शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

तुरीवर नुकसानीचे ढग; ५० टक्क्यापेक्षा अधिक घटण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 13:54 IST

अकोला: दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यात कपाशीचा हंगाम संपण्याच्या मार्गावर असतानाच, तुरीच्या पिकाचेही खरे नाही. जमिनीत ओलावा नसल्याने तुरीचे उत्पादन ५० टक्क्यापेक्षा अधिक घटण्याची शक्यता असल्याने, शेतकरी चिंतेत सापडला आहे.

- संतोष येलकर

अकोला: दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यात कपाशीचा हंगाम संपण्याच्या मार्गावर असतानाच, तुरीच्या पिकाचेही खरे नाही. जमिनीत ओलावा नसल्याने तुरीचे उत्पादन ५० टक्क्यापेक्षा अधिक घटण्याची शक्यता असल्याने, शेतकरी चिंतेत सापडला आहे.पावसातील खंड, जमिनीतील कमी आर्द्रता, भूजल पातळीत घट आणि त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने, जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यात शासनामार्फत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील कोरडवाहू क्षेत्रात जमिनीत ओलावा नसल्याने, कपाशीच्या झाडांना आता पात्या-फुले आणि बोंड्या राहिल्या नसून, कपाशीचे पीक सुकले आहे. त्यामुळे यावर्षी डिसेंबर महिन्यातच कपाशीचा हंगाम संपण्याच्या मार्गावर असून, उत्पादनात घट झाल्याने, जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कापूस पिकाचे उत्पादन हातून गेल्याने, कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांची तूर पिकावर भिस्त होती; मात्र परतीच्या पावसाने हजेरी लावली नाही. दुष्काळी परिस्थितीत जमिनीत ओलावा नसल्याने, अडचणीत सापडलेल्या तुरीच्या पिकाचीही स्थिती चांगली नाही. ५० टक्क्यापेक्षा अधिक तूर पिकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने, कपाशी पाठोपाठ तूर उत्पादक शेतकरीही चिंतेत सापडला आहे.सोयाबीनच्या शेतात पेरता आला नाही हरभरा!अकोला तालुक्यासह इतर भागात सोयाबीनचे पीक काढल्यानंतर हरभरा पेरणीची तयारी शेतकºयांनी केली होती; मात्र जमिनीत पेरणीयोग्य ओलावा नाही आणि काटेपूर्णा प्रकल्पातून रब्बी सिंचनासाठी सोडण्यात आलेले पाणी विलंबाने सोडण्यात आल्याने, कोरडवाहू क्षेत्रात सोयाबीनच्या शेतांत शेतकºयांना हरभरा पेरता आला नाही. पेरणी हुकल्याने, रब्बी हरभºयाचे उत्पादनही शेतकºयांच्या हातून गेले.बागायती गहू पेरणी सुरू; पण क्षेत्र अत्यल्प!जिल्ह्यात सिंचनासाठी पाणी उपलब्ध असलेल्या भागात बागायती गव्हाची पेरणी सुरू करण्यात आली आहे; परंतु जिल्ह्यात बागायती गहू पेरणीचे क्षेत्र अत्यल्प आहे. 

कपाशीचा हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे; तूर पिकाच्या उत्पादनावर भिस्त होती; मात्र जमिनीत ओलावा नसल्याने, यंदा तूर पिकाचे उत्पादनही ५० टक्क्यापेक्षा अधिक घटणार आहे. जमिनीत ओलावा नाही आणि सिंचनासाठी काटेपूर्णा प्रकल्पातून विलंबाने पाणी सोडण्यात आल्याने, सोयाबीनच्या शेतात हरभरा पेरणी करता आली नाही.- शिवाजी भरणे, शेतकरी, रामगाव, ता. अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी