शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

तीन वर्षांपासून तहानलेल्यांची नि:स्वार्थ सेवा, महादेव तायडे देताहेत बोअरचे मोफत पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 10:02 IST

आज समाजात माणूसपण उरले नाही, सर्व जग स्वार्थी आहे, अशी ओरड सुरू आहे. कलियुग आहे, असे उत्तर देऊन अनेक जण मोकळे होतात; परंतु आजही समाजात नि:स्वार्थ सेवा करणाऱ्यांची संख्या कमी नाही.

बोरगाव मंजू (अकोला) : आज समाजात माणूसपण उरले नाही, सर्व जग स्वार्थी आहे, अशी ओरड सुरू आहे. कलियुग आहे, असे उत्तर देऊन अनेक जण मोकळे होतात; परंतु आजही समाजात नि:स्वार्थ सेवा करणाऱ्यांची संख्या कमी नाही. पाण्याचा धर्म आता राहिला नसून, व्यवसाय झाला आहे. पाणपोई दिसेनाशी झाली असून, पाणी विक्रीचा व्यवसाय उभारल्याचे चित्र गावोगावी आहे. अशा परिस्थितीत आपल्या बोअरला लागलेल्या मुबलक पाण्याची विक्री न करता ते तहानलेल्या लोकांना मोफत वितरित करण्याचा उपक्रम महादेवराव तायडे राबवित आहेत.

गत पाच ते सात वर्षे झाली, निसर्गाच्या लहरीपणामुळे अपुरा व अवेळी पाऊस पडल्याने भूजल पातळी खोल गेली. त्यामुळे नदी, नाले, विंधन विहिरी आठल्या. शहरातील विविध भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे, तर शासनाने काही भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे. लोकसंख्या लक्षात घेता सदर पाणी पुरवठा अपुरा आहे. तहान भागविण्यासाठी रानोरान भटकंती करावी लागत असतानाच गत तीन वर्षांपासून येथील प्रतिष्ठित व्यावसायिक महादेवराव तायडे हे भीषण पाणी टंचाईच्या काळात माळीपुरा भागासह इतरही भागात आपल्या बोअरवरून नागरिकांना मोफत पाणी वितरित करीत आहेत. गत दोन वर्षांपासून येथील प्रतिष्ठित व्यावसायिक महादेवराव तायडे हे मोफत पाणी वितरण करून सेवा देतात, तर यावर्षीसुद्धा आपल्या बोअरद्वारे नागरिकांना पाणी देत आहेत. त्यांच्या बोअरवर पाणी भरण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. सोबतच मुक्या जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. (वार्ताहर)