शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण रक्षणासाठी कृत्रिम वाळूचा वापर बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 17:54 IST

शासकीय इमारती, रस्ते, पुलांच्या बांधकामात एकुण लागणाºया वाळूपैकी किमान २० टक्के कृत्रिम वाळू वापरण्याचे बंधनकारक करण्यात आले.

ठळक मुद्देनदी-नाल्यांच्या प्रवाहातून वाळूचे प्रचंड उत्खनन केले जात आहे. त्यातून प्रवाह बदलणे, जमिनीची धुप होण्यासारखे प्रकार सातत्याने घडत आहेत.प्रवाहात पाणी वाहत नसल्याने जलचरांच्या जीवनचक्रावरही परिणाम झाला आहे.

अकोला : नदी-नाल्यांतील वाळूचे वारेमाप उत्खनन केल्याने नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण होणे, तसेच पर्यावरणाचा होणारा ºहास थांबवण्यासाठी शासकीय इमारती, रस्ते, पुलांच्या बांधकामात यापुढे कृत्रिम वाळूचा वापर किमान २० टक्के केलाच पाहिजे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वसंबंधित यंत्रणांना नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिले आहेत.केेंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने २०१६ मध्ये मंजूर केलेल्या कायद्यातील अधिसूचनेनुसार त्यातील अटींचे पालन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोठ्या प्रमाणात शासकीय इमारती, रस्ते, पुलांची बांधकामे केली जातात. त्या बांधकामात काँक्रीटचे प्रमाण अधिक असते. त्याचा प्रमुख घटक म्हणून नैसर्गिक वाळूची मागणीही प्रचंड असते. त्या तुलनेत नैसर्गिक वाळूची उपलब्धता अल्प प्रमाणात आहे. परिणामी, नदी-नाल्यांच्या प्रवाहातून वाळूचे प्रचंड उत्खनन केले जात आहे. त्यातून प्रवाह बदलणे, जमिनीची धुप होण्यासारखे प्रकार सातत्याने घडत आहेत. तसेच प्रवाहात पाणी वाहत नसल्याने जलचरांच्या जीवनचक्रावरही परिणाम झाला आहे.पर्यावरणाचा ºहास रोखण्यासाठी केंद्र शासनाने २०१६ मध्ये कायदा केला. त्यातील तरतुदीनुसार वाळूच्या उत्खननावरही बंधने आणली आहेत. त्या बंधनामुळेच बांधकामात काही प्रमाणात कृत्रिम वाळूचा वापर करण्याचा निर्णय राज्याच्या बांधकाम विभागाने घेतला आहे. १३ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या परिपत्रकानुसार शासकीय इमारती, रस्ते, पुलांच्या बांधकामात एकुण लागणाºया वाळूपैकी किमान २० टक्के कृत्रिम वाळू वापरण्याचे बंधनकारक करण्यात आले.

बांधकामांनाही बसला फटकानैसर्गिक वाळू न मिळाल्याने राज्यातील रस्ते, इमारतींची कामे मोठ्या प्रमाणात रखडल्याची माहिती शासनाकडे आहे. त्यामुळेच आता कृत्रिम वाळू वापरण्याचे अनिवार्य करण्यात आले.

बांधकाम विभागाची जबाबदारीसार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांमध्ये कृत्रिम वाळू वापरावीच लागणार. त्याासाठी कृत्रिम वाळूची मानके ठरवून देण्यात आली. वापर करण्यापूर्वी आवश्यक चाचण्या शासकीय प्रयोगशाळेत करण्याचेही बजावण्यात आले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाsandवाळूenvironmentपर्यावरण