शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

अवकाळी पावसाचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 10:54 IST

हाताशी असलेल्या पिकांचे वाºयासह गारपिटीने पिकांचे नुकसान झाल्याने राहिलेल्या पिकांना लावलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळासह गारपीट झाल्याने कपाशी, तूर, हरभरा व गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.नया अंदुरा : नया अंदुरा परिसरात २ जानेवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह गारपीट झाली. हरभरा, गहू, कपाशी व तूर या पिकांच्या पानांची चाळणी झाली. त्यामुळे पिकांना लावलेला खर्चही निघत असल्याची शक्यता वाढल्याने नया अंदुरा, कारंजा, रमजानपूर, निंबा फाटा शेतशिवारातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिसरातील परतीच्या पावसाने आधीच सोयाबीन, उडीद व मूग या पिकांचा हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना तूर, कपाशी व रब्बी हंगामातील हरभरा व गहू या पिकांकडून मोठी आस होती; परंतु अचानक २ जानेवारी रोजी पहाटे अचानक विजेच्या कडकडाटासह वादळवाºयासह गारपीट झाली. त्यामुळे हाताशी असलेल्या पिकांचे वाºयासह गारपिटीने पिकांचे नुकसान झाल्याने राहिलेल्या पिकांना लावलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. सतत शेतकºयांचे नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने पिकांचा सर्व्हे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.गत आठवड्यापासून परिसरात ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर धुके आणि आता पाऊसही पडला आहे. काही पिकांना पाऊस, थंडी व धुक्याचा फटका बसत आहे. धुक्यामुळे पिकावरील पात्यांवर मोठ्या प्रमाणात दव जमा होत आहे. दरवर्षी वाढता उत्पादन खर्च आणि प्रत्यक्षात हाती येणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही. निसर्गाचा लहरीपणा, पाऊस आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. (वार्ताहर)

पहाटे गारपीट बोरगाव वैराळे, अंदुरा शेतशिवारात गुरुवारी पहाटे गारपीट झाली. अचानक विजेचा कडकडाट होऊन जोरदार वादळवारा सुटला आणि पाऊस पडायला सुरुवात झाली. या गारपिटीमुळे गहू आणि हरभरा या पिकांना फटका बसला आहे. यावर्षी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकाकडून मोठी आशा असताना रब्बी पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला.४बाळापूर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी यावर्षी संकटात सापडला आहे. खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी व कपाशी पिकांना सततच्या पावसाचा फटका बसला. शेतीला यावर्षी मोठा खर्च लागला असून, पिकांचे मातेरे झाल्याने लावलेला खर्चही वसूल झाला नाही.४कपाशीवर बोंडअळीची सुरुवात झाल्याने परिसरातील कपाशीचे पीक धोक्यात आले आहे. महागड्या कीटकनाशकांची फवारणी करूनही ही कीड नियंत्रणात येण्याची शक्यता नाही. बोंडे तयार होण्याच्या अवस्थेत असताना अळीने आक्रमण केले आहे. नव्याने तयार होत असलेली कपाशीची बोंडे किडलेली दिसून येत आहेत. त्यामुळे हताश होऊन शेतकरी कपाशीच्या पिकात जनावरे सोडून उलंगवाडी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. हातरूण

बोरगाव वैराळे, अंदुरा परिसरात गुरुवारी पहाटे वादळवारा व पावसाने हजेरी लावली. बोरगाव वैराळे परिसरात गारपीट झाल्याने रब्बी पिकांचे नुकसान झाले. आठवडाभरात पावसाने दुसºयांदा हजेरी लावली. ग्रामीण भागात गुरुवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास विजांचा कडकडाट, वादळवाºयासह अवकाळी पाऊस झाला. वादळवारा आणि अवकाळी पाऊस यामुळे तूर, हरभरा, कापूस पिकांचे नुकसान झाले आहे. बाळापूर

तालुक्यातील हातरूण, बोरगाव वैराळे, दुधाळा, मंडाळा, लोणाग्रा, हातला, निमकर्दा, मांजरी, अंदुरा, शिंगोली, मालवाडा भागात अवकाळी पाऊस झाला. तूर, हरभरा, गहू, ओवा व कपाशी या पिकांना वादळवारा व अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीHailstormगारपीट