अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २0१५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. अकोला जिल्ह्यात ९२.७0 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. उत्तीर्ण होणार्यांमध्ये मुलींची टक्केवारी ९४.६३, तर मुलांची ९0.९१ आहे. बारावीच्या परीक्षेत मागील काही वर्षांपासून अमरावती विभागात अकोला जिल्ह्याने आघाडी घेतली होती. यावर्षी मात्र ही आघाडी जिल्ह्याला कायम राखता आली नाही. जिल्ह्यातून २0 हजार ८९१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यात १0 हजार ८४३ मुले, तर १0 हजार ४८ मुली होत्या; यापैकी २0 हजार ८७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा देणार्यांमध्ये १0 हजार ८३0 मुले, तर १0 हजार ४३ मुली होत्या; यापैकी १९ हजार ३५0 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांपैकी ९२.७0 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मुलांची संख्या ९ हजार ८४६ इतकी, तर मुलींची संख्या ९५0४ इतकी आहे. उत्तीर्ण होणार्या मुलांची टक्केवारी ९0.९१, तर मुलींची टक्केवारी ९४.६३ इतकी आहे.
बारावीत मुलींची बाजी
By admin | Updated: May 28, 2015 18:58 IST