शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

विदर्भातील ४० टक्क्यांवर उत्पादन घटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:16 IST

विदर्भातील जवळपास २० ते २५ लाख हेक्टरवरील पिकांना धोका निर्माण झाला असून, यावर्षी ४० टक्क्यांवर उत्पादनात घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

- राजरत्न सिरसाटअकोला : मान्सून विलंबाने आल्याने पेरणीस उशीर झाला; अल्प पावसात पेरण्या सुरू असतानाच पुन्हा चार आठवडे पावसाने दडी मारल्याने विदर्भातील जवळपास २० ते २५ लाख हेक्टरवरील पिकांना धोका निर्माण झाला असून, यावर्षी ४० टक्क्यांवर उत्पादनात घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.राज्यात आजमितीस ८० टक्क्यांवर पेरण्या आटोपल्या आहेत. विदर्भातील अमरावती विभागात ९३ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. तथापि, नागपूर विभागातील चित्र वेगळे आहे. या विभागातील सात लाख हेक्टरवर शेतकरी धान पीक घेतात; परंतु पाऊसच नसल्याने यातील ६० टक्के क्षेत्रावरील धान पिकाची रोवणी रखडली आहे. दोन्ही विभागात धानासोबतच सोयाबीन, कापूस पेरणीच क्षेत्र प्रत्येकी १५ लाख हेक्टर आहे. गळीत, तृण, कडधान्य मिळून विदर्भात खरीप हंगामातील ४९ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीलायक आहे; परंतु आजमितीस कोरडवाहू क्षेत्रावरील पीक शेवटच्या घटका मोजत आहे. त्यामुळे पाऊस आला तरी खुंटलेल्या पिकांपासून अपेक्षित उत्पादन मिळणे कठीण असल्याने हजारो शेतकऱ्यांना अर्ध रब्बी, रब्बी पिकांचे नियोजन करण्याची वेळ आली आहे. पुण्याच्या कृषी आयुक्तालयानेदेखील यासाठीचे आपत्कालीन पीक नियोजन केले आहे. ३१ जुलैपर्यंत पेरणी करायची असल्यास संकरित बाजरी, सूर्यफूल, सोयाबीन अधिक तूर, बाजरी अधिक तूर, एरंडी अधिक धने (मिश्र पीक ) यासारखी पिके कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार घेण्याचा सल्ला दिला आहे. १ ते १५ आॅगस्टपर्यंत एरंडी, तीळ, संकरित बाजरी, रागी, एरंडी अधिक धने मिश्र पिके घ्यावीत, १६ ते ३१ आॅगस्टपर्यंत अशीच पिके घ्यावीत तथापि कापूस, ज्वारी, भुईमूग ही पिके घेऊ नयेत, असेही सल्ला देताना म्हटले आहे. दरम्यान, असे सर्व असले तरी शेतकरी आताच गलितगात्र झाला असून, त्याच्याकडे पैसाच नसल्याने दुबार पेरणी करणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

 मूग, उडीद हातचा गेला!धान, मूग, उडिदाचे पीक हातचे गेल्यात जमा आहे. सोयाबीन तग धरू न होते; मात्र आता त्याचीही वाट लागली आहे. कापसाची वाढ खुंटली असून, ज्वारीचेही पीक करपले आहे.

- पाऊसच नसल्याने विदर्भातील २० ते २५ लाख हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे यावर्षी ४० टक्क्यांवर उत्पादन घटण्याची शक्यता आहे.डॉ. शरद निंबाळकर,माजी कुलगुरू ,डॉ. पंदेकृवि, अकोला.

 

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोलाFarmerशेतकरी