शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २६ कोटी निधीची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 10:58 IST

Agriculture News २६ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी अद्याप शासनाकडून प्राप्त झाला नाही.

अकोला: यावर्षीच्या पावसाळ्यात सतत पाऊस आणि पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाइची मदत देण्यासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेली २६ कोटी ७८ लाख ७३ हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी वितरित करण्यात आली असून, दुसऱ्या टप्प्यातील मदत निधीपोटी २६ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी अद्याप शासनाकडून प्राप्त झाला नाही. त्यामुळे मदतीचा निधी केव्हा प्राप्त होणार, याबाबत जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

यावर्षीच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस आणि पुरामुळे जिल्ह्यात ६९ हजार ५५४ शेतकऱ्यांचे ५१ हजार ७४९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी, तूर पिकांच्या नुकसानीचा समावेश आहे. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ५५ कोटी रुपयांच्या मदतनिधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्या अनुषंगाने शासनाकडून पहिल्या टप्प्यात २६ कोटी ७८ लाख ७३ हजार रुपयांचा मदतनिधी १० नोव्हेंबर रोजी प्राप्त झाला. उपलब्ध मदतीची अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली. तहसील कार्यालयांकडून मदतीची रक्कम बँकांमध्ये जमा करण्यात आली असून, मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पहिल्या ३८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असली तरी, जिल्ह्यातील उर्वरित अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाईची मदत वाटप करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात २६ कोटी ७८ लाख रुपयांचा मदतनिधी अद्याप शासनाकडून प्राप्त झाला नाही. त्यामुळे शासनाकडून मदतनिधी केव्हा उपलब्ध होणार, याबाबत मदतीपासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी