शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दोन महिन्यांतील १९ दिवसांत ‘अवकाळी’चा तडाखा; उन्हाळ्यातील कहर थांबेना

By संतोष येलकर | Updated: May 4, 2023 16:03 IST

जिल्ह्यातील घरांची पडझड, पीक नुकसानीचा आलेख

अकोला : कडाक्याच्या उन्हाळ्यात गेल्या दोन महिन्यांतील (एप्रिल अखेरपर्यंत) १९ दिवसांत जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसला. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा कहर अद्यापही थांबला नसल्याने, ‘अवकाळी‘च्या तडाख्यात जिल्ह्यातील घरांची पडझड आणि पिकांच्या नुकसानीचा आलेख वाढतच असल्याचे वास्तव आहे. यंदाचा उन्हाळा सुरू झाल्यानंतर प्रारंभापासूच सूर्य आग ओकू लागला होता.

जिवाची लाही लाही करणाऱ्या कडक उन्हाच्या दिवसांत प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले असताना, वातावरणात अचानक बदल झाल्याने गेल्या मार्च महिन्याच्या प्रारंभापासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा सुरू झाला. ३० एप्रिलपर्यंत गेल्या दोन महिन्यांतील १९ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात घरांची पडझड आणि पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. कडाक्याच्या उन्हाच्या दिवसात वादळी वाऱ्यासह बरसणाऱ्या अवकाळी पावसाचा कहर अद्यापही सुरूच असल्याने, जिल्ह्यातील नुकसानीचा आलेखही दरदिवसाला वाढतच असल्याचे चित्र आहे.

दोन महिन्यांतील १९ दिवसांत असा बरसला अवकाळी पाऊस!

गेल्या मार्च व एप्रिल या दोन महिन्यांच्या कालावधीत १९ दिवसांत जिल्ह्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस बरसला. त्यामध्ये ६ ते ७ मार्च रोजी जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात, १५ ते १९ मार्च या कालावधीत बार्शिटाकळी, तेल्हारा व पातूर या तीन तालुक्यांत, ३१ मार्च रोजी बार्शिटाकळी व पातूर तालुक्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला. एप्रिल महिन्यात ७ ते ९ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, पातूर, बार्शिटाकळी, मूर्तिजापूर तालुक्यात, २६ ते २७ एप्रिल दरम्यान पातूर व बार्शिटाकळी तालुक्यांत आणि २८ ते ३० एप्रिल या कालावधीत अकोट, मूर्तिजापूर आणि बार्शिटाकळी या तीन तालुक्यात अवकाळी पाऊस बरसला.

१६,८५७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान !

वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील सातही तालुक्यांत १६ हजार ८५७ हेक्टर ५५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामध्ये गहू, कांदा, टरबूज, पपई, निंबू, भुईमूग, मका, हरभरा व भाजीपाला इत्यादी पीक नुकसानीचा समावेश आहे. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊस