शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तूर खरेदी बंद ; अकोला जिल्ह्यात ३२ हजारावर शेतकऱ्यांचा जीव टांगणीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 13:33 IST

अकोला : ‘नाफेड’ मार्फत जिल्ह्यातील तूर खरेदी मंगळवारपासून बंद करण्यात आली आहे. तूर खरेदीस अद्याप मुदतवाढ मिळाली नसल्याने, आॅनलाइन नोंदणी केलेल्या ३२ हजार १४६ शेतकऱ्यांच्या तूर खरेदीची प्रक्रिया रखडली आहे.

ठळक मुद्देतूर खरेदीसाठी जिल्ह्यातील ४५ हजार ९५५ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली. नाफेडमार्फत तूर खरेदीची मुदत १५ मे रोजी सायंकाळी संपुष्टात आल्याने, जिल्ह्यात तूर खरेदी बंद करण्यात आली. आॅनलाइन नोंदणी केलेल्या मात्र तूर खरेदी रखडलेल्या जिल्ह्यातील ३२ हजार १४६ शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

अकोला : ‘नाफेड’ मार्फत जिल्ह्यातील तूर खरेदी मंगळवारपासून बंद करण्यात आली आहे. तूर खरेदीस अद्याप मुदतवाढ मिळाली नसल्याने, आॅनलाइन नोंदणी केलेल्या ३२ हजार १४६ शेतकऱ्यांच्या तूर खरेदीची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे तूर खरेदी केव्हा सुरू होणार, या प्रतीक्षेत जिल्ह्यातील शेतकºयांचा जीव टांगणीला लागला आहे.नाफेडमार्फत जिल्ह्यातील अकोला, तेल्हारा, पातूर, अकोट, बार्शीटाकळी, वाडेगाव, पारस व मूर्तिजापूर इत्यादी आठ केंद्रांवर गत २ फेबु्रवारीपासून तूर खरेदी सुरू करण्यात आली होती. तूर खरेदीसाठी जिल्ह्यातील ४५ हजार ९५५ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली; परंतु खरेदी करण्यात आलेली तूर साठविण्यासाठी वखार महामंडळाच्या जिल्ह्यातील गोदामांमध्ये जागा उपलब्ध नसल्याचे सांगून, तूर खरेदी संथगतीने करण्यात आली व वारंवार खरेदी खंडित करण्यात आली. नाफेडमार्फत तूर खरेदीची मुदत १५ मे रोजी सायंकाळी संपुष्टात आल्याने, जिल्ह्यात तूर खरेदी बंद करण्यात आली. आॅनलाइन नोंदणी केलेल्या ४५ हजार ९५५ तूर उत्पादक शेतकऱ्यांपैकी १५ मेपर्यंत केवळ १३ हजार ८०९ शेतकºयांची तूर खरेदी करण्यात आली असून, उर्वरित ३२ हजार १४६ शेतकºयांची तूर खरेदीची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. तूर खरेदी बंद करण्यात आली असून, खरेदीसाठी अद्याप मुदतवाढ मिळाली नाही, तसेच सरकारमार्फत तूर खरेदीसंदर्भात अद्याप कोणताही आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला नाही. त्यामुळे तूर खरेदी केव्हा सुरू होणार, याबाबत आॅनलाइन नोंदणी केलेल्या मात्र तूर खरेदी रखडलेल्या जिल्ह्यातील ३२ हजार १४६ शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.जिल्ह्यातील तूर खरेदीवर एक दृष्टिक्षेप!-आॅनलाइन नोंदणी केलेले शेतकरी : ४५९५५-तूर खरेदी करण्यात आलेले शेतकरी : १३८०९-तूर खरेदीच्या प्रतीक्षेत शेतकरी : ३२१४६-खरेदी करण्यात आलेली तूर : २ लाख ६हजार ३९१ क्विंटल.-बाकी असलेली तूर खरेदी : २ लाख क्विंटल.जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविला मुदतवाढीचा प्रस्ताव !जिल्ह्यात दोन लाख क्विंटल तूर खरेदीची प्रक्रिया बाकी आहे. त्यानुषंगाने तूर खरेदीसाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव बुधवारी शासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेयFarmerशेतकरी