शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

फौजदारी कारवाई झालेल्या तलाठ्यांना नियमबाह्य पदस्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 14:03 IST

मंगरुळपीरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांना पुन्हा तलाठी पदावर पदस्थापना देण्याचे आदेश काढले आहेत.

- दादाराव गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मानोरा तहसील कार्यालयांतर्गत कार्यरत तलाठ्यांवरील फौजदार प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल अप्राप्त असतानाही कारंजा उपविभागाचा प्रभार सांभाळत असलेल्या मंगरुळपीरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांना पुन्हा तलाठी पदावर पदस्थापना देण्याचे आदेश काढले आहेत. विशेष म्हणजे, श्रेणी ३ च्या तलाठ्यांची बदली करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनाच असताना त्यांनी ही प्रक्रिया पार पाडत, जिल्हाधिकाºयांच्या अधिकारावर अतिक्रमणच केल्याचे स्पष्ट होत आहे.प्राप्त माहितीनुसार कारंजा उपविभागांतर्गत विविध ठिकाणी कार्यरत चार तलाठ्यांना २००९ ते २०१४ या कालावधीत फौजदारी प्रकरणात निलंबित करण्यात आले होते. त्यात दिलिप अंगाईतकर, निलेश कांबळे, व्ही.एम. भोयर आणि एस. डी. महाजन यांचा समावेश होता. दिलिप अंगाईतकर, यांच्यावरील खटल्याचा २९ जुलै २०१६ रोजी निकाल लागला, तर निलेश कांबळे यांच्यावरील खटल्याचाही निकाल लागला. हे चारही तलाठी सध्या कारंजा येथील तहसील कार्यालयात अकार्यकारी पदावर कार्यरत आहेत. तथापि, व्ही.एम. भोयर आणि एस. डी. महाजन यांच्यावरील खटल्याचा चौकशी अहवाल २४ फेब्रुवारी २०२० पर्यंत अप्राप्त असून, शासनाच्या १४ आॅक्टोबर २०११ च्या निर्णयातील परिच्छेद ५ नुसार फौजदारी कारवाई झालेल्या तलाठ्यांना (शासकीय कर्मचारी) संबंधित प्रकरणाचा खटला, अपिल, विभागीय चौकशीचा निकाल लागेपर्यंत अकार्यकारी व जनसंपर्क येणार नाही, अशाच पदावर पदस्थापना देण्याची खबरदारी ठेवणे आवश्यक आहे; परंतु कारंजा उपविभागाचा प्रभार सांभाळत असलेल्या मंगरुळपीर उपविभागीय अधिकाºयांनी या तलाठ्यांना २७ फेब्रुवारी रोजी तलाठी पदावर पदस्थापना देण्याचे आदेश पारित केले. विशेष म्हणजे ज्या तालुक्यात कार्यरत असताना या तलाठ्यांवर फौजदारी प्रकरणात निलंबनाची कारवाई झाली.त्याच तालुक्यात व्ही. एम. भोयर आणि एस. डी. महाजन यांना पदस्थापना दिली आहे. त्यातच वर्ग ३ मध्ये मोडणाºया कर्मचाºयांच्या बदलीचे अधिकार उपविभागीय अधिकाºयांना नसल्याचा निर्वाळा ‘मॅट’ने काही महिन्यांपूर्वी दिला असतानाही प्रभारी उपविभागीय अधिकाºयांनी या तलाठ्यांना पदस्थापना देत जिल्हाधिकाºयांच्या अधिकारांवर अतिक्रमण केले.

या प्रकरणाची विस्तृत माहिती नाही. त्यामुळे सर्व प्रकरणाची शहानिशा करून झालेली प्रक्रिया चुकीची असेल, तर ती रद्द करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

तलाठ्यांची नियुक्ती, बदलीबाबत नियुक्ती प्राधिकारी म्हणून आम्हाला अधिकारी आहेत, शिवाय पदस्थापना देताना नियमांचे उल्लंघनही करण्यात आले नाही. -जयवंत देशपांडे,प्रभारी उपविभागीय अधिकारी, कारंजा

टॅग्स :washimवाशिम