शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात अकोल्याचे दोन खेळाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 01:28 IST

​​​​​​​अकोला : रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या दिल्ली विरुद्ध विदर्भ या संघामध्ये होणार्‍या अंतिम सामन्यात विदर्भाच्या संघात अकोला क्रिकेट क्लबचे रवी ठाकूर व आदित्य ठाकरे या दोन खेळाडूंची निवड झाली आहे. इंदूर येथे खेळल्या जात असलेल्या अंतिम सामन्यात आदित्य ठाकरे व रवी ठाकूर यांना अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देविदर्भ संघात रवी ठाकूर व आदित्य ठाकरे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या दिल्ली विरुद्ध विदर्भ या संघामध्ये होणार्‍या अंतिम सामन्यात विदर्भाच्या संघात अकोला क्रिकेट क्लबचे रवी ठाकूर व आदित्य ठाकरे या दोन खेळाडूंची निवड झाली आहे. इंदूर येथे खेळल्या जात असलेल्या अंतिम सामन्यात आदित्य ठाकरे व रवी ठाकूर यांना अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान प्राप्त झाले आहे. अकोल पोलीस विभागात कार्यरत डावखुरा मध्यमगती गोलंदाज रवी ठाकूर हा २0१२ पासून विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. आदित्य ठाकरे याने १६ व १९ वर्षाखालील विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व केले असून, मलेशिया येथे झालेल्या आशिया कप स्पर्धेत त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. न्यूझिलंड येथे होणार्‍या १९ वर्षाखालील विश्‍वकप स्पर्धेकरिता त्याची भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून निवड झाली आहे. रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील पहिल्या दिवशी त्याने पहिल्याच षटकात एक बळी मिळविला आहे. अकोला क्रिकेट क्लबच्या खेळाडूंची विदर्भ संघात निवड होणे ही अकोल्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे अकोला क्रिकेट क्लबचे कर्णधार भरत डिक्कर यांनी सांगितले.या खेळाडूंची निवड झाल्याबद्दल पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, अकोला क्रिकेट क्लबचे अध्यक्ष नानूभाई पटेल, उपाध्यक्ष विजय तोष्णीवाल, सचिन विजय देशमुख, कैलाश शहा, दिलीप खत्री आदींनी त्यांचे कौतुक केले आहे. 

टॅग्स :Akola Cricket Clubअकोला क्रिकेट क्लबRanji Trophyरणजी करंडक