शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांनी बंद पाडले पिंजर-निहीदा मार्गावरील पुलाच्या दुरुस्तीचे काम  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 17:25 IST

बहिरखेड (जि. अकोला): बार्शीटाकळी तालुक्यातील निहिदा ते पिंजर मार्गावरील पिंजर्डा नदीवरील जुन्या पुलाची दुरुस्ती करण्याऐवजी या ठिकाणी नवीन व उंच पुल बांधावा, अशी मागणी करीत, परिसरातील सहा गावांचे सरपंच व ग्रामस्थांनी मंगळवारी पुलाच्या दुरुस्तीचे काम बंद पाडले.

ठळक मुद्देअचानक जाग आलेल्या बांधकाम विभागाने या पुलाचे भगदाड बुजविण्यासाठी २ लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला व २० मार्च रोजी कामाला सुरुवात केली. ही बाब समजताच मौजा बहिरखेड, निहिदा, सावरखेड, जमकेश्वर, पिंपळगाव हांडे आणि धाकली येथील सरपंच व ग्रामस्थांनी मंगळवारी पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला विरोध केला.सरपंच व ग्रामस्थांनी बुधवार २१ मार्च रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम जि. प. अकोला यांना निवेदन देऊन नवीन पुल बांधण्याची मागणी केली.

-  किरण ठाकरे बहिरखेड (जि. अकोला): बार्शीटाकळी तालुक्यातील निहिदा ते पिंजर मार्गावरील पिंजर्डा नदीवरील जुन्या पुलाची दुरुस्ती करण्याऐवजी या ठिकाणी नवीन व उंच पुल बांधावा, अशी मागणी करीत, परिसरातील सहा गावांचे सरपंच व ग्रामस्थांनी मंगळवारी पुलाच्या दुरुस्तीचे काम बंद पाडले. वारंवार थातुरमातुर दुरुस्ती करण्याऐवजी कायमस्वरुपी नवीन पुल बांधण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी बुधवारी जिल्हा परिषद बांधकाम विभागास दिले.निहिदा- पिंजर मार्गावरील नदीवर गेल्या ३० ते ३५ वर्षापूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. काळाच्या ओघात कमकुवत झालेल्या या पुलाची अतिशय दयनिय अवस्था झालेली असून, पुलावर मोठे भगदाड पडले आहे. सदर रस्ता हा अकोला जि. प. बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्याने, ग्रामस्थांनी या मार्गावर नवीन पुलाची बांधणी करून उंच पूल तयार करण्याची मागणी संबंधित विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.२ परंतु जि. प. बांधकाम विभागाकडून या मागणीची दखल घेतल्या गेली नाही. आता आर्थिक वर्ष संपत आल्याचे पाहून अचानक जाग आलेल्या बांधकाम विभागाने या पुलाचे भगदाड बुजविण्यासाठी २ लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला व २० मार्च रोजी कामाला सुरुवात केली. ही बाब समजताच मौजा बहिरखेड, निहिदा, सावरखेड, जमकेश्वर, पिंपळगाव हांडे आणि धाकली येथील सरपंच व ग्रामस्थांनी मंगळवारी पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला विरोध केला. हा पूल शिकस्त झालेला असून , त्याला मलमपट्टी कशाला करता, त्याऐवजी नवीन पुलाचे बांधकाम करा, असे म्हणत ग्रामस्थांनी शिकस्त झालेल्या पुलाच्या दुरुस्तीचे काम बंद पाडले. एवढेच नव्हे, तर सरपंच व ग्रामस्थांनी बुधवार २१ मार्च रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम जि. प. अकोला यांना निवेदन देऊन नवीन पुल बांधण्याची मागणी केली.पुलावरून ९ ते १० गावांची वर्दळनिहिदा ते पिंजय या रस्त्यावर ९ ते १० गावे आहेत. पिंजर हे मुख्य बाजारपेठ असल्याने शाळकरी विद्यार्थी व ग्रामस्थांना दररोज या मार्गावरील पुलावरून ये-जा करावी लागते. पावसाळ्यात नदीला पुर येऊन नेहमीच हा पुल वाहतुकीसाठी बंद असतो. त्यामुळे परिसरातील १० गावातील लोकांनी खासदार, आमदार यांच्याकडे निवेदन देऊन या मार्गावर नवीन पुलाची निर्मिती करण्याची मागणी लावून धरली आहे. (वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदsarpanchसरपंच