शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

विदर्भात बनावट कीटकनाशकांचा वापर वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 14:43 IST

अकोला : कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतर पिके जळाल्याच्या घटना विदर्भात समोर येत असून, अकोला जिल्ह्यात कपाशीचे पीक जळाल्याने बोगस कीटकनाशकांचा वापर होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.

ठळक मुद्देशासनाने ठरवून दिलेल्या यादींच्या व्यतिरिक्त कीटकनाशकांची विक्री होत असल्याने हे प्रकार घडत असल्याचे वृत्त आहे.कीटकनाशकांची फवारणी करताना जीवितहानी होऊ नये, यासाठीची जनजागृती करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले होते.

अकोला : कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतर पिके जळाल्याच्या घटना विदर्भात समोर येत असून, अकोला जिल्ह्यात कपाशीचे पीक जळाल्याने बोगस कीटकनाशकांचा वापर होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. दरम्यान, शासनाने ठरवून दिलेल्या यादींच्या व्यतिरिक्त कीटकनाशकांची विक्री होत असल्याने हे प्रकार घडत असल्याचे वृत्त आहे.मागील वर्षी खरीप हंगामात कीटकनाशकांची हाताळणी करताना शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाल्याच्या घटना विदर्भात घडल्याने शासनाने याची गंभीर दखल घेत कीटकनाशकांची फवारणी करताना जीवितहानी होऊ नये, यासाठीची जनजागृती करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले होते. कृषी विभागाने याबाबत जनजागृती मोहीम राबविली. यावर्षी मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. पावसाची अनिश्चितता, वातावरणातील बदलामुळे यावर्षीही कपाशीवर बोंडअळी, रसशोषण करणाºया किडीने आक्रमण केले. सोयाबीनवर स्पोडोप्टेरा, चक्रीभूंगा आदी किडींनी हल्ला केला. या किडीचे व्यवस्थापन करण्यासाठी शेकडो शेतकरी कृषी केंद्रांमधून विविध प्रकारची कीटकनाशके खरेदी करीत आहेत.शासनाने यावर्षी जिल्हानिहाय नोंदणीकृत व शिफारस केलेल्या कीटकनाशकांच्या विक्रीवर नियंत्रण आणण्याचे धोरण जाहीर केले. या धोरणानुसारच कीटकनाशकांची यादी राज्याच्या कृषी आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठविली. असे असताना यादीबाहेरील कीटकनाशके येतात कशी, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.- गावातीलच साडेतीन एकर शेत ठोक्याने केले. कपाशीची लागवड करून भरघोस उत्पन्न घेण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने पीकही जोमदार आले; परंतु कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतर साडेतीन एकरातील कपाशी करपली.रूपेश लासुरकार,शेतकरी,अकोली रू पराव, जिल्हा अकोला.- कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द!दरम्यान, चुकीची औषधे आदींसंदर्भात विभागीयगुण नियंत्रणविभागाने चौकशी करू न कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्याचा सपाटा लावला आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील १४ केंद्रांचा समावेश असून, वाशिम जिल्ह्यातील पाच केंद्र यामध्ये आहेत. अकोला जिल्ह्यातील ५६ कृषी सेवा केंद्रे या यादीत असून, एका केंद्राचा परवाना रद्द करण्यात आला आहे.- कापूस जळाल्याने शेतकºयांनी तातडीने पंचायत समिती कृषी अधिकाºयांकडे तक्रारी कराव्यात, जिल्ह्यातील आपातापा येथील पिकाचे तणनाशक फवारल्यानंतर नुकसान झाले. या शेताची तज्ज्ञांकरवी पाहणी केली आहे. लवकरच अहवाल येईल.नरेंद्र शास्त्री,कृषी अधिकारी, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती