शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तिरंगी लढत, इच्छुक उमेदवारांमध्ये रस्सीखेच!

By admin | Updated: June 12, 2014 20:31 IST

आकोट विधानसभा मतदारसंघामध्ये विजयाचे समीकरण निश्‍चित करणे शेवटच्या क्षणापर्यंत कठिण आहे.

आकोट : पाडापाडीचे राजकारण, जातीय मुद्यांचा प्रभाव, सहकार क्षेत्राची रणनीती आदी डावपेचांमध्ये गुरफटलेल्या आकोट विधानसभा मतदारसंघामध्ये विजयाचे समीकरण निश्‍चित करणे शेवटच्या क्षणापर्यंत कठिण आहे. गटातटाच्या राजकारणात गुंतलेली युती आणि आघाडी तसेच केवळ सोयीचे राजकारण करणारा भारिप-बमसं, यांच्यात होणार्‍या तिरंगी लढतीमध्ये मैदानात उतरण्याचे वेध इच्छुक उमेदवारांना लागले आहेत.आकोट विधानसभा मतदारसंघावर १९८९ पर्यंत काँग्रेसचे वर्चस्व होते. १९८९ मध्ये शिवसेना-भाजप युतीने हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला. त्यावेळी काँग्रेसचे सुधाकरराव गणगणे व शिवसेनेचे डॉ. जगन्नाथ ढोणे यांच्यात लढत होऊन, डॉ. ढोणे विजयी झाले होते. १९९४ मध्ये पुन्हा काँग्रेसचे सुधाकरराव गणगणे यांना शिवसेनेचे रामेश्‍वर कराळे यांनी पराभवाची धुळ चाखली. या दोन्ही निवडणुकांमध्ये आलेले अनुभव विचारात घेऊन, १९९९ च्या निवडणुकीत काँग्रेस-भारिप बमसंची युती झाली. या निवडणुकीत भारिप बमसंचे रामदास बोडखे हे विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे रामेश्‍वर कराळे आणि शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढविणारे डॉ. जगन्नाथ ढोणे यांना पराभूत केले. २00४ च्या निवडणुकीत रामदास बोडखे यांनी भारिप-बमसं सोडून काँग्रेसची उमेदवारी मिळवली. त्यांची लढत भारिप बमसंचे भाऊराव अंबळकार, अपक्ष उमेदवार हिदायत पटेल आणि शिवसेनेचे माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांच्याशी झाली. या चौरंगी लढतीत गुलाबराव गावंडे विजयी झाले. २00९ च्या निवडणुकीत दर्यापूरचे माजी आमदार प्रकाश भारसाकळे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आकोट मतदारसंघात उडी घेतली. त्यामुळे चौरंगी लढत झाली. या लढतीमध्ये ३७ हजार ८३४ मतं घेऊन, शिवसेनेचे संजय गावंडे विजयी झाले. काँग्रेसचे सुधाकरराव गणगणे यांना ३६ हजार ८६९, भारिप-बमसंचे प्रभाकर मानकर यांना ३२ हजार ६२९ तर अपक्ष उमेदवार प्रकाश भारसाकळे यांना ३२ हजार ४१५ मतांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, २00४ ची निवडणूक वगळता १९८९ पासून २00९ पर्यंत या मतदारसंघावर शिवसेना-भाजपचा वरचष्मा राहीला आहे.दरम्यान, लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघामध्ये भाजप-सेना युतीला ७७ हजार ९८४, काँग्रेसला ४५ हजार ५६0 तर भारिप-बमसंला ३३ हजार १५९ मतं मिळाली. त्यामुळे हा शिवसेनेच्या वाटयाला असला तरी, मोदी लाट पाहता भाजप या मतदारसंघाकडे टक लावून आहे. दुसरीकडे आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची झालेली पडझड पाहता, राष्ट्रवादी काँग्रेसही या मतदारसंघाकडे लक्ष ठेवून आहे; तथापि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल हे स्वत:च या मतदारसंघाचे रहिवासी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची डाळ शिजणे कठीण आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेची कामगिरी चांगली असल्याने, भाजपचेही मनसुबे यशस्वी होणे सोपे नाही. निवडणुकीच्या या राजरंगात मनसेची भूमिकाही निश्‍चितच महत्वाची राहणार आहे.या मतदारसंघात मराठा, कुणबी, माळी, बारी, मुस्लीम आणि दलित मते निणार्यक संख्येमध्ये आहेत; मात्र आकोट मतदारसंघात मोडणार्‍या तेल्हारा तालुक्याच्या वाट्याला कोणत्याही पक्षाची उमेदवारी सहजासहजी येत नसल्याने या तालुक्याची मतं व सहकार क्षेत्राची रणनीती निर्णायक राहणार आहे. सद्यस्थितीमध्ये या मतदारसंघात शिवसेनेतर्फे आमदार संजय गावंडे, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे, श्याम देशमुख, माजी आमदार रामेश्‍वर कराळे हे प्रबळ दावेदार आहेत. काँग्रेसतर्फे माजी राज्यमंत्री सुधाकरराव गणगणे किंवा त्यांचे पुत्र महेश गणगणे, माजी राज्यमंत्री रामदास बोडखे किंवा त्यांचे पुत्र माजी नगराध्यक्ष प्रा. संजय बोडखे, नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांची नावं चर्चेत आहेत. भारिप- बहुजन महासंघातर्फे माजी नगराध्यक्षा डॉ. मनीषा मते, माजी नगराध्यक्ष भाऊराव अंबळकार, माजी जि.प. सदस्य प्रदीप वानखडे, काशिराम साबळे, प्रभाकर मानकर हे उत्सुक आहेत. मनसेतर्फे प्रा. राजेंद्र पुंडकर आणि मुकेश निचळ तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राजीव बोचे आणि रमेश हिंगणकर यांची प्रबळ दावेदारी राहू शकते.सध्याच्या राजकीय परिस्थितीचा वेध घेतला, तर उमेदवार जाहीर करताना प्रत्येक पक्षाला मतदारसंघाच्या सर्वच समिकरणांचा विचार करावा लागेल, असे चित्र दिसत आहे.