शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

अकोटात दगडफेक; तणावपूर्ण शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 01:28 IST

अकोट : अकोट शहरातील पानअटाई ते घसेटीपुरा या भागात ९  नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास काही युवकांमध्ये  वादविवाद होऊन दगडफेकीची घटना घडली.

ठळक मुद्देदंगलीच्या अफवांमुळे पळापळबाजारपेठ बंद; १0 जणांना  अटक

अकोट : अकोट शहरातील पानअटाई ते घसेटीपुरा या भागात ९  नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास काही युवकांमध्ये  वादविवाद होऊन दगडफेकीची घटना घडली. या घटनेमुळे  दंगलीची अफवा पसरल्याने पळापळ होऊन शहरातील बाजारपेठ  बंद झाली होती. घटनास्थळावर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश  कलासागर, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकांत सागर  यांच्यासह पोलीस ताफा पोहोचला आहे.या दगडफेक प्रकरणी १0  जणांना रात्री उशीरा अटक करण्यात आली.घसेटीपुरा व डोहोरपुरा परिसरातील काही युवकांमध्ये गुरुवारी  रात्री ८ वाजता क्षुल्लक कारणावरून वादविवाद झाल्याचे बोलले  जात आहे. या वादविवादातून एकमेकांवर दगडफेक करण्यात  आली. या घटनेबाबत शहरात मात्र दंगल सुरू झाल्याची अफवा  पसरल्यामुळे पळापळ झाली. अवघ्या काही मिनिटांत अकोट  शहरातील बाजारपेठ बंद झाली. सदर घटनेची माहिती मिळताच  पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी तातडीने पोलीस ताफ्यासह  घटनास्थळ गाठले; परंतु दरम्यानच्या काळात क्षुल्लक कारणावरून  दगडफेक करणारे युवक घटनास्थळावरून पसार झाले होते.  घटनास्थळावर प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी गावीत,  एलसीबी प्रमुख कैलास नागरे, अकोट ग्रामीण पोलीस निरीक्षक  मिलिंद बहाकर यांच्यासह हिवरखेड, दहीहांडा येथील अतिरिक्त  पोलीस ताफा पोहोचला होता. घसेटीपुरा व पानअटाई यादरम्यान  झालेल्या दगडफेकीचे लोण पसरू नये म्हणून पोलिसांनी सर्वत्र  बंदोबस्त लावला असून, शहरात सद्यस्थितीत शांतता आहे. 

अफवांना आळा कधी बसणार?अकोट शहरात सतत उलटसुलट अफवा उठविल्या जातात.  दोघांमध्ये आपसात वादविवाद जरी झाला, तरी सार्वत्रिकपणे जा तीय स्वरूप देऊन अफवा पसरविल्या जातात. त्यामुळे व्यापारी  व नागरिकांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतो, तसेच  शहराच्या शांततेला गालबोट लागून बाजारपेठ बंद होऊन पळा पळ होते. अशा स्थितीत शहरवासीयांनी सामंजस्य राखून  अफवांना बळी न पडता शहरात शांतता ठेवणे गरजेचे आहे, तर  दुसरीकडे पोलिसांनी अफवा पसरविणार्‍यांचा शोध घेऊन कठोर  कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे बोलल्या जात आहे. 

हा प्रकार क्षुल्लक कारणावरून घडला असावा. घटनेचे नेमके  कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नागरिकांनी कोणत्याही  अफवांवर विश्‍वास ठेवू नये. पोलिसांना सहकार्य करावे. - विजयकांत सागर, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक, अकोला. 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस