शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

विदर्भात बनावट कीटकनाशकांचा वापर वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 14:43 IST

अकोला : कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतर पिके जळाल्याच्या घटना विदर्भात समोर येत असून, अकोला जिल्ह्यात कपाशीचे पीक जळाल्याने बोगस कीटकनाशकांचा वापर होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.

ठळक मुद्देशासनाने ठरवून दिलेल्या यादींच्या व्यतिरिक्त कीटकनाशकांची विक्री होत असल्याने हे प्रकार घडत असल्याचे वृत्त आहे.कीटकनाशकांची फवारणी करताना जीवितहानी होऊ नये, यासाठीची जनजागृती करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले होते.

अकोला : कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतर पिके जळाल्याच्या घटना विदर्भात समोर येत असून, अकोला जिल्ह्यात कपाशीचे पीक जळाल्याने बोगस कीटकनाशकांचा वापर होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. दरम्यान, शासनाने ठरवून दिलेल्या यादींच्या व्यतिरिक्त कीटकनाशकांची विक्री होत असल्याने हे प्रकार घडत असल्याचे वृत्त आहे.मागील वर्षी खरीप हंगामात कीटकनाशकांची हाताळणी करताना शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाल्याच्या घटना विदर्भात घडल्याने शासनाने याची गंभीर दखल घेत कीटकनाशकांची फवारणी करताना जीवितहानी होऊ नये, यासाठीची जनजागृती करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले होते. कृषी विभागाने याबाबत जनजागृती मोहीम राबविली. यावर्षी मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. पावसाची अनिश्चितता, वातावरणातील बदलामुळे यावर्षीही कपाशीवर बोंडअळी, रसशोषण करणाºया किडीने आक्रमण केले. सोयाबीनवर स्पोडोप्टेरा, चक्रीभूंगा आदी किडींनी हल्ला केला. या किडीचे व्यवस्थापन करण्यासाठी शेकडो शेतकरी कृषी केंद्रांमधून विविध प्रकारची कीटकनाशके खरेदी करीत आहेत.शासनाने यावर्षी जिल्हानिहाय नोंदणीकृत व शिफारस केलेल्या कीटकनाशकांच्या विक्रीवर नियंत्रण आणण्याचे धोरण जाहीर केले. या धोरणानुसारच कीटकनाशकांची यादी राज्याच्या कृषी आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठविली. असे असताना यादीबाहेरील कीटकनाशके येतात कशी, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.- गावातीलच साडेतीन एकर शेत ठोक्याने केले. कपाशीची लागवड करून भरघोस उत्पन्न घेण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने पीकही जोमदार आले; परंतु कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतर साडेतीन एकरातील कपाशी करपली.रूपेश लासुरकार,शेतकरी,अकोली रू पराव, जिल्हा अकोला.- कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द!दरम्यान, चुकीची औषधे आदींसंदर्भात विभागीयगुण नियंत्रणविभागाने चौकशी करू न कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्याचा सपाटा लावला आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील १४ केंद्रांचा समावेश असून, वाशिम जिल्ह्यातील पाच केंद्र यामध्ये आहेत. अकोला जिल्ह्यातील ५६ कृषी सेवा केंद्रे या यादीत असून, एका केंद्राचा परवाना रद्द करण्यात आला आहे.- कापूस जळाल्याने शेतकºयांनी तातडीने पंचायत समिती कृषी अधिकाºयांकडे तक्रारी कराव्यात, जिल्ह्यातील आपातापा येथील पिकाचे तणनाशक फवारल्यानंतर नुकसान झाले. या शेताची तज्ज्ञांकरवी पाहणी केली आहे. लवकरच अहवाल येईल.नरेंद्र शास्त्री,कृषी अधिकारी, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती