शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीपूर्वी युद्ध किंवा आणीबाणी निश्चितच! - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 14:10 IST

अकोला : येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजपकडून एखादे युद्ध लादले जाऊ शकते. ते न झाल्यास आरक्षणाच्या मुद्यांवर समर्थक-विरोधकांमध्ये दंगली घडवून आणीबाणीही लागू केली जाऊ शकते, असा इशारा भारिप-बमसंचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी समाजमाध्यमामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे समाधान करताना दिला.

ठळक मुद्दे सत्ताधारी भाजपकडून देशावर युद्ध लादले जाईल का, या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही बाब मांडली. आणीबाणीची परिस्थिती निर्माण करत ती लागू केली जाईल, अशी दाट शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.येत्या निवडणुकीत मोदी हटावमध्ये काँग्रेसचीच भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचेही ते म्हणाले.

अकोला : येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजपकडून एखादे युद्ध लादले जाऊ शकते. ते न झाल्यास आरक्षणाच्या मुद्यांवर समर्थक-विरोधकांमध्ये दंगली घडवून आणीबाणीही लागू केली जाऊ शकते, असा इशारा भारिप-बमसंचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी समाजमाध्यमामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे समाधान करताना दिला.शनिवारी सायंकाळी समाजमाध्यमामध्ये त्यांनी थेट संवाद साधला. यावेळी विविध मुद्यांवर त्यांनी मते व्यक्त केली. सत्ताधारी भाजपकडून देशावर युद्ध लादले जाईल का, या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही बाब मांडली. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून रणनीती आखली जाईल, त्यामध्ये नफ्या-तोट्याचे गणित मांडून शेजारच्या राष्ट्राशी युद्ध केले जाऊ शकते. ते न जमल्यास देशांतर्गत आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून, समर्थक आणि विरोधकांच्या दंगली घडवल्या जातील, त्यातून आणीबाणीची परिस्थिती निर्माण करत ती लागू केली जाईल, अशी दाट शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेला आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी असल्याचे ठरवण्यात आले. त्याचवेळी देशातील संघविरोधक, आंबेडकरवादी काहीच बोलायला तयार नाहीत, हा दुटप्पीपणा आहे. तो समजून घेतला पाहिजे, असेही अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले. काँग्रेस, भाजपशिवाय तिसरा पर्याय उभा केला, तर लोकांचा सहभाग मिळत नाही. लोकांनी तिसरा पर्याय स्वीकारल्यास या दोघांनाही वठणीवर आणणे कठीण नसल्याचेही ते म्हणाले. काँग्रेसची एवढी वाताहत होत असतानाही प्रादेशिक पक्षांना गृहित धरण्याचे धोरण सुरूच आहे. प्रादेशिक पक्ष सातत्याने काँग्रेसला प्रस्ताव देतात, चर्चेची मागणी करतात. काँग्रेस काहीच बोलायला तयार नसते. त्यामुळे येत्या निवडणुकीत मोदी हटावमध्ये काँग्रेसचीच भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचेही ते म्हणाले. आधारभूत किमतीचे पुन्हा गाजरशेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याबाबत प्रधानमंत्री मोदींनी घोषणा केली. ती करताना अंमलबजावणी कशी होईल, हे सांगितले नाही. केंद्र शासनाने खरेदी यंत्रणा असलेल्या भारतीय खाद्य निगमच्या सर्व गोदामांची विक्री केली आहे, आता कोणत्या यंत्रणेमार्फत खरेदी केली जाईल, हे न सांगितल्याने आधारभूत किमतीचे गाजर दाखवल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरElectionनिवडणूकBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ