शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

तुरीवर नुकसानीचे ढग; ५० टक्क्यापेक्षा अधिक घटण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 13:54 IST

अकोला: दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यात कपाशीचा हंगाम संपण्याच्या मार्गावर असतानाच, तुरीच्या पिकाचेही खरे नाही. जमिनीत ओलावा नसल्याने तुरीचे उत्पादन ५० टक्क्यापेक्षा अधिक घटण्याची शक्यता असल्याने, शेतकरी चिंतेत सापडला आहे.

- संतोष येलकर

अकोला: दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यात कपाशीचा हंगाम संपण्याच्या मार्गावर असतानाच, तुरीच्या पिकाचेही खरे नाही. जमिनीत ओलावा नसल्याने तुरीचे उत्पादन ५० टक्क्यापेक्षा अधिक घटण्याची शक्यता असल्याने, शेतकरी चिंतेत सापडला आहे.पावसातील खंड, जमिनीतील कमी आर्द्रता, भूजल पातळीत घट आणि त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने, जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यात शासनामार्फत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील कोरडवाहू क्षेत्रात जमिनीत ओलावा नसल्याने, कपाशीच्या झाडांना आता पात्या-फुले आणि बोंड्या राहिल्या नसून, कपाशीचे पीक सुकले आहे. त्यामुळे यावर्षी डिसेंबर महिन्यातच कपाशीचा हंगाम संपण्याच्या मार्गावर असून, उत्पादनात घट झाल्याने, जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कापूस पिकाचे उत्पादन हातून गेल्याने, कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांची तूर पिकावर भिस्त होती; मात्र परतीच्या पावसाने हजेरी लावली नाही. दुष्काळी परिस्थितीत जमिनीत ओलावा नसल्याने, अडचणीत सापडलेल्या तुरीच्या पिकाचीही स्थिती चांगली नाही. ५० टक्क्यापेक्षा अधिक तूर पिकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने, कपाशी पाठोपाठ तूर उत्पादक शेतकरीही चिंतेत सापडला आहे.सोयाबीनच्या शेतात पेरता आला नाही हरभरा!अकोला तालुक्यासह इतर भागात सोयाबीनचे पीक काढल्यानंतर हरभरा पेरणीची तयारी शेतकºयांनी केली होती; मात्र जमिनीत पेरणीयोग्य ओलावा नाही आणि काटेपूर्णा प्रकल्पातून रब्बी सिंचनासाठी सोडण्यात आलेले पाणी विलंबाने सोडण्यात आल्याने, कोरडवाहू क्षेत्रात सोयाबीनच्या शेतांत शेतकºयांना हरभरा पेरता आला नाही. पेरणी हुकल्याने, रब्बी हरभºयाचे उत्पादनही शेतकºयांच्या हातून गेले.बागायती गहू पेरणी सुरू; पण क्षेत्र अत्यल्प!जिल्ह्यात सिंचनासाठी पाणी उपलब्ध असलेल्या भागात बागायती गव्हाची पेरणी सुरू करण्यात आली आहे; परंतु जिल्ह्यात बागायती गहू पेरणीचे क्षेत्र अत्यल्प आहे. 

कपाशीचा हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे; तूर पिकाच्या उत्पादनावर भिस्त होती; मात्र जमिनीत ओलावा नसल्याने, यंदा तूर पिकाचे उत्पादनही ५० टक्क्यापेक्षा अधिक घटणार आहे. जमिनीत ओलावा नाही आणि सिंचनासाठी काटेपूर्णा प्रकल्पातून विलंबाने पाणी सोडण्यात आल्याने, सोयाबीनच्या शेतात हरभरा पेरणी करता आली नाही.- शिवाजी भरणे, शेतकरी, रामगाव, ता. अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी