शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडातील जलसाठा पोहोचला ५८ टक्क्यांवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 13:04 IST

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यातील धरणातील साठा आजमितीस ५०.०२ टक्केपर्यंत पोहोचला; पण बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा हे मोठे धरण कोरडेच असून, इतरही धरणात अल्प जलसाठा असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अकोला जिल्ह्याची जीवनरेखा काटेपूर्णा धरणाचा जलसाठा मात्र ८० टक्क्यांवर पोहोचल्याने अकोलेकरांसह शेतकºयांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, ...

ठळक मुद्देअकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत.या सर्व धरणात २४ आॅगस्ट रोजी ५८.०२ टक्के जलसाठा सध्या उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणांमधील जलसाठा शून्य टक्केच आहे.

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यातील धरणातील साठा आजमितीस ५०.०२ टक्केपर्यंत पोहोचला; पण बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा हे मोठे धरण कोरडेच असून, इतरही धरणात अल्प जलसाठा असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अकोला जिल्ह्याची जीवनरेखा काटेपूर्णा धरणाचा जलसाठा मात्र ८० टक्क्यांवर पोहोचल्याने अकोलेकरांसह शेतकºयांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणात २४ आॅगस्ट रोजी ५८.०२ टक्के जलसाठा सध्या उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणांमधील जलसाठा शून्य टक्केच आहे. अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ८० टक्के जलसाठा संकलित झाला आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ९५.५३ टक्के जलसाठा संकलित झाला असून, उमा १००, मोर्णा धरणात ४५.३७ टक्के, तर वान धरणात आतापर्यंत ८७.०४ टक्के जलसाठा संकलित झाल्याने या धरणाचे दोन वक्रव्दारातून शुक्रवारी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणात अद्याप एक थेंबही वाढ झाली नसल्याने या धरणाची पातळी शून्य टक्के आहे. याच जिल्ह्यातील कोराडी मध्यम धरणातील जलसाठा ६.२८ टक्के आहे. तोरणा १४.०७, तर उतावळी धरणातील पातळी ३०.२२ टक्के झाली आहे. याच जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १६.८६ टक्के, पेनटाकळी धरणात १३.८२ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १९.३६ टक्के, पलढगमध्ये २३.८३ टक्के, मन धरणात २२.०५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ८७.३३ टक्के, एकबुर्जी व सोनल धरणात १०० टक्के जलसाठा आहे.अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा धरणात ४६.८८ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये १००, अरुणावती ९८.९७, तर बेंबळा धरणात ५९.७६ टक्केच जलसाठा आहे.- पश्चिम वºहाडातील अकोला जिल्ह्यातील धरणात यावर्षी बºयापैकी जलसाठा संचयित झाला असून, यावर्षी शेतकºयांना रब्बी व उन्हाळी पिकांना सिंचनासाठी पाणी देण्यात येईल. त्यासाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण ठरल्यानंतर निर्णय घेण्यात येईल.अंकुर देसाई,अधीक्षक अभियंता,पाटबंधारे मंडळ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण