शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या पावसाने पिकांच्या नुकसानीची जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना मिळणार मदत !

By संतोष येलकर | Updated: June 17, 2023 16:08 IST

सतत पावसाच्या तडाख्यात १.३७ हेक्टरवरील पिकांचे झाले होते नुकसान

अकोला : गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात सततच्या पावसामुळे राज्यात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १३ जून रोजी मंजुरी देण्यात आली. त्यानुसार गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये सतत पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात १ लाख ३७ हजार ८३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेल्या २ लाख ४४२ शेतकऱ्यांना पीक नुकसानीची मदत लवकरच मिळणार आहे.

गेल्यावर्षी सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार १ हजार ५०० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर गेल्या सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांच्या कालावधीत सतत पाऊस बरसल्याने जिल्ह्यात १ लाख ३७ हजार ८३२ हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील २ लाख ४४२ शेतकऱ्यांना पीक नुकसानीची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाकडून मदतीचा निधी मंजूर करण्यात आला असल्याने, सततच्या पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील संबंधित शेतकऱ्यांना लवकरच पीक नुकसानीची मदत मिळणार आहे.

दोन हेक्टरच्या मर्यादेत अशी मिळणार मदत !राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दरानुसार व निकषानुसार सतत पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जाणार आहे. त्यामध्ये जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर ८ हजार ५०० रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीपोटी प्रतिहेक्टर १७ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीपोटी प्रतिहेक्टर २२ हजार ५०० रुपयांची मदत मिळणार आहे.

सततच्या पावसाने जिल्ह्यात असे झाले होते पिकांचे नुकसान !

गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात सप्टेंबर महिन्यात सतत पावसामुळे जिल्ह्यातील ५६७ गावांत ८६ हजार ५८६ शेतकऱ्यांचे ६७ हजार ५५३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते.गेल्या ऑक्टोबर महिन्यात सततच्या पावसामुळे जिल्ह्यात ४९६ बाधित गावांत १ लाख १३ हजार ८५६ शेतकऱ्यांचे ७० हजार २७९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी अपेक्षित मदत निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला होता.

टॅग्स :Farmerशेतकरी