शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
5
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
7
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
8
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
9
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
10
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
11
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
12
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
13
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
14
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
15
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
16
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
17
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
18
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
19
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
20
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

विदर्भातील ४० टक्क्यांवर उत्पादन घटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:16 IST

विदर्भातील जवळपास २० ते २५ लाख हेक्टरवरील पिकांना धोका निर्माण झाला असून, यावर्षी ४० टक्क्यांवर उत्पादनात घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

- राजरत्न सिरसाटअकोला : मान्सून विलंबाने आल्याने पेरणीस उशीर झाला; अल्प पावसात पेरण्या सुरू असतानाच पुन्हा चार आठवडे पावसाने दडी मारल्याने विदर्भातील जवळपास २० ते २५ लाख हेक्टरवरील पिकांना धोका निर्माण झाला असून, यावर्षी ४० टक्क्यांवर उत्पादनात घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.राज्यात आजमितीस ८० टक्क्यांवर पेरण्या आटोपल्या आहेत. विदर्भातील अमरावती विभागात ९३ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. तथापि, नागपूर विभागातील चित्र वेगळे आहे. या विभागातील सात लाख हेक्टरवर शेतकरी धान पीक घेतात; परंतु पाऊसच नसल्याने यातील ६० टक्के क्षेत्रावरील धान पिकाची रोवणी रखडली आहे. दोन्ही विभागात धानासोबतच सोयाबीन, कापूस पेरणीच क्षेत्र प्रत्येकी १५ लाख हेक्टर आहे. गळीत, तृण, कडधान्य मिळून विदर्भात खरीप हंगामातील ४९ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीलायक आहे; परंतु आजमितीस कोरडवाहू क्षेत्रावरील पीक शेवटच्या घटका मोजत आहे. त्यामुळे पाऊस आला तरी खुंटलेल्या पिकांपासून अपेक्षित उत्पादन मिळणे कठीण असल्याने हजारो शेतकऱ्यांना अर्ध रब्बी, रब्बी पिकांचे नियोजन करण्याची वेळ आली आहे. पुण्याच्या कृषी आयुक्तालयानेदेखील यासाठीचे आपत्कालीन पीक नियोजन केले आहे. ३१ जुलैपर्यंत पेरणी करायची असल्यास संकरित बाजरी, सूर्यफूल, सोयाबीन अधिक तूर, बाजरी अधिक तूर, एरंडी अधिक धने (मिश्र पीक ) यासारखी पिके कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार घेण्याचा सल्ला दिला आहे. १ ते १५ आॅगस्टपर्यंत एरंडी, तीळ, संकरित बाजरी, रागी, एरंडी अधिक धने मिश्र पिके घ्यावीत, १६ ते ३१ आॅगस्टपर्यंत अशीच पिके घ्यावीत तथापि कापूस, ज्वारी, भुईमूग ही पिके घेऊ नयेत, असेही सल्ला देताना म्हटले आहे. दरम्यान, असे सर्व असले तरी शेतकरी आताच गलितगात्र झाला असून, त्याच्याकडे पैसाच नसल्याने दुबार पेरणी करणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

 मूग, उडीद हातचा गेला!धान, मूग, उडिदाचे पीक हातचे गेल्यात जमा आहे. सोयाबीन तग धरू न होते; मात्र आता त्याचीही वाट लागली आहे. कापसाची वाढ खुंटली असून, ज्वारीचेही पीक करपले आहे.

- पाऊसच नसल्याने विदर्भातील २० ते २५ लाख हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे यावर्षी ४० टक्क्यांवर उत्पादन घटण्याची शक्यता आहे.डॉ. शरद निंबाळकर,माजी कुलगुरू ,डॉ. पंदेकृवि, अकोला.

 

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोलाFarmerशेतकरी