शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

विदर्भातील ४० टक्क्यांवर उत्पादन घटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:16 IST

विदर्भातील जवळपास २० ते २५ लाख हेक्टरवरील पिकांना धोका निर्माण झाला असून, यावर्षी ४० टक्क्यांवर उत्पादनात घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

- राजरत्न सिरसाटअकोला : मान्सून विलंबाने आल्याने पेरणीस उशीर झाला; अल्प पावसात पेरण्या सुरू असतानाच पुन्हा चार आठवडे पावसाने दडी मारल्याने विदर्भातील जवळपास २० ते २५ लाख हेक्टरवरील पिकांना धोका निर्माण झाला असून, यावर्षी ४० टक्क्यांवर उत्पादनात घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.राज्यात आजमितीस ८० टक्क्यांवर पेरण्या आटोपल्या आहेत. विदर्भातील अमरावती विभागात ९३ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. तथापि, नागपूर विभागातील चित्र वेगळे आहे. या विभागातील सात लाख हेक्टरवर शेतकरी धान पीक घेतात; परंतु पाऊसच नसल्याने यातील ६० टक्के क्षेत्रावरील धान पिकाची रोवणी रखडली आहे. दोन्ही विभागात धानासोबतच सोयाबीन, कापूस पेरणीच क्षेत्र प्रत्येकी १५ लाख हेक्टर आहे. गळीत, तृण, कडधान्य मिळून विदर्भात खरीप हंगामातील ४९ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीलायक आहे; परंतु आजमितीस कोरडवाहू क्षेत्रावरील पीक शेवटच्या घटका मोजत आहे. त्यामुळे पाऊस आला तरी खुंटलेल्या पिकांपासून अपेक्षित उत्पादन मिळणे कठीण असल्याने हजारो शेतकऱ्यांना अर्ध रब्बी, रब्बी पिकांचे नियोजन करण्याची वेळ आली आहे. पुण्याच्या कृषी आयुक्तालयानेदेखील यासाठीचे आपत्कालीन पीक नियोजन केले आहे. ३१ जुलैपर्यंत पेरणी करायची असल्यास संकरित बाजरी, सूर्यफूल, सोयाबीन अधिक तूर, बाजरी अधिक तूर, एरंडी अधिक धने (मिश्र पीक ) यासारखी पिके कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार घेण्याचा सल्ला दिला आहे. १ ते १५ आॅगस्टपर्यंत एरंडी, तीळ, संकरित बाजरी, रागी, एरंडी अधिक धने मिश्र पिके घ्यावीत, १६ ते ३१ आॅगस्टपर्यंत अशीच पिके घ्यावीत तथापि कापूस, ज्वारी, भुईमूग ही पिके घेऊ नयेत, असेही सल्ला देताना म्हटले आहे. दरम्यान, असे सर्व असले तरी शेतकरी आताच गलितगात्र झाला असून, त्याच्याकडे पैसाच नसल्याने दुबार पेरणी करणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

 मूग, उडीद हातचा गेला!धान, मूग, उडिदाचे पीक हातचे गेल्यात जमा आहे. सोयाबीन तग धरू न होते; मात्र आता त्याचीही वाट लागली आहे. कापसाची वाढ खुंटली असून, ज्वारीचेही पीक करपले आहे.

- पाऊसच नसल्याने विदर्भातील २० ते २५ लाख हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे यावर्षी ४० टक्क्यांवर उत्पादन घटण्याची शक्यता आहे.डॉ. शरद निंबाळकर,माजी कुलगुरू ,डॉ. पंदेकृवि, अकोला.

 

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोलाFarmerशेतकरी