शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दोन महिने उलटले; पण हरभऱ्याचे मिळाले नाही चुकारे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 13:13 IST

दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आधीच संकटात सापडला असताना, हरभºयाचे चुकारे मिळाले नसल्याने शेतकºयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

- संतोष येलकरअकोला : जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील चार खरेदी केंद्रांवर नाफेडमार्फत २५ मेपर्यंत १ हजार २ शेतकऱ्यांकडून २७ हजार ९२ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. हरभरा विकल्यानंतर दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र विकलेल्या हरभºयाचे चुकारे अद्याप शेतकºयांना मिळाले नाही. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आधीच संकटात सापडला असताना, हरभºयाचे चुकारे मिळाले नसल्याने शेतकºयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.आधारभूत किंमत योजनेंतर्गत जिल्ह्यात १५ मार्चपासून नाफेडमार्फत हमीदराने हरभरा खरेदी सुरू करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्ह्यातील पारस, तेल्हारा, बाळापूर व पातूर या चार खरेदी केंद्रांवर २५ मेपर्यंत १ हजार २ शेतकºयांकडून २७ हजार ९२ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. हरभरा खरेदी सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला; मात्र विकलेल्या हरभºयाचे चुकारे अद्याप मिळाले नाही. दुष्काळी परिस्थितीत आधीच शेतकरी संकटात सापडला असताना येत्या खरीप हंगामातील पेरणीचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. त्यातच विकलेल्या हरभºयाचे चुकारे अद्याप मिळाले नसल्याने, शेतकºयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यानुषंगाने विकलेल्या हरभºयाचे हक्काचे पैसे केव्हा मिळणार, याबाबत शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.सात कोटींचे चुकारे प्रलंबित;मिळाले अडीच कोटी!चार खरेदी केंद्रांवर १ हजार २ शेतकºयांकडून २७ हजार ९२ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. त्यापोटी ६ कोटी ९६ लाख रुपयांचे चुकारे प्रलंबित आहेत. प्रलंबित चुकाºयाच्या रकमेपैकी २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी ‘नाफेड’मार्फत जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे. उपलब्ध रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. अडीच कोटी रुपयांचे चुकारे अदा करण्यात येणार असले तरी उर्वरित चुकाºयापोटी ४ कोटी ८९ लाख रुपयांची रक्कम नाफेडकडून केव्हा प्राप्त होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नाफेडमार्फत हरभरा खरेदीत जिल्ह्यातील चार खरेदी केंद्रांवर आतापर्यंत १ हजार २ शेतकºयांकडून २७ हजार ९२ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. त्यापोटी एकूण ६ कोटी ९६ लाख रुपयांपैकी २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी नाफेडकडून प्राप्त झाला. उपलब्ध रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. हरभरा खरेदीच्या सर्व चुकाºयाची रक्कम महिन्याभरात शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.-एच. एल. पवार,जिल्हा मार्केटिंग अधिकारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी