शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

नदीकाठी गाव...अन् पाणी नाही राव...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 13:53 IST

घुसरवाडी, म्हातोडी, लाखोंडा, कासली, दोनवाडा गावांमध्ये जाऊन पाणीटंचाईचा आढावा घेतला असता, हंडाभर पाण्यासाठी गावकरी रानोमाळ भटकंती करीत असल्याचे भीषण चित्र दृष्टीस पडले.

ठळक मुद्देया गावात गेल्यागेल्याचरस्त्यावरील एका झिरपत्या व्हॉल्व्हमधून गावकरी ड्रम, टाकी, कॅनमध्ये गढूळ पाणी भरताना दिसले. दोनवाडा गावात गेल्यावर, ग्रामपंचायत कार्यालयात पाण्याचा टँकर आलेला. टँकरवर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची रांग लावली होती.गावात नळ आहेत; परंतु पाणी नाही. गावाला सध्या देवरीवरून टँकरने पाणीपुरवठा होतो.

- नितीन गव्हाळे

अकोला: खारपाणपट्ट्यातील घुसरवाडी, म्हातोडी, कासली आणि दोनवाडा गावांमध्ये भीषण पाणीटंचाई... गावे सधन; परंतु पाण्याचा टिपूसदेखील नाही. ग्रामपंचायतींचे पाण्यासाठी कोणतेही नियोजन नाही. पाणी नसल्यामुळे गावातील युवकांचा वांधा झालेला... हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ...त्यामुळे लग्नासाठी कुणीच पोरीच देईना...अशी परिस्थिती. दोनवाडा हे सधन कास्तकारांचे गाव; परंतु नदीकाठी गाव...आणि पाणी नाही राव...! असे गावात येणारा पाहुणा आश्चर्याने विचारताना दिसून येतो. गावात नदी असूनही गावकºयांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो.बुधवारी सकाळी लोकमत चमूने बारुल्यातील घुसरवाडी, म्हातोडी, लाखोंडा, कासली, दोनवाडा गावांमध्ये जाऊन पाणीटंचाईचा आढावा घेतला असता, हंडाभर पाण्यासाठी गावकरी रानोमाळ भटकंती करीत असल्याचे भीषण चित्र दृष्टीस पडले. घुसर गावाजवळून गेल्यावर काही अंतरावरच घुसरवाडी गाव दृष्टीस पडते. या गावात गेल्यागेल्याचरस्त्यावरील एका झिरपत्या व्हॉल्व्हमधून गावकरी ड्रम, टाकी, कॅनमध्ये गढूळ पाणी भरताना दिसले. गावात १५ दिवसांतून नळ आले तर आले नाही तर तेही येत नाही. पिण्यासाठी, वापरण्यासाठी पाणी तर लागतच ना! पाणी आणावे तरी कुठून? गावात पाण्याच्या टाक्या आहेत; परंतु त्यात पाण्याचा टिपूसदेखील नाही. ग्रामपंचायतचे पाण्यासाठी नियोजन नाही. पाणीपुरवठा योजना नाही. अशीच परिस्थिती म्हातोडी गावाची आहे. गावात पोहोचण्यापूर्वी मिनी ट्रॅक्टरवर पाच ते सहा ड्रम घेऊन काही युवक जाताना दिसले. घरी लग्नसमारंभ असल्यामुळे ते घुसरमध्ये पाणी आणायला जात होते. गावामध्ये पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे पाण्यासाठी गावकºयांवर भटकंती करण्याची वेळ आल्याचे युवकांनी सांगितले. म्हातोडी गावात पोहोचल्यावर...गावातील महिला-पुरुष काही जवळच्याच लाखोंडा गावातील एका विहिरीवरून पाणी आणत असल्याचे दिसले. लाखोंडा गावात पोहोचल्यावर गावातील महिला, चिमुकल्या मुली हंडा घेऊन विहिरीवर पाणी भरताना दिसल्या. त्यांच्याशी संवाद साधल्यावर, निवडणुका आल्या की, ग्रामपंचायतचे पदाधिकारी नुसती आश्वासने देतात. करीत काहीच नाही. गावात नळ आहेत; परंतु नळाला पाणी येण्याची गॅरंटी नाही. गावाच्या वेशीवर जुनी विहीर आहे. त्यामुळे भागते कसं तरी? अशी बोलकी प्रतिक्रिया महिला, युवकांनी दिली. कासली गावाची परिस्थिती काही वेगळी नाही. तेथून सहा किमी अंतरावरील दोनवाडा गावात गेल्यावर, ग्रामपंचायत कार्यालयात पाण्याचा टँकर आलेला. टँकरवर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची रांग लावली होती. एकंदरीतच या गावांमधील ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणीच आणतंय.

गावात नदी अन् टँकरने पाणी!दोनवाडा गाव पूर्णा नदीच्या काठावर आहे. पूर्वी पूर्णा नदी बारामाही वाहायची. तेव्हा गुराढोरांच्या पाण्याच्या प्रश्न नव्हता. आता परिस्थिती बदलली आहे. गावात नळ आहेत; परंतु पाणी नाही. गावाला सध्या देवरीवरून टँकरने पाणीपुरवठा होतो. दिवसभरात एका कुटुंबाला ३५ लीटरपेक्षा पाणी मिळत नाही. एवढी गंभीर परिस्थिती गावावर ओढावली आहे.

पंधरा दिवसात वारीचे पाणी येणारदोनवाडा गावात पाणीटंचाईचा आढावा घेतला असता, पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे; परंतु ग्रामपंचायतने पाण्यासाठी पाइपलाइन मंजूर करून घेतली आहे. पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. पंधरा दिवसात गावामध्ये वारीचे पाणी पोहोचणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई