शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात अल्पभूधारकांचे प्रमाण वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 14:18 IST

अकोला: विदर्भातील अत्यल्प भूधारकांचे प्रमाण वाढले असून, आजमितीस हे सरासरी क्षेत्र १ हेक्टरच्या खाली आले आहे.

ठळक मुद्दे पूरक जोडधंदा तसेच कंत्राट शेती, शेतकरी गट, कंपन्या बळकट कराव्या लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विदर्भातील पूरक सिंचन व्यवस्था नाही, पावसाची अनिश्चितता वाढतच आहे. विदर्भातील शेतीचे प्रमाण सरासरी १.७३ हेक्टर नंतर १.५० हेक्टर आता ते १ हेक्टरपर्यंत खाली आले आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला: विदर्भातील अत्यल्प भूधारकांचे प्रमाण वाढले असून, आजमितीस हे सरासरी क्षेत्र १ हेक्टरच्या खाली आले आहे. याचा थेट प्रतिकूल परिणाम शेतकऱ्यांच्या सामाजिक, आर्थिक जीवनमानावर होत असून, शेतकºयांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी पूरक जोडधंदा तसेच कंत्राट शेती, शेतकरी गट, कंपन्या बळकट कराव्या लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र विभागात यासंदर्भात अभ्यास सुरू आहे. दरम्यान, राज्यातील स्थिती जवळपास अशीच आहे.विदर्भातील पूरक सिंचन व्यवस्था नाही, पावसाची अनिश्चितता वाढतच आहे. परिणामी उत्पादन व उत्पन्न घटले आहे. परिणामी मागील काही वर्षांपासून कृषी विकासाचा दर अत्यंत कमी आहे. परिणामी हजारो शेतकºयांनी शेती विकली. तसेच कुटुंबाची संख्या वाढल्याने शेतीचे तुकडे पडले आहेत. यामुळेच गत २५ वर्षांत विदर्भातील शेतीचे प्रमाण सरासरी १.७३ हेक्टर नंतर १.५० हेक्टर आता ते १ हेक्टरपर्यंत खाली आले आहे. तुकड्याची शेती करताना, उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च अधिक वाढला आहे. परिणामी शेतकºयांच्या आर्थिक, सामाजिक जीवनमानावर प्रतिकूल परिणाम झाले आहेत.सन १९८०-८१ मध्ये विदर्भातील अत्यल्प भूधारक शेतकºयांची संख्या ही ४,०५,७३४ (२२.५८ टक्के ) होती. या शेतकºयांकडे २,४३,०७१ हेक्टर (२४.९० टक्के) क्षेत्र होते. सन १९९०-९१ मध्ये शेतकºयांची संख्या वाढून ५,२३,७९२ (२४.९० टक्के) एवढी झाली. क्षेत्रही ३,१०,१६६ हेक्टर म्हणजेच ५.८३ टक्क्यावर आले. २०००-०१ मध्ये हीच शेतकºयांची संख्या ६,४१,८५० अर्थात २६.६१ टक्क्याने वाढली. या शेतकºयांकडे २,४३,०७१ हेक्टर म्हणजेच ५.८६ टक्के क्षेत्र होते. २०१६-१७ पर्यंत यात आणखी घट झाली असून, सरासरी प्रमाण १ हेक्टरपर्यंत आहे.

 

कृषी अर्थशास्त्र विभाग, शेतीच्या सर्वअनुषंगाने अभ्यास करीत असतो, विदर्भातील अल्पभूधारकांची संख्या बघून त्या अनुषंगाने नियोजन करण्यात येते, अल्पभूधारकतेचे वाढलेले प्रमाण बघता आता कंत्राटी शेती व गटशेती आदींवर भर द्यावा लागेल. यासाठी अल्पभूधारक शेतकºयांची आकडेवारी आम्ही सतत बघत असतो.डॉ. व्ही.एम. भाले,कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

-विदर्भातील पाच एकराच्या आतील अल्पभूधारक कोरडवाहू शेतकºयांचे प्रमाण आता ८५ टक्क्यांवर गेले आहे. कोरडवाहू क्षेत्रात एका कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी १५ ते २० एकर शेत हवी.- डॉ. शरद निंबाळकर,अध्यक्ष,देशव्यापी पंचवर्षीय कापूस आढावा समिती,भारत सरकार.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी