शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अकोल्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा विजय; मुख्यमंत्र्यांनी केल्या सर्व मागण्या मान्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 03:59 IST

शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाद्वारे येथील पोलीस मुख्यालयात माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाचा अखेर बुधवारी विजय झाला.

ठळक मुद्देयशवंत सिन्हा यांची माहिती :आंदोलन घेतले मागेअंमलबजावणीत कसूर केली तर पुन्हा आंदोलन करू, असा इशाराही सिन्हा यांनी दिला.

अकोला : शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाद्वारे येथील पोलीस मुख्यालयात माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाचा अखेर बुधवारी विजय झाला. मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यामुळे आम्ही हे आंदोलन आता मागे घेत असल्याचे यशवंत सिन्हा यांनी सायंकाळी बातमीदारांशी बोलताना जाहीर केले.येथील पोलीस मुख्यालयात गत तीन दिवसांपासून शेतकरी यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात आंदोलन करीत आहेत. या तीन दिवसांदरम्यान विविध पक्षांचा आंदोलनास पाठिंबा मिळाला. या दबावापुढे झुकत सरकारने शेतक-यांच्या सर्व मागण्या केल्या. आता कोणत्याही शेतक-यांनी आत्महत्या करू नये. हा शेतक-यांच्या धैर्याचा विजय आहे. शेतक-यांचा विजय आहे. आम्ही केलेल्या मागण्या सर्व राज्यातील शेतक-यांच्या हिताच्या असल्यामुळे सर्वांचाच फायदा होईल, असे सिन्हा म्हणाले. आंदोलन मागे घेत असल्यामुळे सर्व शेतक-यांनी आता घरी जावे, असे सिन्हा यांनी जाहीर केले. मागण्या मान्य केल्या असल्या, तरी सरकारने अंमलबजावणीत कसूर केली तर पुन्हा आंदोलन करू, असा इशाराही सिन्हा यांनी दिला.

नाफेडच्या जाचक अटी रद्द करण्यासह सर्व मागण्या मान्य 

माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रवीकांत तुपकर, शेतकरी जागर मंचच्या कार्यकर्त्यांसोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी केलेल्या चर्चेदरम्यान कपाशीवरील बोंडअळीचे सर्वेक्षण, पंचनामे करून तातडीने शेतकºयांना आर्थिक मदत देऊ, मूग, उडीद, सोयाबीन शेतमाल विक्रीबाबतच्या जाचक अटी, एकराच्या मर्यादेची अट रद्द करून, शेतकºयांचा संपूर्ण शेतमाल नाफेड खरेदी करेल, भावांतराची मागणी शासनाने मान्य करून नियमाप्रमाणे शेतमालास हमी भाव देण्यात येईल, जिल्ह्यातील ६२ हजार ७४९ या ग्रीन लिस्टपैकी ५५ हजार ४१४ लाभार्थ्यांच्या खात्यात दोनशे एकोणचाळीस कोटी, सव्वीस लाख रुपये रक्कम कर्जमाफी म्हणून जमा केली असून, उर्वरित शेतकºयांच्या कर्जमाफीची प्रक्रिया तातडीने राबविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी स्पष्ट करीत,  कृषी पंपाची वीज जोडणी न तोडण्याबाबत आदेश देण्यात येतील, तसेच सोने तारण कर्जमाफी झालेल्या जिल्ह्यातील ३७ हजार ४९ शेतकरी बाद झाले आहेत. त्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणविस यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाAkola cityअकोला शहरFarmerशेतकरी