शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

वऱ्हाडातील जलसाठा पोहोचला ५८ टक्क्यांवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 13:04 IST

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यातील धरणातील साठा आजमितीस ५०.०२ टक्केपर्यंत पोहोचला; पण बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा हे मोठे धरण कोरडेच असून, इतरही धरणात अल्प जलसाठा असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अकोला जिल्ह्याची जीवनरेखा काटेपूर्णा धरणाचा जलसाठा मात्र ८० टक्क्यांवर पोहोचल्याने अकोलेकरांसह शेतकºयांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, ...

ठळक मुद्देअकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत.या सर्व धरणात २४ आॅगस्ट रोजी ५८.०२ टक्के जलसाठा सध्या उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणांमधील जलसाठा शून्य टक्केच आहे.

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यातील धरणातील साठा आजमितीस ५०.०२ टक्केपर्यंत पोहोचला; पण बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा हे मोठे धरण कोरडेच असून, इतरही धरणात अल्प जलसाठा असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अकोला जिल्ह्याची जीवनरेखा काटेपूर्णा धरणाचा जलसाठा मात्र ८० टक्क्यांवर पोहोचल्याने अकोलेकरांसह शेतकºयांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणात २४ आॅगस्ट रोजी ५८.०२ टक्के जलसाठा सध्या उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणांमधील जलसाठा शून्य टक्केच आहे. अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ८० टक्के जलसाठा संकलित झाला आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ९५.५३ टक्के जलसाठा संकलित झाला असून, उमा १००, मोर्णा धरणात ४५.३७ टक्के, तर वान धरणात आतापर्यंत ८७.०४ टक्के जलसाठा संकलित झाल्याने या धरणाचे दोन वक्रव्दारातून शुक्रवारी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणात अद्याप एक थेंबही वाढ झाली नसल्याने या धरणाची पातळी शून्य टक्के आहे. याच जिल्ह्यातील कोराडी मध्यम धरणातील जलसाठा ६.२८ टक्के आहे. तोरणा १४.०७, तर उतावळी धरणातील पातळी ३०.२२ टक्के झाली आहे. याच जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १६.८६ टक्के, पेनटाकळी धरणात १३.८२ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १९.३६ टक्के, पलढगमध्ये २३.८३ टक्के, मन धरणात २२.०५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ८७.३३ टक्के, एकबुर्जी व सोनल धरणात १०० टक्के जलसाठा आहे.अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा धरणात ४६.८८ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये १००, अरुणावती ९८.९७, तर बेंबळा धरणात ५९.७६ टक्केच जलसाठा आहे.- पश्चिम वºहाडातील अकोला जिल्ह्यातील धरणात यावर्षी बºयापैकी जलसाठा संचयित झाला असून, यावर्षी शेतकºयांना रब्बी व उन्हाळी पिकांना सिंचनासाठी पाणी देण्यात येईल. त्यासाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण ठरल्यानंतर निर्णय घेण्यात येईल.अंकुर देसाई,अधीक्षक अभियंता,पाटबंधारे मंडळ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण