शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
3
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
4
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
5
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
6
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
7
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
9
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
10
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
11
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
12
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
13
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
14
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
15
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
16
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
17
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
18
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
19
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

अवकाळी पावसाचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 10:54 IST

हाताशी असलेल्या पिकांचे वाºयासह गारपिटीने पिकांचे नुकसान झाल्याने राहिलेल्या पिकांना लावलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळासह गारपीट झाल्याने कपाशी, तूर, हरभरा व गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.नया अंदुरा : नया अंदुरा परिसरात २ जानेवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह गारपीट झाली. हरभरा, गहू, कपाशी व तूर या पिकांच्या पानांची चाळणी झाली. त्यामुळे पिकांना लावलेला खर्चही निघत असल्याची शक्यता वाढल्याने नया अंदुरा, कारंजा, रमजानपूर, निंबा फाटा शेतशिवारातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिसरातील परतीच्या पावसाने आधीच सोयाबीन, उडीद व मूग या पिकांचा हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना तूर, कपाशी व रब्बी हंगामातील हरभरा व गहू या पिकांकडून मोठी आस होती; परंतु अचानक २ जानेवारी रोजी पहाटे अचानक विजेच्या कडकडाटासह वादळवाºयासह गारपीट झाली. त्यामुळे हाताशी असलेल्या पिकांचे वाºयासह गारपिटीने पिकांचे नुकसान झाल्याने राहिलेल्या पिकांना लावलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. सतत शेतकºयांचे नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने पिकांचा सर्व्हे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.गत आठवड्यापासून परिसरात ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर धुके आणि आता पाऊसही पडला आहे. काही पिकांना पाऊस, थंडी व धुक्याचा फटका बसत आहे. धुक्यामुळे पिकावरील पात्यांवर मोठ्या प्रमाणात दव जमा होत आहे. दरवर्षी वाढता उत्पादन खर्च आणि प्रत्यक्षात हाती येणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही. निसर्गाचा लहरीपणा, पाऊस आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. (वार्ताहर)

पहाटे गारपीट बोरगाव वैराळे, अंदुरा शेतशिवारात गुरुवारी पहाटे गारपीट झाली. अचानक विजेचा कडकडाट होऊन जोरदार वादळवारा सुटला आणि पाऊस पडायला सुरुवात झाली. या गारपिटीमुळे गहू आणि हरभरा या पिकांना फटका बसला आहे. यावर्षी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकाकडून मोठी आशा असताना रब्बी पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला.४बाळापूर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी यावर्षी संकटात सापडला आहे. खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी व कपाशी पिकांना सततच्या पावसाचा फटका बसला. शेतीला यावर्षी मोठा खर्च लागला असून, पिकांचे मातेरे झाल्याने लावलेला खर्चही वसूल झाला नाही.४कपाशीवर बोंडअळीची सुरुवात झाल्याने परिसरातील कपाशीचे पीक धोक्यात आले आहे. महागड्या कीटकनाशकांची फवारणी करूनही ही कीड नियंत्रणात येण्याची शक्यता नाही. बोंडे तयार होण्याच्या अवस्थेत असताना अळीने आक्रमण केले आहे. नव्याने तयार होत असलेली कपाशीची बोंडे किडलेली दिसून येत आहेत. त्यामुळे हताश होऊन शेतकरी कपाशीच्या पिकात जनावरे सोडून उलंगवाडी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. हातरूण

बोरगाव वैराळे, अंदुरा परिसरात गुरुवारी पहाटे वादळवारा व पावसाने हजेरी लावली. बोरगाव वैराळे परिसरात गारपीट झाल्याने रब्बी पिकांचे नुकसान झाले. आठवडाभरात पावसाने दुसºयांदा हजेरी लावली. ग्रामीण भागात गुरुवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास विजांचा कडकडाट, वादळवाºयासह अवकाळी पाऊस झाला. वादळवारा आणि अवकाळी पाऊस यामुळे तूर, हरभरा, कापूस पिकांचे नुकसान झाले आहे. बाळापूर

तालुक्यातील हातरूण, बोरगाव वैराळे, दुधाळा, मंडाळा, लोणाग्रा, हातला, निमकर्दा, मांजरी, अंदुरा, शिंगोली, मालवाडा भागात अवकाळी पाऊस झाला. तूर, हरभरा, गहू, ओवा व कपाशी या पिकांना वादळवारा व अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीHailstormगारपीट