शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा पिकांना दणका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 18:23 IST

अवकाळी पावसाने दणका दिला असून, गहू, हरभरा, आंबा मोहोर, फळे, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

अकोला : जिल्ह्यात गारपीट, सोसाट्याचा वारा, विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने दणका दिला असून, गहू, हरभरा, आंबा मोहोर, फळे, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काढलेली पिके भिजल्याने शेतकरी संकटात सापडला. अकोला शहरातही जोरदार पाऊस बरसल्याने लघू व्यावसायिकांची चांगलीच धावपळ झाली.यावर्षी सतत पाऊस सुरू राहिल्याने मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी ही पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी हरभरा, गव्हाची पेरणी केलेली आहे. हरभरा पीक सोंगणीला आले असून, जवळ जवळ ८० टक्के शेतक ºयांनी हरभरा काढला असून, शेतात गंजी मारून ठेवला आहे. रविवारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उघड्यावर असलेले हरभरा पीक भिजले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे हरभरा काळा पडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर शेतात वेचणीला आलेला कापूसदेखील भिजला आहे. गहू, कांदा आणि तूर पीकही भिजल्याने या भागातील शेतकºयांना आणखी एका नव्या अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी शेती मशागत, पेरणी, बी-बियाणे खरेदी व आंतरमशागतीची कामे यासाठी केलेला खर्चदेखील भरून निघणार नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीRainपाऊस