शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

जिल्हा परिषदेतील सत्ता कायम राखण्याचे ‘वंचित’समोर आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 12:31 IST

येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेतील सत्ता कायम राखण्याचे आव्हान वंचित बहुजन आघाडीसमोर राहणार आहे.

- संतोष येलकरअकोला: अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्य मिळवित भाजपाने विजय प्राप्त केल्यानंतर अकोला जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील पंचायत समित्या ताब्यात घेण्याचे ‘टार्गेट’ भाजपाने समोर ठेवले आहे. त्यानुषंगाने येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेतील सत्ता कायम राखण्याचे आव्हान वंचित बहुजन आघाडीसमोर राहणार आहे.गेल्या २५ वर्षांपासून अकोला जिल्हा परिषदेत भारिप बहुजन महासंघाची सत्ता आहे, तसेच सध्या जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, पातूर व बाळापूर या चार पंचायत समित्यांमध्येही भारिप-बमसंची सत्ता आहे. अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी जाहीर झाला. लोकसभा निवडणुकीत ५ लाख ५४ हजार ४४४ मते प्राप्त करून भाजपाचे अ‍ॅड. संजय धोत्रे विजयी झाले, तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी २ लाख ७८ हजार ८४८ मते प्राप्त करीत ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्य घेत विजय मिळविल्यानंतर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपाने आता अकोला जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील पंचायत समित्या ताब्यात घेण्याचे ‘टार्गेट’ समोर ठेवले आहे. या पृष्ठभूमीवर येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांमधील सत्ता कायम राखण्याचे आव्हान वंचित बहुजन आघाडीसमोर राहणार असल्याचे वास्तव आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय प्राप्त करण्यासाठी भाजपाने जसे नियोजन केले होते, तसेच नियोजन जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत राहणार आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर लोकसभा जिंकली. आता जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांवरही भाजपाचा झेंडा फडकणार आहे. जिल्हा परिषदेच्या ३५ पेक्षा अधिक जागा जिंकून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याचे आमचे ‘टार्गेट’ आहे.-तेजराव थोरात,जिल्हाध्यक्ष भाजपा.गेल्या २५ वर्षांपासून जिल्हा परिषदेत भारिप-बमसंची सत्ता आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचला असून, विकास कामे करण्यात आली. जिल्ह्यातील वंचित घटकांना सत्तेत बसविले. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता कायम राहणार आहे. जिल्हा परिषदेच्या ४० जागा प्राप्त करण्याचे आमचे लक्ष्य आहे.-प्रदीप वानखडे,जिल्हाध्यक्ष, भारिप-बमसं.

 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदPoliticsराजकारण