शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

घुंगशी बॅरेजमधून सोडले पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:53 IST

पूर्णा नदीचे पात्र कोरडे पडल्याने गोपालखेड पाणी पुरवठा योजना गेल्या काही दिवसांपासून बंदच पडली होती. त्यामुळे या योजनेद्वारे पाणी पुरवठा होत असलेल्या धामणासह इतर गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती.

ठळक मुद्देगोपालखेड पाणी पुरवठा योजनेसाठी लाभदायक!

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव वैराळे : पूर्णा नदीचे पात्र कोरडे पडल्याने गोपालखेड पाणी पुरवठा योजना गेल्या काही दिवसांपासून बंदच पडली होती. त्यामुळे या योजनेद्वारे पाणी पुरवठा होत असलेल्या धामणासह इतर गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. या गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणी पुरवठा होत असला, तरी लोकसंख्येच्या तुलनेत तोकडा पडत होता. याविषयी लोकमतने वृत्त प्रकाशित करताच पाटबंधारे विभागाने घुंगशी बॅरेजमधून पाणी सोडले आहे. त्यामुळे, पूर्णा नदीचे पात्र वाहू लागले असून, नदीकाठावरील गावांसह इतर गावांना पाणीटंचाईतून दिलासा मिळाला आहे.   यावर्षी अल्प पाऊस झाल्याने जलप्रकल्पांनी तळ गाठला आहे. परिसरातील गावांसाठी महत्त्वाच्या असलेल्या पूर्णा नदीचे पात्रही हिवाळ्य़ातच कोरडे पडल्याने पाणीटंचाईचे संकट वाढले होते; तसेच  गांधीग्राम, गोपालखेड, निराट, वैराट, राजापूर, धामणा, नवीन धामणा येथे पाणी पुरवठा करण्यात येणारी गोपालखेड योजनाही बंद पडली होती, त्यामुळे या गावांमध्ये टॅँकरने पाणी पुरवठा सुरू करावा लागला होता. पाटबंधारे विभागाने घुंगशी बॅरेजमधून पाणी सोडल्याने पूर्णा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. सध्या नदीच्या पात्रात पाच  ते सहा फूट पाणी असल्याने नदीकाठावरील गावांना दिलासा मिळाला आहे, तसेच पूर्णा नदीवरून बागायती शेती करणार्‍या शेतकर्‍यांच्या गहू, हरभरा, कपाशी ,तूर या पिकांसाठी लाभदायक ठरणार आहे. पाळीव जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णा नदीत पाणी आल्याने मिटला आहे. पूर्णा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात आणि आमदार रणधीर सावरकर यांच्यासह सरपंच उज्‍जवला मोहन भांबेरे यांनी पाठपुरावा केला. 

गोपालखेड योजनेसह इतर गावातील पाणी प्रश्न बिकट झाला होता, तसेच पूर्णा नदीच्या पात्रात पाणी सोडण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनीसुद्धा केली होती. परिसरातील गावातील पाणी समस्या लक्षात घेता घुंगशी बॅरेजमधून पाणी सोडण्यात आले. - मनोज बोंडे,  कनिष्ठ अभियंता, पाटबंधारे विभाग, अकोला. 

टॅग्स :Waterपाणी