शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

विदर्भात अल्पभूधारकांचे प्रमाण वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 14:18 IST

अकोला: विदर्भातील अत्यल्प भूधारकांचे प्रमाण वाढले असून, आजमितीस हे सरासरी क्षेत्र १ हेक्टरच्या खाली आले आहे.

ठळक मुद्दे पूरक जोडधंदा तसेच कंत्राट शेती, शेतकरी गट, कंपन्या बळकट कराव्या लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विदर्भातील पूरक सिंचन व्यवस्था नाही, पावसाची अनिश्चितता वाढतच आहे. विदर्भातील शेतीचे प्रमाण सरासरी १.७३ हेक्टर नंतर १.५० हेक्टर आता ते १ हेक्टरपर्यंत खाली आले आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला: विदर्भातील अत्यल्प भूधारकांचे प्रमाण वाढले असून, आजमितीस हे सरासरी क्षेत्र १ हेक्टरच्या खाली आले आहे. याचा थेट प्रतिकूल परिणाम शेतकऱ्यांच्या सामाजिक, आर्थिक जीवनमानावर होत असून, शेतकºयांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी पूरक जोडधंदा तसेच कंत्राट शेती, शेतकरी गट, कंपन्या बळकट कराव्या लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र विभागात यासंदर्भात अभ्यास सुरू आहे. दरम्यान, राज्यातील स्थिती जवळपास अशीच आहे.विदर्भातील पूरक सिंचन व्यवस्था नाही, पावसाची अनिश्चितता वाढतच आहे. परिणामी उत्पादन व उत्पन्न घटले आहे. परिणामी मागील काही वर्षांपासून कृषी विकासाचा दर अत्यंत कमी आहे. परिणामी हजारो शेतकºयांनी शेती विकली. तसेच कुटुंबाची संख्या वाढल्याने शेतीचे तुकडे पडले आहेत. यामुळेच गत २५ वर्षांत विदर्भातील शेतीचे प्रमाण सरासरी १.७३ हेक्टर नंतर १.५० हेक्टर आता ते १ हेक्टरपर्यंत खाली आले आहे. तुकड्याची शेती करताना, उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च अधिक वाढला आहे. परिणामी शेतकºयांच्या आर्थिक, सामाजिक जीवनमानावर प्रतिकूल परिणाम झाले आहेत.सन १९८०-८१ मध्ये विदर्भातील अत्यल्प भूधारक शेतकºयांची संख्या ही ४,०५,७३४ (२२.५८ टक्के ) होती. या शेतकºयांकडे २,४३,०७१ हेक्टर (२४.९० टक्के) क्षेत्र होते. सन १९९०-९१ मध्ये शेतकºयांची संख्या वाढून ५,२३,७९२ (२४.९० टक्के) एवढी झाली. क्षेत्रही ३,१०,१६६ हेक्टर म्हणजेच ५.८३ टक्क्यावर आले. २०००-०१ मध्ये हीच शेतकºयांची संख्या ६,४१,८५० अर्थात २६.६१ टक्क्याने वाढली. या शेतकºयांकडे २,४३,०७१ हेक्टर म्हणजेच ५.८६ टक्के क्षेत्र होते. २०१६-१७ पर्यंत यात आणखी घट झाली असून, सरासरी प्रमाण १ हेक्टरपर्यंत आहे.

 

कृषी अर्थशास्त्र विभाग, शेतीच्या सर्वअनुषंगाने अभ्यास करीत असतो, विदर्भातील अल्पभूधारकांची संख्या बघून त्या अनुषंगाने नियोजन करण्यात येते, अल्पभूधारकतेचे वाढलेले प्रमाण बघता आता कंत्राटी शेती व गटशेती आदींवर भर द्यावा लागेल. यासाठी अल्पभूधारक शेतकºयांची आकडेवारी आम्ही सतत बघत असतो.डॉ. व्ही.एम. भाले,कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

-विदर्भातील पाच एकराच्या आतील अल्पभूधारक कोरडवाहू शेतकºयांचे प्रमाण आता ८५ टक्क्यांवर गेले आहे. कोरडवाहू क्षेत्रात एका कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी १५ ते २० एकर शेत हवी.- डॉ. शरद निंबाळकर,अध्यक्ष,देशव्यापी पंचवर्षीय कापूस आढावा समिती,भारत सरकार.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी