शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांपासून तहानलेल्यांची नि:स्वार्थ सेवा, महादेव तायडे देताहेत बोअरचे मोफत पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 10:02 IST

आज समाजात माणूसपण उरले नाही, सर्व जग स्वार्थी आहे, अशी ओरड सुरू आहे. कलियुग आहे, असे उत्तर देऊन अनेक जण मोकळे होतात; परंतु आजही समाजात नि:स्वार्थ सेवा करणाऱ्यांची संख्या कमी नाही.

बोरगाव मंजू (अकोला) : आज समाजात माणूसपण उरले नाही, सर्व जग स्वार्थी आहे, अशी ओरड सुरू आहे. कलियुग आहे, असे उत्तर देऊन अनेक जण मोकळे होतात; परंतु आजही समाजात नि:स्वार्थ सेवा करणाऱ्यांची संख्या कमी नाही. पाण्याचा धर्म आता राहिला नसून, व्यवसाय झाला आहे. पाणपोई दिसेनाशी झाली असून, पाणी विक्रीचा व्यवसाय उभारल्याचे चित्र गावोगावी आहे. अशा परिस्थितीत आपल्या बोअरला लागलेल्या मुबलक पाण्याची विक्री न करता ते तहानलेल्या लोकांना मोफत वितरित करण्याचा उपक्रम महादेवराव तायडे राबवित आहेत.

गत पाच ते सात वर्षे झाली, निसर्गाच्या लहरीपणामुळे अपुरा व अवेळी पाऊस पडल्याने भूजल पातळी खोल गेली. त्यामुळे नदी, नाले, विंधन विहिरी आठल्या. शहरातील विविध भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे, तर शासनाने काही भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे. लोकसंख्या लक्षात घेता सदर पाणी पुरवठा अपुरा आहे. तहान भागविण्यासाठी रानोरान भटकंती करावी लागत असतानाच गत तीन वर्षांपासून येथील प्रतिष्ठित व्यावसायिक महादेवराव तायडे हे भीषण पाणी टंचाईच्या काळात माळीपुरा भागासह इतरही भागात आपल्या बोअरवरून नागरिकांना मोफत पाणी वितरित करीत आहेत. गत दोन वर्षांपासून येथील प्रतिष्ठित व्यावसायिक महादेवराव तायडे हे मोफत पाणी वितरण करून सेवा देतात, तर यावर्षीसुद्धा आपल्या बोअरद्वारे नागरिकांना पाणी देत आहेत. त्यांच्या बोअरवर पाणी भरण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. सोबतच मुक्या जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. (वार्ताहर)