शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

वाडी अदमपूरवासियांचा आठवडाभरापासून पाणी पुरवठा बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 01:29 IST

वाडी अदमपूर : गटग्रामपंचायत पाणी पुरवठा योजनेच्या बोअरवेलचे विद्युत देयक न भरल्याने वीज वितरण कंपनीने या बोअरवेलचा वीज पुरवठा खंडित केल्याने गावातील पाणीपुरवठा मागील आठवडाभरापासून ठप्प आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे.

ठळक मुद्देपाण्यासाठी पायपीट थकीत देयकामुळे पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कवाडी अदमपूर : गटग्रामपंचायत पाणी पुरवठा योजनेच्या बोअरवेलचे विद्युत देयक न भरल्याने वीज वितरण कंपनीने या बोअरवेलचा वीज पुरवठा खंडित केल्याने गावातील पाणीपुरवठा मागील आठवडाभरापासून ठप्प आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. वाडी अदमपूर गावात आधीच सहा दिवसांआड पाणी पुरवठा, त्यातच गत आठवड्यापासून पाणी बंद असल्याने गावात पाणी समस्येने उग्र रूप धारण केले आहे. वाडी अदमपूर गटग्रामपंचायत पाणी पुरवठा योजनेचे गावात तीन बोअरवेल आहेत. त्यामधील एक बोअरवेल पाणी पुरवठा दोन वस्तीत एक दिवसाआड करण्यात येतो, तर उर्वरित दोन बोअरवेलचा पाणी पुरवठा जलकुंभाद्वारे गावात सहा दिवसांआड करण्यात येतो. गावात पाणी पुरवठा करणारी बोअरवेल बंद झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठय़ा प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. नागरिकांना शेतातून एक ते दोन कि.मी. अंतरावरून पाणी आणावे लागते. गावात असलेल्या हातपंपामध्ये एक किंवा दोन हातपंप पाण्यायोग्य पाणी आहे. उर्वरित हातपंपांना गढूळ पाणी येते. सध्या हिवाळ्याच्या दिवसांत महिला, आबालवृद्धांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. गेल्या आठवड्यापासून गावातील पाणी पुरवठा बंद असूनसुद्धा ग्रा. पं. कडून कोणत्याही प्रकारचे पाऊल अद्याप उचलण्यात आले नसल्याने जनतेमध्ये संताप व्यक्त होत आहे. ग्रा. पं.चा पाणी कर मोठय़ा प्रमाणात थकीत आहे. यामुळे बोअरवेलचा वीज पुरवठा खंडित करण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला महावितरण कंपनीकडून नोटीस बजावल्या होत्या. वीज पुरवठा खंडित होण्याबाबत पूर्वकल्पना असतानासुद्धा याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलण्यात आले नाही. दरम्यान सचिव गावात येत नसल्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. वाडी अदमपूर गटग्रामपंचातच्या सचिव, सरपंच तसेच ग्रा. पं. सदस्य यांच्यामध्ये समन्वय नसल्याने वाडी अदमपूर गावातील जनतेला पाणी समस्येसह विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी याबाबत दखल घेऊन वाडी अदमपूर गावातील पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष गटग्रामपंचायत प्रशासनाचे गावात तीन बोअरवेल आहेत. या तीन बोअरवेलच्या विद्युत देयकापोटी असलेली रक्कम सात लाखांच्या आसपास आहे. ही थकीत रक्कम भरण्याबाबतच्या नोटीस महिन्याआधीच महावितरण कंपनीने ग्रामपंचायत प्रशासनाला बजावल्या होत्या. तसेच वीज बिल भरण्यासंबंधी वारंवार सूचनासुद्धा देण्यात आल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले; परंतु ग्रा.पं.ने वीज बिल न भरल्याने वीज पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही महावितरण कंपनीकडून करण्यात आली.

समन्वयाचा अभाव बोअरवेलचा पाणी पुरवठा आठवड्यापासून ठप्प आहे; परंतु ग्रा. पं. प्रशासनाकडून याबाबत कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रा. पं.च्या अनागोंदी कारभाराविषयी जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पाणी पुरवठा योजनेची थकबाकी मोठय़ा प्रमाणात आहे. तसेच गावात मोठय़ा प्रमाणात अवैध नळ कनेक्शन आहेत. यावर ग्रा. पं. कार्यवाही का करण्यात येत नाही, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. सचिव, सरपंच व ग्रा.पं. सदस्य यामध्ये समन्वय नसल्याने नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे.

गावात पाणी कर वसुली चालू आहे. दोन-तीन दिवसांत वीज बिल भरून पाणी पुरवठा सुरू करू.- व्ही. व्ही. चव्हाण,सचिव, ग्रामपंचायत वाडी अदमपूर.

आधीच आठवड्यातून एकदाच पाणी मिळते. बारा दिवसांपासून पाणी बंद असल्याने शेतातून पाणी आणावे लागते.- सुनील वर्गे, नागरिक, वाडी अदमपूर.-

टॅग्स :Waterपाणी