शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

गंभीर आजारांपासून दूर राहण्यासाठी वेळेत उपचार आवश्यक! -  सौरभ कटियार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 6:58 PM

Akola News वेळेत उपचार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

अकोला: क्षयरोग व कुष्ठरोग यासारख्या आजारांपासून दूर राहण्यासाठी वेळेत उपचार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी केले. राज्यभरात १ डिसेंबरपासून क्षयरोग व कुष्ठरोग रुग्ण शोध मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली. त्या अनुषंगाने मोहिमेच्या जिल्हास्तरीय उद्घाटन कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवार ४ डिसेंबर रोजी कापशी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते. क्षयरोग हा अतिशय गंभीर आजार असून, रुग्णांनी वेळेत तपासणी करून औषधोपचार घेण्याची आवश्यकता आहे. सध्या कोविडसारख्या आजारामध्ये जेवढे मृत्यू झाले नाहीत, त्यापेक्षा जास्त मृत्यू क्षयरोगामुळे झाले आहेत. क्षयरोगावर वेळेवर औषधोपचार घेतल्यास रुग्ण शंभर टक्के बरा होऊ शकतो. तसेच कुष्ठरोग या आजारावरसुद्धा चांगली औषधे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मोहिमेदरम्यान येणाऱ्या पथकांकडून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, यासाठी ग्रामीण व शहरी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास कुष्ठरोग विभागाचे साहायक संचालक डॉ. एम.एम. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, तालुका आरोग्य अधिकारी जगदीश बन्सोडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, डॉ. अर्चना महल्ले, डॉ. मोरवाल आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. संचालन जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी यांनी, तर आभार आरोग्य सहायक डाबेराव यांनी मानले.

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य