शहरं
Join us  
Trending Stories
1
Infosys, HCL Tech सह अनेक शेअर्समध्ये जोरदार रॅली; 'या' ५ कारणांमुळे आयटी स्टॉक्स चमकले
2
VIRAL VIDEO : 'आग' लावून हँडशेक! काय आहे 'Fire Handshake' ट्रेंड? डॉक्टरांनी दिली गंभीर चेतावणी!
3
पत्नीचं नाव 'मोटी' म्हणून सेव्ह केलं, प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं अन् मग...!
4
Viral Video: गळ्यात गमछा, कमरेला लुंगी! भोजपुरी गाण्यावर तरुणीचा जबरदस्त डान्स, नेटकरी झाले फिदा
5
बाल्कनीतून पाय घसरला, पती ग्रिलवर लटकला; वाचवण्यासाठी पत्नी धावली, पण नियतीने डाव साधला!
6
३ दिवसांत २७% नी वाढला 'हा' छोटा शेअर; एकावर १ फ्री स्टॉक देणार कंपनी, शेअर विभाजनाचीही घोषणा
7
आता 'स्वदेशी'चं काय झालं..?; लोकपाल सदस्यांना ७० लाखांची BMW देण्यावरून राजकारण तापलं !
8
जळगाव: 'दिवाळी सुफी नाईट'मध्ये कमरेला पिस्तूल लावून पैसे उधळले; पियुष मण्यार विरोधात गुन्हा
9
कठीण काळात आणखी घट्ट होतेय भारत-रशिया मैत्री; प्लॅन जाणून ट्रम्प यांचा आणखी थयथयाट होणार!
10
सर्वसामान्यांसाठी खुशखबर...! लग्नसराईपूर्वीच सोन्या-चांदीच्या भावात घसरण, चेक करा १८,२२,२३ अन् २४ कॅरेटचा लेटेस्ट रेट
11
जेवण केलं, पत्नीसोबत खोलीत गेले, त्यानंतर बाथरूमध्ये जाताच..., ब्राह्मोसवर काम करणाऱ्या इंजिनियरचा संशयास्पद मृत्यू
12
जिद्दीला सॅल्यूट! अवघ्या २२ व्या वर्षी झाली IAS; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC
13
“आम्हाला राहुल गांधींना PM करायचेय, काँग्रेस मुंबईचे महापौरपद काय घेऊन बसलेय”: संजय राऊत
14
Gulab Jamun : ना गुलाब ना जामून, मग या गोड पदार्थाला कसं पडलं हे नाव? सगळ्यांनाच खायला आवडतं पण माहिती कुणालाच नसेल!
15
इंदूरमध्ये पेंटहाऊसला भीषण आग; 'डिजिटल लॉक' अडकल्याने काँग्रेस नेत्याचा गुदमरून मृत्यू, पत्नी, मुलीची प्रकृती चिंताजनक
16
कुटुंबीयांना कॉल केला अन्...; रशियात नदीकाठी सापडले कपडे, ३ दिवसांपासून अजित बेपत्ता
17
Crime: तीन वर्षांच्या मुलासह महिलेची सातव्या मजल्यावरून उडी; सासरच्या लोकांवर गंभीर आरोप
18
Railway Accident: 'रील'चे वेड जीवावर बेतले; रेल्वेच्या धडकेत १५ वर्षीय मुलाचा मृत्यू
19
"त्यांचा काहीतरी व्हिडीओ हाताला..."; मुंबईत कमळ फुलणार म्हणणाऱ्या महेश कोठारेंवर मनसेचा निशाणा
20
महाआघाडीचं ठरलं, बिहारमध्ये तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, तर उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' नेत्याच्या नावाची घोषणा

तापमानवाढीला तोंड देण्यासाठी कृतिशून्य आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 11:09 IST

महाराष्ट्राने यू.के. मेट आॅफिस व द एनर्जी रिसोर्स संस्था (टेरी) यांना वातावरणीय बदल कृती आराखडा तयार करण्याचे काम दिले.

- सदानंद सिरसाट  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जागतिक वातावरणीय बदलामुळे राज्याचे सरासरी तापमान वाढणार असून, त्यामुळे पिकांच्या उत्पादकतेवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. या बदलाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र राज्य वातावरणीय बदल कृती आराखड्यात सूचविलेल्या उपाययोजना कागदावरच आहेत. आॅक्टोबर २०१७ पासून अनेक उपाययोजनांकडे राज्य शासनाने लक्ष न दिल्याने येत्या काळातील धोका आणखी गडद होत आहे. त्यापैकी जलसंपदेच्या महत्त्वाच्या उपायाचाही पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.जागतिक स्तरावर औद्योगिकीकरण, वाढती लोकसंख्या, बेसुमार जंगलतोड, नैसर्गिक व मानवनिर्मित घडामोडींमुळे वातावरणातील कार्बन डायआॅक्साइड, नायट्रोजन, मिथेन यासारख्या हरित वायूंचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पृथ्वीच्या तापमानातही वाढ झाली आहे. नजीकच्या काळात या भयंकर समस्येला सजीवसृष्टीला सामोरे जावे लागणार आहे.वातावरणातील बदलांमुळे मुख्यत: अनियमित पाऊस, तीव्र दुष्काळ, मोठे पूर, जमिनीतील पोषक द्रव्यांचा असमतोल, वॉटर लॉगिंग, अन्न सुरक्षा, रोगराईत होणारी वाढ, जंगल, जैवविविधता, जंगलांचा ºहास, सधनता, उत्पादकता, पाण्याची उपलब्धता, सागरी किनाऱ्यांची धूप, सागर किनाºयावरील लोकवस्ती व मासेमारी यावर मोठे परिणाम होणार आहेत.आकस्मिक अतिवृष्टीने महापूर येणे किंवा काही ठिकाणी दुष्काळ पडणे, या घटनांमध्येही वाढ होत आहे. या सगळ्या संभाव्य परिणामांना सामोरे जाण्यासाठी केंद्र शासनाने २००८ मध्येच राष्ट्रीय वातावरणीय बदल कृती आराखडा राज्यांना दिला. तसेच राज्यासाठी अनुरूप आराखडा तयार करण्याचेही बजावले. महाराष्ट्राने यू.के. मेट आॅफिस व द एनर्जी रिसोर्स संस्था (टेरी) यांना वातावरणीय बदल कृती आराखडा तयार करण्याचे काम दिले. तो आराखडा तयार झाला. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आॅक्टोबर २०१७ मध्ये सर्व संबंधित यंत्रणांना निर्देशही देण्यात आले; मात्र कोणतीही उपाययोजना प्रत्यक्षात तयारच होत नसल्याचे चित्र आहे.महत्त्वाच्या जलसंपदेकडेही कानाडोळाउपाययोजनांमध्ये जलसंपदेचे धोके कमी करण्यासाठीही उपक्रम आहेत. त्यामध्ये नदी व जलाशयांचे पुनरुज्जीवन करणे, धरणाच्या खालच्या बाजूस वर्षभर आवश्यक असलेला प्रवाह नियोजित करणे, त्यामुळे भूजल पातळीत सातत्य तसेच जैवविविधता टिकवून ठेवता येईल. नद्यांवर कोल्हापुरी बंधारे बांधणे, पाण्याच्या वापरामध्ये सुधारणा करून उपयुक्तता वाढविणे, धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात दाट वनीकरण करणे, नदीच्या उगमस्थानाजवळ जंगलांचा बचाव करणे, सांडपाण्याचा पुनर्वापर बंधनकारक करणे, स्वच्छ पाण्याची मागणी कमी करणे, यासारख्या उपाययोजनांसाठी जलसंपदा, नगरविकास, उद्योग विभागाचे एकात्मिक धोरण अद्याप ठरलेले नाही, हे विशेष.

टॅग्स :Akolaअकोलाenvironmentपर्यावरण