शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
2
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
3
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
4
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
5
अमेरिका-चीन ट्रेडवॉरचा फायदा; जागतिक स्मार्टफोन-लॅपटॉप कंपन्या भारतात येण्यास तयार
6
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
8
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
9
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
10
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
11
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
12
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
13
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
14
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
15
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
16
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
17
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
18
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
19
१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?
20
डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले

पिकांवर आता ‘नॅनो टेक्नालॉजी’चा वापर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 18:52 IST

या तंत्रज्ञानाचा वापर करू न संत्रा फळावरील डिंक्या रोगावर प्रभावी व्यवस्थापन होऊ शकते असे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

अकोला : कृषी क्षेत्रात आता ‘नॅनो टेक्नालॉजी’चा वापर वाढविण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले असून, जैव किटकनाशकांचा प्रभाव कायम राहण्यासाठीचे संशोधन डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सुरू करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करू न संत्रा फळावरील डिंक्या रोगावर प्रभावी व्यवस्थापन होऊ शकते असे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.आता जैवतंत्रज्ञानाचा वापर करू नच कृषी क्षेत्रात प्रगती साधण्यासाठीचे पाऊल कृषी संस्था,विद्यापीठांनी उचलेले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात यासाठी स्वतंत्र संशोधन सुरू करण्यात आले आहे. येथे शेवगा वृक्षाच्या पानापासून ‘झींक नॅनो पार्टीकल’ संशोधन करण्यात आले असून, हे पार्टीकल वापरू न जैव किटनाशकांचा अतिनिल किरणांमुळे कमी होणारा प्रभाव रोखण्याचे यशस्वीरित्या काम करते.त्यामुळे एखाद्या पिकांवर जर किड,रोगांवर जैव किटकनाश फवारले असेल तर प्रभाव जास्त काळ टिकून राहतो.परिणामी किड,रोगांचे यशस्वी व्यवस्थापन होऊन उत्पादनात वाढ होते.आजमितीस पिकांवर फवारलेल्या किटकनाशकांचा प्रभाव जास्त काळ राहत नाही.नॅनो पार्टीकल चा वापर केल्यास जैव किटकनाशकांचा प्रभाव दिर्घकाळ टिकून राहतो. तसेच अतिरिक्त दुष्परिणाम थांबविता येतो. शेवगा वृक्षाच्या पानापासून बनविलेल्या या तंत्रज्ञानाचा वापर सर्वच पिकांसाठी करता येईन हे विशेष.विदर्भात संत्र्याचे क्षेत्र एक लाख २५ हजार हेक्टरवर आहे.यावर डिंक्यासारखा रोग होत असल्याने संत्रा उत्पादक शेतकरी त्रस्त आहेत. उपाययोजना करताना शेतकऱ्यांचा खर्च खूप वाढतो.म्हणूनच हा डिंक्या रोखण्यासाठी ‘कॉपर नॅनो पार्टीकल’ वापर करण्यात आले आहे. यावर संध्या संशोधन सुरू आहे. त्यातून चांगले निकाल,निष्कर्ष निघाले आहेत. पंरतु हे संशोधन अद्याप पूर्ण व्हायचे आहे.एकूणच येणारी शेती आता ‘नॅनो टेक्नालॉजी’वर आधारित असेल असा शास्त्रज्ञाचा दावा आहे.

नॅनो टेक्नालॉजी चा वापर करू न पिकावरील जैवकिटकनाशकांचा प्रभाव अधिक टिकून राहाते परिणामी किडीचे व्यवस्थापन होवून उत्पादन वाढीस मदत होते.संत्र्यावरील डिंक्या रोगाचेदेखील यशस्वी व्यवस्थापन होईल.परंतु सद्या यावर संशोधन सुरू आहे.- डॉ.एम.पी.मोहरील,जैवतंत्रज्ञान,शास्त्रज्ञ,डॉ.पंदेकृवि,अकोला. 

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ