शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

तुरीवर नुकसानीचे ढग; ५० टक्क्यापेक्षा अधिक घटण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 13:54 IST

अकोला: दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यात कपाशीचा हंगाम संपण्याच्या मार्गावर असतानाच, तुरीच्या पिकाचेही खरे नाही. जमिनीत ओलावा नसल्याने तुरीचे उत्पादन ५० टक्क्यापेक्षा अधिक घटण्याची शक्यता असल्याने, शेतकरी चिंतेत सापडला आहे.

- संतोष येलकर

अकोला: दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यात कपाशीचा हंगाम संपण्याच्या मार्गावर असतानाच, तुरीच्या पिकाचेही खरे नाही. जमिनीत ओलावा नसल्याने तुरीचे उत्पादन ५० टक्क्यापेक्षा अधिक घटण्याची शक्यता असल्याने, शेतकरी चिंतेत सापडला आहे.पावसातील खंड, जमिनीतील कमी आर्द्रता, भूजल पातळीत घट आणि त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने, जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यात शासनामार्फत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील कोरडवाहू क्षेत्रात जमिनीत ओलावा नसल्याने, कपाशीच्या झाडांना आता पात्या-फुले आणि बोंड्या राहिल्या नसून, कपाशीचे पीक सुकले आहे. त्यामुळे यावर्षी डिसेंबर महिन्यातच कपाशीचा हंगाम संपण्याच्या मार्गावर असून, उत्पादनात घट झाल्याने, जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कापूस पिकाचे उत्पादन हातून गेल्याने, कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांची तूर पिकावर भिस्त होती; मात्र परतीच्या पावसाने हजेरी लावली नाही. दुष्काळी परिस्थितीत जमिनीत ओलावा नसल्याने, अडचणीत सापडलेल्या तुरीच्या पिकाचीही स्थिती चांगली नाही. ५० टक्क्यापेक्षा अधिक तूर पिकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने, कपाशी पाठोपाठ तूर उत्पादक शेतकरीही चिंतेत सापडला आहे.सोयाबीनच्या शेतात पेरता आला नाही हरभरा!अकोला तालुक्यासह इतर भागात सोयाबीनचे पीक काढल्यानंतर हरभरा पेरणीची तयारी शेतकºयांनी केली होती; मात्र जमिनीत पेरणीयोग्य ओलावा नाही आणि काटेपूर्णा प्रकल्पातून रब्बी सिंचनासाठी सोडण्यात आलेले पाणी विलंबाने सोडण्यात आल्याने, कोरडवाहू क्षेत्रात सोयाबीनच्या शेतांत शेतकºयांना हरभरा पेरता आला नाही. पेरणी हुकल्याने, रब्बी हरभºयाचे उत्पादनही शेतकºयांच्या हातून गेले.बागायती गहू पेरणी सुरू; पण क्षेत्र अत्यल्प!जिल्ह्यात सिंचनासाठी पाणी उपलब्ध असलेल्या भागात बागायती गव्हाची पेरणी सुरू करण्यात आली आहे; परंतु जिल्ह्यात बागायती गहू पेरणीचे क्षेत्र अत्यल्प आहे. 

कपाशीचा हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे; तूर पिकाच्या उत्पादनावर भिस्त होती; मात्र जमिनीत ओलावा नसल्याने, यंदा तूर पिकाचे उत्पादनही ५० टक्क्यापेक्षा अधिक घटणार आहे. जमिनीत ओलावा नाही आणि सिंचनासाठी काटेपूर्णा प्रकल्पातून विलंबाने पाणी सोडण्यात आल्याने, सोयाबीनच्या शेतात हरभरा पेरणी करता आली नाही.- शिवाजी भरणे, शेतकरी, रामगाव, ता. अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी