शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

अकोला जिल्ह्यातील ५१० गावांत ग्रामस्थांना मिळत नाही ५५ लीटर पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 10:45 AM

Akola News ५१० गावांतील ग्रामस्थांना दरडोई प्रतिदिवस ५५ लीटर पाणी मिळत नसल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात सात प्रादेशिक, ४९६ स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांव्दारे पाणी पुरवठा.ग्रामस्थांना दरडोई प्रती दिवस ४० लीटर किंवा त्यापेक्षा कमी पाणी मिळत आहे.

अकोला: जिल्ह्यातील ग्रामीण भागात सात प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आणि ४९६ स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामध्ये प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत जिल्ह्यातील २०६ गावांतील ग्रामस्थांना दरडोई प्रती दिवस ५५ लीटर पाणी पुरवठा करण्यात येत असला तरी, जिल्ह्यातील ५१० गावांतील ग्रामस्थांना दरडोई प्रतिदिवस ५५ लीटर पाणी मिळत नसल्याचे वास्तव आहे.

शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबास २०२४ पर्यंत नळजोडणीव्दारे दरडोई प्रती दिवस ५५ लीटर पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यात सद्यस्थितीत सात प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांतर्गत व ग्रामपंचायतींच्या ४९६ स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांव्दारे पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांतर्गत २०६ गावांतील ग्रामस्थांना दरडोई प्रती दिवस ५५ लीटर पाणी पुरवठा करण्यात येत असून, जिल्ह्यातील ५१० गावांतील ग्रामस्थांना दरडोई प्रती दिवस ४० लीटर किंवा त्यापेक्षा कमी पाणी मिळत आहे.

किती दिवसाआड मिळते पाणी

अकोट येथील ८४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ३ दिवसाआड.

अकोला तालुक्यातील खांबोरा ६० खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत १० ते १२ दिवसाआड.

खांबोरा ४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ३ दिवसाआड.

बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर १० गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत २ दिवसाआड.

बाळापूर तालुक्यातील लोहारा २ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत दररोज.

बाळापूर तालुक्यातील वझेगाव २ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत दररोज.

मूर्तिजापूर तालुक्यातील लंघापूर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ११ गावांना ........ दिवसाआड.

 

एकाही गावात नाही पाणीटंचाई!

यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील धरणे, तलाव, विहिरींमध्ये लक्षणीय जलसाठा उपलब्ध असून, नदी व नाले वाहत असल्याच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत जिल्ह्यातील एकाही गावात पाणीटंचई नाही.

 

६९९ गावांसाठी २२७ योजनांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले!

जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ६९९ गावांमध्ये ग्रामस्थांना दरडोई प्रती दिवस ५५ लीटर पाणी उपलब्ध करण्यासाठी २२७ याेजनांचे प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत.

 

जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांतर्गत २०६ गावांत दरडाेई प्रतिदिवस ५५ लीटर पाणी उपलब्ध करण्यात येत आहे. ५१० गावांत दरडोई प्रतिदिवस ४० लीटर किंवा त्यापेक्षा कमी पाणी मिळत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ६९९ गावांत दरडाेई प्रतिदिवस ५५ लीटर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी २२७ योजनांचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले.

 ए.ए. खान उपकार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद.

टॅग्स :Akolaअकोलाwater transportजलवाहतूक