शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

जलवाहिनीच्या ‘लिकेज’मध्ये अडकले ४४ गावांचे पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 14:35 IST

चोहट्टाबाजार ते उगवा फाट्यापर्यंतच्या जुन्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती (लिकेज) लागत असल्याने घुसर येथील टाकीत (सम्प) पाणी पोहोचण्यास अडथळा निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे टंचाईग्रस्त ४४ गावांना वाण धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी ३ कोटी ६७ लाख रुपयांच्या योजनेला शासनामार्फत मंजुरी देण्यात आली. चोहोट्टा बाजार ते उगवा फाट्यापर्यंत १५ किलोमीटर जुन्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती. जुन्या जलवाहिनीवरील ‘लिकेज’मध्ये टंचाईग्रस्त ४४ गावांना वाण धरणातून पाणी पुरवठा अडकला आहे.

- संतोष येलकर

अकोला: जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ४४ गावांना वाण धरणातून पाणीपुरवठा करण्याच्या योजनेचे काम पूर्ण करण्यात आले असले तरी, चोहट्टाबाजार ते उगवा फाट्यापर्यंतच्या जुन्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती (लिकेज) लागत असल्याने घुसर येथील टाकीत (सम्प) पाणी पोहोचण्यास अडथळा निर्माण झाला आहे. जलवाहिनीच्या ‘लिकेज’मध्ये टंचाईग्रस्त ४४ गावांचा पाणीपुरवठा अडकला आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी ‘वाण’ चे पाणी केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गतवर्षीच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याच्या पृष्ठभूमीवर धरणातील जलसाठा अकोला शहरासाठी आरक्षित करण्यात आला असून, गत सप्टेंबरपासून खांबोरा पाणी पुरवठा योजनेंतर्गत गावांना धरणातून पाणी पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणी टंचाईग्रस्त गावांना गत आॅक्टोबरपासून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. या पृष्ठभूमीवर खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत टंचाईग्रस्त ४४ गावांना वाण धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी ३ कोटी ६७ लाख रुपयांच्या योजनेला शासनामार्फत मंजुरी देण्यात आली. या योजनेत उगवा फाटा ते घुसरपर्यंत नवीन जलवाहिनी टाकून घुसर येथील ‘सम्प’मधून ४४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी चाहोट्टा बाजार येथे ६० अश्वशक्तीचे सबमर्सिबल पंप बसविण्यात आले असून, जमिनीखाली टाकी (सम्प)चे काम पूर्ण करण्यात आले. तसेच उगवा फाट्यापासून घुसर येथील ‘सम्प’पर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत गत आठवड्यात पूर्ण करण्यात आले. ४४ गावांना पाणीपुरवठा करण्याची चाचणी घेण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यामध्ये चोहोट्टा बाजार ते उगवा फाट्यापर्यंत १५ किलोमीटर जुन्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागत असल्याने, नवीन जलवाहिनीद्वारे घुसर येथील ‘सम्प’पर्यंत वाण धरणाचे पाणी पोहोचण्यास अडथळा निर्माण झाला आहे. जुन्या जलवाहिनीवरील ‘लिकेज’मध्ये टंचाईग्रस्त ४४ गावांना वाण धरणातून पाणी पुरवठा अडकला आहे. त्यामुळे जलवाहिनीवरील लिकेज दुरुस्तीचे काम केव्हा पूर्ण होणार आणि टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी ‘वाण’चे पाणी केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जुन्या जलवाहिनीवर ७० ठिकाणी ‘लिकेज’ काढण्याचे काम पूर्ण!वान धरणातून अकोला शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी १२ वर्षांपूर्वी चोहोट्टा बाजार ते उगवा फाट्यापर्यंत १५ किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात आली होती. उगवा फाटा ते घुसरपर्यंत नवीन जलवाहिनी टाकून ४४ गावांना वान धरणातून पाणी पुरवठा करण्याच्या योजनेचे काम आता पूर्ण करण्यात आले आहे; परंतु चोहोट्टा बाजार ते उगवा फाट्यापर्यंत जुन्या जलवाहिनी ठिकठिकाणी ‘लिकेज’ होत आहेत. ४ मेपर्यंत जुन्या जलवाहिनीवरील ७० ठिकाणी ‘लिकेज’ काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले. लिकेज काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच ४४ गावांना वान धरणातून पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार आहे.ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावरच!खारपाणपट्ट्यातील टंचाईग्रस्त ४४ गावांना वान धरणातून पाणी पुरवठा करण्याच्या योजनेचे काम पूर्ण करण्यात आले असले, तरी अद्याप या गावांपर्यंत ‘वान’चे पाणी पोहोचले नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त ४४ गावांतील ग्रामस्थांना टँकरद्वारे मिळणाऱ्या पाण्यावर तसेच पैसे देऊन विकत घेतलेल्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे.चोहोट्टा बाजार ते उगवा फाट्यापर्यंत जुन्या जलवाहिनीवरील ‘लिकेज’ काढण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ७० ठिकाणी ‘लिकेज’ काढण्यात आले. लिकेज काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ४४ गावांना वान धरणातून पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार आहे.-सुनील चव्हाण, उपअभियंता, मजीप्रा, अकोला.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणी