शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

पर्यावरण रक्षणासाठी कृत्रिम वाळूचा वापर बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 17:54 IST

शासकीय इमारती, रस्ते, पुलांच्या बांधकामात एकुण लागणाºया वाळूपैकी किमान २० टक्के कृत्रिम वाळू वापरण्याचे बंधनकारक करण्यात आले.

ठळक मुद्देनदी-नाल्यांच्या प्रवाहातून वाळूचे प्रचंड उत्खनन केले जात आहे. त्यातून प्रवाह बदलणे, जमिनीची धुप होण्यासारखे प्रकार सातत्याने घडत आहेत.प्रवाहात पाणी वाहत नसल्याने जलचरांच्या जीवनचक्रावरही परिणाम झाला आहे.

अकोला : नदी-नाल्यांतील वाळूचे वारेमाप उत्खनन केल्याने नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण होणे, तसेच पर्यावरणाचा होणारा ºहास थांबवण्यासाठी शासकीय इमारती, रस्ते, पुलांच्या बांधकामात यापुढे कृत्रिम वाळूचा वापर किमान २० टक्के केलाच पाहिजे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वसंबंधित यंत्रणांना नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिले आहेत.केेंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने २०१६ मध्ये मंजूर केलेल्या कायद्यातील अधिसूचनेनुसार त्यातील अटींचे पालन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोठ्या प्रमाणात शासकीय इमारती, रस्ते, पुलांची बांधकामे केली जातात. त्या बांधकामात काँक्रीटचे प्रमाण अधिक असते. त्याचा प्रमुख घटक म्हणून नैसर्गिक वाळूची मागणीही प्रचंड असते. त्या तुलनेत नैसर्गिक वाळूची उपलब्धता अल्प प्रमाणात आहे. परिणामी, नदी-नाल्यांच्या प्रवाहातून वाळूचे प्रचंड उत्खनन केले जात आहे. त्यातून प्रवाह बदलणे, जमिनीची धुप होण्यासारखे प्रकार सातत्याने घडत आहेत. तसेच प्रवाहात पाणी वाहत नसल्याने जलचरांच्या जीवनचक्रावरही परिणाम झाला आहे.पर्यावरणाचा ºहास रोखण्यासाठी केंद्र शासनाने २०१६ मध्ये कायदा केला. त्यातील तरतुदीनुसार वाळूच्या उत्खननावरही बंधने आणली आहेत. त्या बंधनामुळेच बांधकामात काही प्रमाणात कृत्रिम वाळूचा वापर करण्याचा निर्णय राज्याच्या बांधकाम विभागाने घेतला आहे. १३ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या परिपत्रकानुसार शासकीय इमारती, रस्ते, पुलांच्या बांधकामात एकुण लागणाºया वाळूपैकी किमान २० टक्के कृत्रिम वाळू वापरण्याचे बंधनकारक करण्यात आले.

बांधकामांनाही बसला फटकानैसर्गिक वाळू न मिळाल्याने राज्यातील रस्ते, इमारतींची कामे मोठ्या प्रमाणात रखडल्याची माहिती शासनाकडे आहे. त्यामुळेच आता कृत्रिम वाळू वापरण्याचे अनिवार्य करण्यात आले.

बांधकाम विभागाची जबाबदारीसार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांमध्ये कृत्रिम वाळू वापरावीच लागणार. त्याासाठी कृत्रिम वाळूची मानके ठरवून देण्यात आली. वापर करण्यापूर्वी आवश्यक चाचण्या शासकीय प्रयोगशाळेत करण्याचेही बजावण्यात आले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाsandवाळूenvironmentपर्यावरण