शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्पास केंद्रीय जल आयोगाच्या मान्यतेची प्रतीक्षा

By admin | Updated: October 12, 2015 01:44 IST

नव्या डीएसआरनुसार प्रकल्पाची किंमत सहा हजार ३४ कोटी रुपयांच्या घरात; भूसंपादन प्रक्रिया नव्याने राबविण्याच्या हालचाली.

नीलेश जोशी / खामगाव : घाटाखालील सहा तालुक्यांसहित लगतच्या अकोला जिल्ह्यातील तेल्हारा आणि बाळापूर तालुक्यातील १ लाख १ हजार ८८ हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणार्‍या जिगाव प्रकल्पाचा केंद्राच्या वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम (एआयबीपी) मध्ये समावेश व्हावा, यासाठी मार्च महिन्यात केंद्रीय जल आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास अद्याप अंतिम मान्यतेची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, जिगाव प्रकल्पासाठीच्या भूसंपादन प्रक्रियेमध्ये कथित स्तरावरील दोषपूर्ण कार्यवाहीमुळे नागपूर खंडपीठाने नुकताच शेतकर्‍यांच्या बाजूने निकाल दिल्याने या प्रकल्पाचे काम वेळर्मयादेत पूर्ण होतेय की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. परिणामी २0१८-१९ मध्ये जिगाव प्रकल्पांतर्गत र्मयादित स्वरूपात पाणी अडविण्याच्या हालचालींनाही त्यामुळे काहीसा खो बसण्याची साधार भीती व्यक्त केली जात आहे. या पृष्ठभूमीवर जिगाव प्रकल्प व पुनर्वसन विभागाने भूसंपादनातील त्रुटींची पूर्तता करून नव्याने भूसंपादन करण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याची माहिती जिगाव प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता हेमंत सोळगे यांनी दिली. सोबतच चार गावठाणांसंदर्भातील अडचणी लवकरच सोडविण्यास आमचे प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. १९८९ मधील मूळ प्रशासकीय मान्य ता असलेल्या जिगाव प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरू असून, दरवर्षी या प्रकल्पाच्या कामासाठी अवघे २५0 कोटी राज्य शासनाकडून मिळत आहेत. याच वेगाने हे होत राहिल्यास येत्या २0 वर्षातही हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल की नाही, याबाबत शंका आहे. परिणामस्वरूप केंद्र सरकारच्या वेग वर्धित सिंचन लाभ कार्यक्रमांतर्गत या प्रकल्पाचा समावेश व्हावा, यासाठी गेल्या चार वर्षांंपासून प्रयत्न होत असून, दोन ते पाच मार्चदरम्यान त्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारच्या जलसंसाधन मंत्रालयामार्फत केंद्रीय जल आयोगाकडे पाठविण्यात आला आहे; मात्र त्यास अद्याप अंतिम मान्यता मिळालेली नाही. या प्रकल्पाची द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता ही चार हजार ४४ कोटी ११ लाख रुपयांची होती. आता नव्या डीएसआरनुसार (२0१२-१३) प्रकल्पाची ही किंमत सहा हजार ३४ कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. त्यामुळे किमान पक्षी हा प्रकल्प केंद्र सरकारच्या वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रमामध्ये समाविष्ट होऊ शकतो. यासंदर्भात जिगाव प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता हेमंत सोळगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भूसंपादन प्रक्रियेतील त्रुटी दूर करून प्रोसिजर प्रमाणे ते नव्याने करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

*१५00 कोटींचा खर्च

या प्रकल्पाचे काम २00८ पासून सुरू झाले आहे. तेव्हापासून या प्रकल्पावर मार्च २0१५ पर्यंंत १५00 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. मार्च २0१४ मध्ये तो १२५0 कोटींचा होता तर मार्च २0१३ च्या अखेरीस तो १0४0 कोटी १0 लाख रुपयांचा होता. ४दिवसेंदिवस प्रकल्पाची किंमत वाढत असतानाच प्रकल्पाचे काम मात्र संथ गतीने होत आहे. जिगावचे प्रत्यक्षात ३६ टक्के (भिंतीचे) काम झाले आहे. भिंतीच्या कामासाठी लागणार्‍या ३५0 हेक्टर जमिनीपैकी ३१२ हेक्टर जमिनीची मागे सरळ खरेदी करण्यात आली होती.

* र्मयादित स्वरूपात पाणी अडविणार

      ४२0१९ मध्ये प्रकल्पामध्ये र्मयादित स्वरूपात पाणी अडविण्याचा यंत्रणेचा मानस आहे. याद्वारे परिसरातील ४0 हजार हेक्टर क्षेत्र प्रथमत: सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न आहे; मात्र प्रकल्पामुळे बाधित होणार्‍या ३२ पूर्णत: व १५ अशंत: गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अपेक्षेप्रमाणे हाताळल्या गेलेला नाही. या गावांच्या पुनर्वसनासाठी ७३३ हेक्टर जमिनीची गरज आहे. पहिल्या टप्प्यात पाच, दुसर्‍या टप्प्यात आठ, तिसर्‍या टप्प्या त १३ आणि चौथ्या टप्प्यात १५ अंशत: बाधित गावांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्यामुळे या गावांच्या पुनर्वसनालाही प्राधान्य हवे आहे.