शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

विदर्भात अल्पभूधारकांचे प्रमाण वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 14:18 IST

अकोला: विदर्भातील अत्यल्प भूधारकांचे प्रमाण वाढले असून, आजमितीस हे सरासरी क्षेत्र १ हेक्टरच्या खाली आले आहे.

ठळक मुद्दे पूरक जोडधंदा तसेच कंत्राट शेती, शेतकरी गट, कंपन्या बळकट कराव्या लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विदर्भातील पूरक सिंचन व्यवस्था नाही, पावसाची अनिश्चितता वाढतच आहे. विदर्भातील शेतीचे प्रमाण सरासरी १.७३ हेक्टर नंतर १.५० हेक्टर आता ते १ हेक्टरपर्यंत खाली आले आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला: विदर्भातील अत्यल्प भूधारकांचे प्रमाण वाढले असून, आजमितीस हे सरासरी क्षेत्र १ हेक्टरच्या खाली आले आहे. याचा थेट प्रतिकूल परिणाम शेतकऱ्यांच्या सामाजिक, आर्थिक जीवनमानावर होत असून, शेतकºयांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी पूरक जोडधंदा तसेच कंत्राट शेती, शेतकरी गट, कंपन्या बळकट कराव्या लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र विभागात यासंदर्भात अभ्यास सुरू आहे. दरम्यान, राज्यातील स्थिती जवळपास अशीच आहे.विदर्भातील पूरक सिंचन व्यवस्था नाही, पावसाची अनिश्चितता वाढतच आहे. परिणामी उत्पादन व उत्पन्न घटले आहे. परिणामी मागील काही वर्षांपासून कृषी विकासाचा दर अत्यंत कमी आहे. परिणामी हजारो शेतकºयांनी शेती विकली. तसेच कुटुंबाची संख्या वाढल्याने शेतीचे तुकडे पडले आहेत. यामुळेच गत २५ वर्षांत विदर्भातील शेतीचे प्रमाण सरासरी १.७३ हेक्टर नंतर १.५० हेक्टर आता ते १ हेक्टरपर्यंत खाली आले आहे. तुकड्याची शेती करताना, उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च अधिक वाढला आहे. परिणामी शेतकºयांच्या आर्थिक, सामाजिक जीवनमानावर प्रतिकूल परिणाम झाले आहेत.सन १९८०-८१ मध्ये विदर्भातील अत्यल्प भूधारक शेतकºयांची संख्या ही ४,०५,७३४ (२२.५८ टक्के ) होती. या शेतकºयांकडे २,४३,०७१ हेक्टर (२४.९० टक्के) क्षेत्र होते. सन १९९०-९१ मध्ये शेतकºयांची संख्या वाढून ५,२३,७९२ (२४.९० टक्के) एवढी झाली. क्षेत्रही ३,१०,१६६ हेक्टर म्हणजेच ५.८३ टक्क्यावर आले. २०००-०१ मध्ये हीच शेतकºयांची संख्या ६,४१,८५० अर्थात २६.६१ टक्क्याने वाढली. या शेतकºयांकडे २,४३,०७१ हेक्टर म्हणजेच ५.८६ टक्के क्षेत्र होते. २०१६-१७ पर्यंत यात आणखी घट झाली असून, सरासरी प्रमाण १ हेक्टरपर्यंत आहे.

 

कृषी अर्थशास्त्र विभाग, शेतीच्या सर्वअनुषंगाने अभ्यास करीत असतो, विदर्भातील अल्पभूधारकांची संख्या बघून त्या अनुषंगाने नियोजन करण्यात येते, अल्पभूधारकतेचे वाढलेले प्रमाण बघता आता कंत्राटी शेती व गटशेती आदींवर भर द्यावा लागेल. यासाठी अल्पभूधारक शेतकºयांची आकडेवारी आम्ही सतत बघत असतो.डॉ. व्ही.एम. भाले,कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

-विदर्भातील पाच एकराच्या आतील अल्पभूधारक कोरडवाहू शेतकºयांचे प्रमाण आता ८५ टक्क्यांवर गेले आहे. कोरडवाहू क्षेत्रात एका कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी १५ ते २० एकर शेत हवी.- डॉ. शरद निंबाळकर,अध्यक्ष,देशव्यापी पंचवर्षीय कापूस आढावा समिती,भारत सरकार.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी