शहरं
Join us  
Trending Stories
1
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
2
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
5
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
6
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
7
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
8
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
9
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
10
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
11
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
12
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
13
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
14
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
15
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
16
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
17
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
18
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
19
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
20
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!

वारकरी संप्रदाय ही क्रांतिकारी चळवळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 02:07 IST

अकोला: सातशे वर्षांपूर्वी समाजाला बसत असलेले चातुर्वण्र्य अन् विषमतेचे चटके कमी करण्याचे काम करून वेदप्रामाण्य नाकारणारा वारकरी संप्रदाय ही खरी क्रांतिकारी चळवळ होती, असे प्रतिपादन अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी रविवारी येथे केले.

ठळक मुद्देप्रा. श्याम मानव यांचे प्रतिपादन ‘अंनिस’च्या सखोल प्रशिक्षण शिबिराचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सातशे वर्षांपूर्वी समाजाला बसत असलेले चातुर्वण्र्य अन् विषमतेचे चटके कमी करण्याचे काम करून वेदप्रामाण्य नाकारणारा वारकरी संप्रदाय ही खरी क्रांतिकारी चळवळ होती, असे प्रतिपादन अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी रविवारी येथे केले. येथील साईकृपा मंगल कार्यालयात तीन दिवस सुरू असलेल्या सखोल प्रशिक्षण शिबिराच्या समारोप सत्रात ‘संत आणि चमत्कार’ या विषयावर प्रा. मानव बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हर्षवर्धन मालोकार, डॉ. महेंद्र काळे, डॉ. राऊत उपस्थित होते. संत ज्ञानेश्‍वर हे पहिले बंडखोर संत होते; मात्र त्यांच्या नावावर चमत्कार खपविण्यात आलेत. वास्तविक कोणत्याही संताने चमत्कार केले नाहीत. उलट चमत्कार, सिद्धी, दैवी शक्ती, मंत्र-तंत्र कसे खोटे असतात, हे अभंगातून मांडले आहे, हे लक्षात घ्यायला हवे. अतिभक्तीपोटी चरित्र किंवा पोथी लेखकांनी संतांच्या नावावर चमत्कार घुसडले. गाडगेबाबांच्या अंत्ययात्रेत उपस्थित असणारे लोक आजही जिवंत असताना, गाडगेबाबा तुकारामाचे अवतार होते अन् ते सदेह वैकुंठाला गेले, असे बडनेर्‍याच्या उमाळे गुरुजींनी पोथीत लिहिले आहे. गाडगेबाबाबाबत जर असे होत असेल तर ७00 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या संतांच्या चरित्रात किती घोळ झाले असतील, हे लक्षात घ्यायला हवे, असेही आवाहन प्रा. मानव यांनी यावेळी केले. यावेळी शरद वानखडे, पुरुषोत्तम आवारे, अशोक घाटे, संध्या देशमुख, चंद्रकांत झटाले, मंगेश वानखडे, विजय बुरकुले, धम्मदीप इंगळे, संतोष ताले, दिगंबर सांगळे, रुपाली राऊत, किशोर वाघ, प्रतिभा भुतेकर, अँड. शेषराव गव्हाळे, विठ्ठल तायडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

श्रद्धा डोळस हवी!आमचा देव, धर्माला विरोध नाही. कुणाला डोळस श्रद्धा ठेवायची असेल तर माझी हरकत नाही कारण डोळस होणे याचाच अर्थ तर्क, चिकित्सा वापरायला सुरुवात करणे, समाजाची तर्कबुद्धी जागृत करणे एवढेच अंनिसचे काम आहे. हे काम लोकांना कमीत कमी दुखावूनसुद्धा अतिशय प्रभावीपणे करता येते, असेही प्रा. मानव यावेळी म्हणाले.