शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

निवडणुकीपूर्वी युद्ध किंवा आणीबाणी निश्चितच! - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 14:10 IST

अकोला : येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजपकडून एखादे युद्ध लादले जाऊ शकते. ते न झाल्यास आरक्षणाच्या मुद्यांवर समर्थक-विरोधकांमध्ये दंगली घडवून आणीबाणीही लागू केली जाऊ शकते, असा इशारा भारिप-बमसंचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी समाजमाध्यमामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे समाधान करताना दिला.

ठळक मुद्दे सत्ताधारी भाजपकडून देशावर युद्ध लादले जाईल का, या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही बाब मांडली. आणीबाणीची परिस्थिती निर्माण करत ती लागू केली जाईल, अशी दाट शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.येत्या निवडणुकीत मोदी हटावमध्ये काँग्रेसचीच भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचेही ते म्हणाले.

अकोला : येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजपकडून एखादे युद्ध लादले जाऊ शकते. ते न झाल्यास आरक्षणाच्या मुद्यांवर समर्थक-विरोधकांमध्ये दंगली घडवून आणीबाणीही लागू केली जाऊ शकते, असा इशारा भारिप-बमसंचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी समाजमाध्यमामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे समाधान करताना दिला.शनिवारी सायंकाळी समाजमाध्यमामध्ये त्यांनी थेट संवाद साधला. यावेळी विविध मुद्यांवर त्यांनी मते व्यक्त केली. सत्ताधारी भाजपकडून देशावर युद्ध लादले जाईल का, या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही बाब मांडली. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून रणनीती आखली जाईल, त्यामध्ये नफ्या-तोट्याचे गणित मांडून शेजारच्या राष्ट्राशी युद्ध केले जाऊ शकते. ते न जमल्यास देशांतर्गत आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून, समर्थक आणि विरोधकांच्या दंगली घडवल्या जातील, त्यातून आणीबाणीची परिस्थिती निर्माण करत ती लागू केली जाईल, अशी दाट शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेला आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी असल्याचे ठरवण्यात आले. त्याचवेळी देशातील संघविरोधक, आंबेडकरवादी काहीच बोलायला तयार नाहीत, हा दुटप्पीपणा आहे. तो समजून घेतला पाहिजे, असेही अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले. काँग्रेस, भाजपशिवाय तिसरा पर्याय उभा केला, तर लोकांचा सहभाग मिळत नाही. लोकांनी तिसरा पर्याय स्वीकारल्यास या दोघांनाही वठणीवर आणणे कठीण नसल्याचेही ते म्हणाले. काँग्रेसची एवढी वाताहत होत असतानाही प्रादेशिक पक्षांना गृहित धरण्याचे धोरण सुरूच आहे. प्रादेशिक पक्ष सातत्याने काँग्रेसला प्रस्ताव देतात, चर्चेची मागणी करतात. काँग्रेस काहीच बोलायला तयार नसते. त्यामुळे येत्या निवडणुकीत मोदी हटावमध्ये काँग्रेसचीच भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचेही ते म्हणाले. आधारभूत किमतीचे पुन्हा गाजरशेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याबाबत प्रधानमंत्री मोदींनी घोषणा केली. ती करताना अंमलबजावणी कशी होईल, हे सांगितले नाही. केंद्र शासनाने खरेदी यंत्रणा असलेल्या भारतीय खाद्य निगमच्या सर्व गोदामांची विक्री केली आहे, आता कोणत्या यंत्रणेमार्फत खरेदी केली जाईल, हे न सांगितल्याने आधारभूत किमतीचे गाजर दाखवल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरElectionनिवडणूकBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ