण परीस्थीतीत पाणी टंचाईचा कृती आराखडा कागदावर असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. प्रस्तावित ७ सात गावात भिषण पाणी टंचाई असल्याचे कृती आराखड्यात नमुद आहे; परंतू त्या गावांसाठी कुठलीही उपाय योजना करण्यात आली नसल्याने कृती आराखडा कागदावरच राहिला आहे.              तालुक्यातील पाणी टंचाई लक्षात घेता संभाव्य उपाय योजना म्हणून ७५ गावांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तालुक्यातील किनी, चिखली, सोनोरी (मूर्तिजापूर), जामठी (माटोळा ), कवठा (खोलापुर), बोरगाव (निंघोट), साखरी, निंभा या गावात पाणी टंचाईचे सावट आहे. या गावासाठी विहीरी अधिग्रहित करणे, नळ दुरुस्ती करणे आदी उपाय योजना प्रस्तावित आहे, कृती आराखड्या नुसार ७५ गावातील १० गावाच्या उपाय योजनेसाठी पाणी टंचाई उपाय योजना, १७ विहिरी अधिग्रहित, १३ विरहितील गाळ काढणे, ६ नळ योजना दुरुस्ती, ४० विंधन विहिरी व ११ कुपनलीका पाणी टंचाई उपाय योजना आराखडय़ात मंजूर करण्यात आल्या आहेत.       संपुर्ण मागील वर्षी पावसाळ्यात ७११.२० मिलिमीटर येवढी पावसाची नोंद करण्यात आली आहे पाऊस गतवर्षीच्या तुलनेत अधिक प्रमाणात असला तरी विहीरी, विंधन विहिरींतील पाण्याची पातळी तळाला भिडली आहे. नद्या, बॅरेजेस मध्ये ठणठणाट असल्याने संपूर्ण तालुक्यात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.           संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता तालुका शासकीय स्तरावर पुरक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तालुक्यात उमा प्रकल्पावर कार्यान्वित असलेली एकमेव लंघापुर ५७ खेडी पाणी पुरवठा योजना असुन उमा प्रकल्प तुडुंब भरत असल्याने ही योजना तालुक्यासाठी जल संजीवनी ठरणार असली तरी ग्राहकांनी देयके नभरल्याने जीवन प्राधिकरण विभागाने ३७ गावचा पाणीपुरवठा खंडित केल्याने या गावांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. तर यावर्षी पासून यातील हातगाव, सोनोरी (मूर्तिजापूर ) व हेंडज तंत्रनिकेतन महाविद्यालय यांना करार तत्वावर पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जीवन प्राधिकरण कडून प्राप्त झाली आहे.               या कृती आराखड्यात विशेषतः निम्म्याहून अधिक नदी काठचेच  गावे असुन त्यामध्ये मुंगशी, शेलू नजीक, वाघजाळी, ताकवाडा, दापुरा, शिरताळा, बपोरी, सोनोरी, शेलू बाजार, सांगवी, रोहणा, बोर्टा, लंघापुर, यावरुन तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई चित्र स्पष्ट होते. कृती आराखड्यानुसार नळयोजना दुरुस्ती, टँकरने पाणीपुरवठा करणे, विहिरी अधिग्रहित करणे, विहिरीतील गाळ काढणे, विंधन विहिरी व कुपनलीका पाणी टंचाई उपाय योजनेसाठी १ लक्ष ५८ हाजार एवढा खर्च अपेक्षित आहे. 

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरwater scarcityपाणी टंचाई