शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

अवकाळी पावसाचा पिकांना दणका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 18:23 IST

अवकाळी पावसाने दणका दिला असून, गहू, हरभरा, आंबा मोहोर, फळे, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

अकोला : जिल्ह्यात गारपीट, सोसाट्याचा वारा, विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने दणका दिला असून, गहू, हरभरा, आंबा मोहोर, फळे, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काढलेली पिके भिजल्याने शेतकरी संकटात सापडला. अकोला शहरातही जोरदार पाऊस बरसल्याने लघू व्यावसायिकांची चांगलीच धावपळ झाली.यावर्षी सतत पाऊस सुरू राहिल्याने मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी ही पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी हरभरा, गव्हाची पेरणी केलेली आहे. हरभरा पीक सोंगणीला आले असून, जवळ जवळ ८० टक्के शेतक ºयांनी हरभरा काढला असून, शेतात गंजी मारून ठेवला आहे. रविवारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उघड्यावर असलेले हरभरा पीक भिजले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे हरभरा काळा पडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर शेतात वेचणीला आलेला कापूसदेखील भिजला आहे. गहू, कांदा आणि तूर पीकही भिजल्याने या भागातील शेतकºयांना आणखी एका नव्या अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी शेती मशागत, पेरणी, बी-बियाणे खरेदी व आंतरमशागतीची कामे यासाठी केलेला खर्चदेखील भरून निघणार नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीRainपाऊस