शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

ग्रामस्थांनी बंद पाडले पिंजर-निहीदा मार्गावरील पुलाच्या दुरुस्तीचे काम  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 17:25 IST

बहिरखेड (जि. अकोला): बार्शीटाकळी तालुक्यातील निहिदा ते पिंजर मार्गावरील पिंजर्डा नदीवरील जुन्या पुलाची दुरुस्ती करण्याऐवजी या ठिकाणी नवीन व उंच पुल बांधावा, अशी मागणी करीत, परिसरातील सहा गावांचे सरपंच व ग्रामस्थांनी मंगळवारी पुलाच्या दुरुस्तीचे काम बंद पाडले.

ठळक मुद्देअचानक जाग आलेल्या बांधकाम विभागाने या पुलाचे भगदाड बुजविण्यासाठी २ लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला व २० मार्च रोजी कामाला सुरुवात केली. ही बाब समजताच मौजा बहिरखेड, निहिदा, सावरखेड, जमकेश्वर, पिंपळगाव हांडे आणि धाकली येथील सरपंच व ग्रामस्थांनी मंगळवारी पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला विरोध केला.सरपंच व ग्रामस्थांनी बुधवार २१ मार्च रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम जि. प. अकोला यांना निवेदन देऊन नवीन पुल बांधण्याची मागणी केली.

-  किरण ठाकरे बहिरखेड (जि. अकोला): बार्शीटाकळी तालुक्यातील निहिदा ते पिंजर मार्गावरील पिंजर्डा नदीवरील जुन्या पुलाची दुरुस्ती करण्याऐवजी या ठिकाणी नवीन व उंच पुल बांधावा, अशी मागणी करीत, परिसरातील सहा गावांचे सरपंच व ग्रामस्थांनी मंगळवारी पुलाच्या दुरुस्तीचे काम बंद पाडले. वारंवार थातुरमातुर दुरुस्ती करण्याऐवजी कायमस्वरुपी नवीन पुल बांधण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी बुधवारी जिल्हा परिषद बांधकाम विभागास दिले.निहिदा- पिंजर मार्गावरील नदीवर गेल्या ३० ते ३५ वर्षापूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. काळाच्या ओघात कमकुवत झालेल्या या पुलाची अतिशय दयनिय अवस्था झालेली असून, पुलावर मोठे भगदाड पडले आहे. सदर रस्ता हा अकोला जि. प. बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्याने, ग्रामस्थांनी या मार्गावर नवीन पुलाची बांधणी करून उंच पूल तयार करण्याची मागणी संबंधित विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.२ परंतु जि. प. बांधकाम विभागाकडून या मागणीची दखल घेतल्या गेली नाही. आता आर्थिक वर्ष संपत आल्याचे पाहून अचानक जाग आलेल्या बांधकाम विभागाने या पुलाचे भगदाड बुजविण्यासाठी २ लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला व २० मार्च रोजी कामाला सुरुवात केली. ही बाब समजताच मौजा बहिरखेड, निहिदा, सावरखेड, जमकेश्वर, पिंपळगाव हांडे आणि धाकली येथील सरपंच व ग्रामस्थांनी मंगळवारी पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला विरोध केला. हा पूल शिकस्त झालेला असून , त्याला मलमपट्टी कशाला करता, त्याऐवजी नवीन पुलाचे बांधकाम करा, असे म्हणत ग्रामस्थांनी शिकस्त झालेल्या पुलाच्या दुरुस्तीचे काम बंद पाडले. एवढेच नव्हे, तर सरपंच व ग्रामस्थांनी बुधवार २१ मार्च रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम जि. प. अकोला यांना निवेदन देऊन नवीन पुल बांधण्याची मागणी केली.पुलावरून ९ ते १० गावांची वर्दळनिहिदा ते पिंजय या रस्त्यावर ९ ते १० गावे आहेत. पिंजर हे मुख्य बाजारपेठ असल्याने शाळकरी विद्यार्थी व ग्रामस्थांना दररोज या मार्गावरील पुलावरून ये-जा करावी लागते. पावसाळ्यात नदीला पुर येऊन नेहमीच हा पुल वाहतुकीसाठी बंद असतो. त्यामुळे परिसरातील १० गावातील लोकांनी खासदार, आमदार यांच्याकडे निवेदन देऊन या मार्गावर नवीन पुलाची निर्मिती करण्याची मागणी लावून धरली आहे. (वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदsarpanchसरपंच