शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

विश्व हिंदू परिषदेची ‘शेतकरी जागर यात्रा’ १५ जानेवारीपासून; ८३ तालुक्यांमधून जाणार यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 19:05 IST

विश्व हिंदू परिषदेच्यावतीने १५ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत विदर्भात बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा व गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी या दोन ठिकाणांहून ‘शेतकरी जागर यात्रा’ काढण्यात येणार आहे.

ठळक मुद्देबुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा व गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी या दोन ठिकाणांहून ‘शेतकरी जागर यात्रा’ काढण्यात येणारया यात्रेत डीजीटल रथ राहणार असून, मोठ्या एलईडी स्क्रीनद्वारे जैविक शेती, गोपालन आदींचा जागर केला जाणार आहे.यात्रा २५५१ किमीचा प्रवास करून वर्धा येथे २६ जानेवारी रोजी या यात्रेचा समारोप होणार आहे.

अकोला : शेतकऱ्यांमधील कृषीधर्म जागृत करून, त्यांना गोवंश पालनाचे महत्व समजावून सांगणे, रसायनमुक्त शेतीसाठी प्रोत्साहीत करणे या उद्देशाने विश्व हिंदू परिषदेच्यावतीने १५ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत विदर्भात बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा व गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी या दोन ठिकाणांहून ‘शेतकरी जागर यात्रा’ काढण्यात येणार असून, वर्धा येथे या यात्रेचा समारोप होणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेकडून सोमवारी येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.येथील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना सनतकुमार गुप्ता यांनी सांगितले की, शेतकरी बांधवांमधील कृषीधर्म जागृत करण्यासाठी विदर्भात दोन शेतकरी जागर यात्रा काढण्यात येणार आहेत. जिजाऊंची जन्मभूमी सिंदखेड राजा आणि अहेरी येथून या यात्रांचा शुभारंभ होणार आहे. एकून दहा दिवस चालणारी ही यात्रा २५५१ किमीचा प्रवास करणार आहे. स्वदेशीचा मुलमंत्र देणारे महात्मा गांधी व विनोबा भावे यांची कर्मभूमी वर्धा येथे २६ जानेवारी रोजी या यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रेत डीजीटल रथ राहणार असून, मोठ्या एलईडी स्क्रीनद्वारे जैविक शेती, गोपालन आदींचा जागर केला जाणार आहे. या स्क्रिनवर जैविक शेती यशस्वी करणाºया शेतकºयांच्या मुलाखती, गो-विज्ञान अनुसंधान केंद्र, देवलापार व गो-सेवा केंद्र, म्हैसपूर या संस्थांनी केलेल्या अनुसंधानपर प्रयोगांची माहिती देण्यात येईल. तसेच या यात्रेतून गोवंश पालनातून समृद्धीकडे कसे जाता येईल, याविषयी प्रत्यक्ष होत असलेल्या कामाची चित्रफीत प्रदर्शीत केल्या जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेस संयोजक अ‍ॅड. अमोल अंधारे, अटल पांडे, महेंद्र देशमुख, गोविंदराव शेंडे, हेमंत थोरात, सुरज भगेवार, डॉ. संजय एकापूरे, राजेश्वर निवळ आदींची उपस्थिती होती.दररोज दोन शेतकरी मेळावे, ३ कृषी वार्ताया यात्रेदरम्यान, दररोज दोन शेतकरी मेळावे, ३ कृषी वार्ता व ३ कृषी चर्चा, रात्री कृषी किर्तन होणार आहे. विदर्भातील ८३ तालुक्यातील गावांमधील लाखो शेतकºयांशी संवाद साधण्यात येणार आहे. गोवंश पालनासोबत जैवीक शेतीचे यशस्वी प्रयोग करणारे शेतकरी या यात्रेत मार्गदर्शन करणार आहेत. गोवंश पालन व जैविक शेती करणााºया शेतकºयांचाही सत्कार करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरFarmerशेतकरी