शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

विधी महाविद्यालय प्रवेशाकडे विद्यार्थ्यांंनी फिरविली पाठ!

By admin | Updated: October 13, 2016 02:55 IST

अमरावती विभागातील परिस्थिती; बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांचा फटका.

अकोला, दि. १२- बार कौन्सिल ऑफ इंडिया व राज्य शासनाच्या आठमुठे धोरणामुळे विधी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांंनी अक्षरश: पाठ फिरविली आहे. तीन आणि पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाला विद्यार्थी प्रवेशच घेत नसल्याची परिस्थिती अमरावती विभागातील ११ महाविद्यालयांमध्ये दिसून येत आहे. तीन वर्षीय अभ्यासक्रमाला केवळ ४५ टक्के विद्यार्थ्यांंनी प्रवेश घेतला आहे, तर पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाला केवळ २२ टक्के विद्यार्थ्यांंनी प्रवेश घेतल्याची बाब समोर आली आहे. विधी अभ्यासक्रमासाठी यावर्षी प्रथमच राज्य शासनाने सीईटी घेतली. त्यामुळे विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली. त्यात बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांमुळे विद्यार्थ्यांंमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. ऑगस्ट महिन्यात विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आटोपते; परंतु यावर्षी २१ सप्टेंबरपासून विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश फेरीसाठीची प्रक्रिया सुरू झाली. प्रवेश प्रक्रिया लांबल्यामुळे आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या जाचक अटींमुळे विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या हजारो विद्यार्थ्यांंंनी पाठ फिरविली तर शेकडो विद्यार्थ्यांंनी सीईटीच्या निर्णयामुळे मध्य प्रदेशातील विधी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला. एवढेच नाही, तर बार कौन्सिल ऑफ इंडियाने अनेक जाचक अटी लादून अनेक महाविद्यालयांची मान्यतासुद्धा काढून घेतली आणि लाखो रुपयांचे मान्यता शुल्क भरल्याशिवाय विधी महाविद्यालयांना मान्यता देणार नसल्याची भूमिका बार कौन्सिल ऑफ इंडियाने घेतली. त्यामुळे विद्यार्थ्यांंंमध्ये संभ्रम निर्माण झाला. ऐनवेळेवर सीईटी परीक्षेचा निर्णय घेतल्याने, विद्यार्थी गोंधळात पडले. सीईटीची तयारी केली नसल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांंंनी सीईटी परीक्षाच दिली नाही. बारावी परीक्षेत प्राविण्यश्रेणीचे गुण मिळवून विद्यार्थ्यांंंना प्रवेश नाकारण्यात आला. विशेष म्हणजे सीईटीमध्ये शुन्य गुण मिळणार्‍या विद्यार्थ्यांंंना मात्र विधी अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याची भूमिका बार कौन्सिल ऑफ इंडियाने घेतल्यानंतरही विद्यार्थ्यांंंनी विधी अभ्यासक्रमाकडे पाठ फिरविली, त्यामुळे अमरावती विभागातील अकराही विधी महाविद्यालयांमधील हजारो जागा रिक्त आहेत.

अमरावती विभागातील जागा व प्रवेशाची परिस्थितीजिल्हा               जागा              प्रवेशअमरावती           ३६0(३ वर्ष)      १८६                         २४0(५ वर्ष)     ११२अकोला               ३00(३ वर्ष)     १८0                         १२0(५ वर्ष)      ३१बुलडाणा             १२0(३ वर्ष)       ८२                         १२0(५ वर्ष)       ४७ यवतमाळ           १८0(३ वर्ष)      १२३                        १८0(५ वर्ष)        ८९वाशिम                 ६0(३ वर्ष)       ४२                          ६0(५ वर्ष)        २१.......................................................                            १६२0            ९१३७0७ जागा रिक्त अमरावती विभागातील ११ महाविद्यालयांमध्ये तीन वर्षीय व पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या १६२0 जागा आहेत. यापैकी ९१३ विद्यार्थ्यांंंनी या दोन्ही अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. यंदा विधी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांंंनी पाठ फिरविल्यामुळे अनेक विधी महाविद्यालयांमधील ७0७ जागा रिक्त राहणार आहेत. --शासनाने अचानक सीईटी परीक्षा घेतली. त्यामुळे हजारो विद्यार्थी सीईटीची तयारी करू शकले नाहीत. प्रवेश प्रक्रिया लांबली. हजारो विद्यार्थी विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत; परंतु सीईटीमुळे त्यांना पर्याय शोधावा लागत आहे. शासनाने सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांंंना प्रवेश द्यायला हवा. रत्ना चांडक, प्राचार्यअकोला विधी महाविद्यालय.