शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

तब्बल चार वर्षांनी वैष्णवीला मिळाले नवीन आयुष्य

By admin | Updated: November 5, 2015 01:50 IST

वैद्यकीय अधिका-यांच्या प्रयत्नांना अखेर यश.

प्रवीण खेते /अकोला : चार वर्षांपूर्वी शालेय आरोग्य तपासणीदरम्यान जुने शहरातील महानगरपालिका शाळा क्रमांक १५ मधील वैष्णवीच्या हृदयात छिद्र आढळले होते. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने आई-वडीलदेखील हतबल झाले होते. परंतु, तब्बल चार वर्षांनी पुन्हा तपासणीसाठी आलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. अताउर रहेमान यांनी तिच्या शस्त्रक्रियेचा विडा उचलत जुलै २0१५ मध्ये मुंबई येथे यशस्वी शस्त्रक्रिया घडवून आणली आणि तिच्या आयुष्याची ज्योत पुन्हा उजाळली. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत बालकांचे स्वास्थ्य तपासणीसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. या कार्यक्रमांतर्गत महानगरपालिका कार्यक्षेत्रात शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रम राबविण्यात येतो. या अंतर्गत जिल्हा सर्वोपचार रुग्णालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत वैद्यकीय अधिकारी डॉ. अताउर रहेमान हे चार वर्षांपूर्वी म्हणजेच शैक्षणिक सत्र २0१0-११ मध्ये जुने शहरातील शिवनगरस्थित मनपा शाळा क्रमांक १५ मध्ये आरोग्य तपासणीसाठी पोहोचले. तपासणीदरम्यान इयत्ता पहिलीची वैष्णवी संजय वैद्य हिच्या हृदयात छिद्र असल्याचे आढळले. या संदर्भात डॉ. रहेमान यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका यांना कळविले. त्यांनी वैष्णवीच्या पालकांना शाळेत बोलावून वैष्णवीच्या आरोग्याबाबत सविस्तर सांगितले. मात्र, हे सत्य स्वीकारायला वैष्णवीचे आई-वडील तयारच नव्हते. वैष्णवीच्या पालकांना तिच्या प्रकृतीबाबत कसेबसे समजावून सांगितले. परंतु, मोलमजुरी करून पोट भरणारे वैद्य दाम्पत्य शस्त्रक्रियेसाठी पैसा आणणार तरी कुठून? असा प्रश्न त्यांना भेडसावू लागला. त्यांची परिस्थिती पाहता, डॉ. रहेमान यांनी वैद्य दाम्पत्याला धीर देत शासकीय मोहिमेंतर्गत शस्त्रक्रियेसाठी आवश्यक दस्तऐवज गोळा करायला सुरुवात केली. वैद्य कुटुंबाचे रेशन कार्डदेखील जीर्णावस्थेत पडलेले होते. त्यांच्या रेशन कार्डचे नूतनीकरण करून डॉ. रहेमान यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मुंबई येथील सुराणा रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी सोय केली. जुलै २0१५ मध्ये वैष्णवीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि तिच्या आयुष्याची ज्योत पुन्हा उजाळली. पहिल्यांदाच बघितले रेल्वे स्टेशन पोटाची खळगी भरण्यासाठी वैद्य दाम्पत्याचा संपूर्ण दिवस मोलमजुरीत जात असल्याने त्यांच्यासाठी इतर गोष्ठी गौणच. अद्यापही रेल्वेचा प्रवास त्यांनी केला नाही. मात्र, वैष्णवीच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईला जाण्यासाठी तिचे पालक शाळेच्या शिक्षिकांसोबत रेल्वे स्टेशनवर गेले. तेव्हा वैष्णवीच्या आईने पहिल्यांदाच रेल्वे स्टेशन बघितल्याचे समजले. हे ऐकून शिक्षिकांच्याही डोळ्य़ात पाणी आले.