शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वाडी अदमपूरवासियांचा आठवडाभरापासून पाणी पुरवठा बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 01:29 IST

वाडी अदमपूर : गटग्रामपंचायत पाणी पुरवठा योजनेच्या बोअरवेलचे विद्युत देयक न भरल्याने वीज वितरण कंपनीने या बोअरवेलचा वीज पुरवठा खंडित केल्याने गावातील पाणीपुरवठा मागील आठवडाभरापासून ठप्प आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे.

ठळक मुद्देपाण्यासाठी पायपीट थकीत देयकामुळे पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कवाडी अदमपूर : गटग्रामपंचायत पाणी पुरवठा योजनेच्या बोअरवेलचे विद्युत देयक न भरल्याने वीज वितरण कंपनीने या बोअरवेलचा वीज पुरवठा खंडित केल्याने गावातील पाणीपुरवठा मागील आठवडाभरापासून ठप्प आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. वाडी अदमपूर गावात आधीच सहा दिवसांआड पाणी पुरवठा, त्यातच गत आठवड्यापासून पाणी बंद असल्याने गावात पाणी समस्येने उग्र रूप धारण केले आहे. वाडी अदमपूर गटग्रामपंचायत पाणी पुरवठा योजनेचे गावात तीन बोअरवेल आहेत. त्यामधील एक बोअरवेल पाणी पुरवठा दोन वस्तीत एक दिवसाआड करण्यात येतो, तर उर्वरित दोन बोअरवेलचा पाणी पुरवठा जलकुंभाद्वारे गावात सहा दिवसांआड करण्यात येतो. गावात पाणी पुरवठा करणारी बोअरवेल बंद झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठय़ा प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. नागरिकांना शेतातून एक ते दोन कि.मी. अंतरावरून पाणी आणावे लागते. गावात असलेल्या हातपंपामध्ये एक किंवा दोन हातपंप पाण्यायोग्य पाणी आहे. उर्वरित हातपंपांना गढूळ पाणी येते. सध्या हिवाळ्याच्या दिवसांत महिला, आबालवृद्धांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. गेल्या आठवड्यापासून गावातील पाणी पुरवठा बंद असूनसुद्धा ग्रा. पं. कडून कोणत्याही प्रकारचे पाऊल अद्याप उचलण्यात आले नसल्याने जनतेमध्ये संताप व्यक्त होत आहे. ग्रा. पं.चा पाणी कर मोठय़ा प्रमाणात थकीत आहे. यामुळे बोअरवेलचा वीज पुरवठा खंडित करण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला महावितरण कंपनीकडून नोटीस बजावल्या होत्या. वीज पुरवठा खंडित होण्याबाबत पूर्वकल्पना असतानासुद्धा याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलण्यात आले नाही. दरम्यान सचिव गावात येत नसल्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. वाडी अदमपूर गटग्रामपंचातच्या सचिव, सरपंच तसेच ग्रा. पं. सदस्य यांच्यामध्ये समन्वय नसल्याने वाडी अदमपूर गावातील जनतेला पाणी समस्येसह विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी याबाबत दखल घेऊन वाडी अदमपूर गावातील पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष गटग्रामपंचायत प्रशासनाचे गावात तीन बोअरवेल आहेत. या तीन बोअरवेलच्या विद्युत देयकापोटी असलेली रक्कम सात लाखांच्या आसपास आहे. ही थकीत रक्कम भरण्याबाबतच्या नोटीस महिन्याआधीच महावितरण कंपनीने ग्रामपंचायत प्रशासनाला बजावल्या होत्या. तसेच वीज बिल भरण्यासंबंधी वारंवार सूचनासुद्धा देण्यात आल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले; परंतु ग्रा.पं.ने वीज बिल न भरल्याने वीज पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही महावितरण कंपनीकडून करण्यात आली.

समन्वयाचा अभाव बोअरवेलचा पाणी पुरवठा आठवड्यापासून ठप्प आहे; परंतु ग्रा. पं. प्रशासनाकडून याबाबत कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रा. पं.च्या अनागोंदी कारभाराविषयी जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पाणी पुरवठा योजनेची थकबाकी मोठय़ा प्रमाणात आहे. तसेच गावात मोठय़ा प्रमाणात अवैध नळ कनेक्शन आहेत. यावर ग्रा. पं. कार्यवाही का करण्यात येत नाही, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. सचिव, सरपंच व ग्रा.पं. सदस्य यामध्ये समन्वय नसल्याने नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे.

गावात पाणी कर वसुली चालू आहे. दोन-तीन दिवसांत वीज बिल भरून पाणी पुरवठा सुरू करू.- व्ही. व्ही. चव्हाण,सचिव, ग्रामपंचायत वाडी अदमपूर.

आधीच आठवड्यातून एकदाच पाणी मिळते. बारा दिवसांपासून पाणी बंद असल्याने शेतातून पाणी आणावे लागते.- सुनील वर्गे, नागरिक, वाडी अदमपूर.-

टॅग्स :Waterपाणी