शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोळशाच्या राखेचा वापर आता शेतात!

By admin | Updated: December 10, 2014 00:08 IST

राज्यातील औष्णिक केंद्राची राख उपलब्ध; शेतक-यांना प्रशिक्षण.

रजरत्न सिरसाट/अकोला राखेचा वापर केल्याने शेतमाल उत्पादनात २५ टक्के वाढ झाल्याचे एका संशोधनाअंती निष्पन्न झाल्याने मुख्यत्वे कोरडवाहू शेतात या राखेचा वापर करण्यात येणार आहे. ही राख मिळविण्यासाठी राज्यातील सात औष्णिक वीज निर्मिती केंद्रांसोबत नव्याने करार करण्यात येत असून, शेतात राख वापरण्याबाबत दिल्ली येथील ह्यफ्लाय अँश रिसर्च अँन्ड मॅनेजमेंटह्णच्यावतीने शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.देशातील औष्णिक वीज निर्मिती केंद्रांतून दरवर्षी २३00 लाख टन राखेची निर्मिती होते. त्यापैकी प्रत्यक्षात १३00 लाख टन राखेचाच वापर विटा, सिमेंट, टाईल्ससह विविध बाबींसाठी केला जातो; या राखेचा शेतात वापर करण्यासाठीचे संशोधन दिल्ली येथील सेंटर फॉर फ्लॉय अँश रिसर्च अँन्ड मॅनेजमेंटच्या संशोधकांनी केले असून, या राखेत शेतीची सकसता वाढविण्यासाठी उपयोगी पडणारे कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, अन्नद्रव्ये, सूक्ष्मअन्नद्रव्य, जिप्सम आदी अनेक घटक आढळून आले आहेत. याशिवाय तीन प्रकारची खनिजेही या राखेतून मिळतात. त्यामुळे या राखेचा वापर शेतात करण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता या राखेचा वापर शेतात करता यावा, यासाठी दिल्लीच्या या संशोधन संस्थेकडून देशासह महाराष्ट्रातील खापरखेडा, कोराडी, चंद्रपूर, भुसावळ दीपनगर, पारस, परळी, नाशिक एकलारा या औष्णिक वीज निर्मिती केंद्रांसोबत शेतीला राख उपलब्ध करू न देण्यासंबंधी नव्याने करार करण्यात येणार आहे. या राखेच्या वापरामुळे सोयाबीनचे उत्पादनात २५ टक्के वाढ होत असल्याचे निदर्शनात आले असून, कापूस, फळ व भाजीपाला व इतर खरीप व रब्बी पिकांच्या उत्पादनात १0 ते १५ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यासाठी संशोधन संस्थेच्यावतीने शेतकर्‍यांना या औष्णिक वीज निर्मिती केंद्रावर नेऊन प्रशिक्षण दिले जात आहे. या राखेमध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असल्याने कोरडवाहू प्रक्षेत्रावर ही राख वापरण्यासाठीची शिफारस या संशोधन केंद्राने केली आहे. ही राख शेतात वापरल्यामुळे कोणतेही प्रदूषण होत नसून, शेत मऊ ठेवण्यास ती उपयोगी पडते. त्यामुळे औष्णिक केंद्रांचा राख साठवणुकीचा प्रश्नही निकाली निघणार आहे. औष्णिक वीज केंद्रातील राख शेतात वापरल्याने उत्पादनात वाढ झाली असून, ही राख कोरडवाहू क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त आहे. उत्पादन वाढल्याने शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यास मदत होऊ शकते. परंतु राख वाहून नेण्यासाठी शासनाने शेतकर्‍यांना मदत करण्याची गरज असल्याचे सेंटर फॉर फ्लाय अँश रिसर्च अँन्ड मॅनेजमेंट, नवी दिल्लीचे डॉ. विमल कुमार यांनी स्पष्ट केले. *अल्पभूधारक शेतकर्‍यांना मदतीची गरज राज्यात अल्पभूधारक शेतकर्‍यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या शेतकर्‍यांना औष्णिक वीज केंद्रातील राख वाहून नेण्याचा खर्च परवडत नसल्याने शासनाने ही राख वाहून नेण्यासाठी शेतकर्‍यांना अनुदान देण्याची गरज आहे.