शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

घुंगशी बॅरेजमधून सोडले पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:53 IST

पूर्णा नदीचे पात्र कोरडे पडल्याने गोपालखेड पाणी पुरवठा योजना गेल्या काही दिवसांपासून बंदच पडली होती. त्यामुळे या योजनेद्वारे पाणी पुरवठा होत असलेल्या धामणासह इतर गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती.

ठळक मुद्देगोपालखेड पाणी पुरवठा योजनेसाठी लाभदायक!

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव वैराळे : पूर्णा नदीचे पात्र कोरडे पडल्याने गोपालखेड पाणी पुरवठा योजना गेल्या काही दिवसांपासून बंदच पडली होती. त्यामुळे या योजनेद्वारे पाणी पुरवठा होत असलेल्या धामणासह इतर गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. या गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणी पुरवठा होत असला, तरी लोकसंख्येच्या तुलनेत तोकडा पडत होता. याविषयी लोकमतने वृत्त प्रकाशित करताच पाटबंधारे विभागाने घुंगशी बॅरेजमधून पाणी सोडले आहे. त्यामुळे, पूर्णा नदीचे पात्र वाहू लागले असून, नदीकाठावरील गावांसह इतर गावांना पाणीटंचाईतून दिलासा मिळाला आहे.   यावर्षी अल्प पाऊस झाल्याने जलप्रकल्पांनी तळ गाठला आहे. परिसरातील गावांसाठी महत्त्वाच्या असलेल्या पूर्णा नदीचे पात्रही हिवाळ्य़ातच कोरडे पडल्याने पाणीटंचाईचे संकट वाढले होते; तसेच  गांधीग्राम, गोपालखेड, निराट, वैराट, राजापूर, धामणा, नवीन धामणा येथे पाणी पुरवठा करण्यात येणारी गोपालखेड योजनाही बंद पडली होती, त्यामुळे या गावांमध्ये टॅँकरने पाणी पुरवठा सुरू करावा लागला होता. पाटबंधारे विभागाने घुंगशी बॅरेजमधून पाणी सोडल्याने पूर्णा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. सध्या नदीच्या पात्रात पाच  ते सहा फूट पाणी असल्याने नदीकाठावरील गावांना दिलासा मिळाला आहे, तसेच पूर्णा नदीवरून बागायती शेती करणार्‍या शेतकर्‍यांच्या गहू, हरभरा, कपाशी ,तूर या पिकांसाठी लाभदायक ठरणार आहे. पाळीव जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णा नदीत पाणी आल्याने मिटला आहे. पूर्णा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात आणि आमदार रणधीर सावरकर यांच्यासह सरपंच उज्‍जवला मोहन भांबेरे यांनी पाठपुरावा केला. 

गोपालखेड योजनेसह इतर गावातील पाणी प्रश्न बिकट झाला होता, तसेच पूर्णा नदीच्या पात्रात पाणी सोडण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनीसुद्धा केली होती. परिसरातील गावातील पाणी समस्या लक्षात घेता घुंगशी बॅरेजमधून पाणी सोडण्यात आले. - मनोज बोंडे,  कनिष्ठ अभियंता, पाटबंधारे विभाग, अकोला. 

टॅग्स :Waterपाणी